शहरं
Join us  
Trending Stories
1
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
2
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
3
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
4
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
5
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
6
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
7
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
8
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
9
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
10
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
11
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
12
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
13
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?
14
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
15
Sankashti Chaturthi 2025: चातुर्मासातली पहिली संकष्टी, बाराही राशींसाठी ठरणार खास; पूर्ण होणार प्रत्येक आस!
16
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
17
पतीचा भर रस्त्यात तमाशा; पत्नीवर केले सपासप वार, जांघेत अडकली तलवार! कशावरून झाला वाद?
18
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
19
CHYD च्या नवीन पर्वात निलेश साबळेंना मिस करशील का? गौरव मोरे म्हणाला, "मी त्यांच्यासोबत..."
20
लव्ह जिहादवरील 'पुस्तका'द्वारे लोकांना भडकवायचा छांगूर बाबा, आणखी ४ सहकाऱ्यांचाही खुलासा; या जिल्ह्यांत सुरू होता धर्मांतराचा खेळ

गावांमध्ये प्रशासनाच्या अधिकाऱ्यांची भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:34 IST

पाचोरा उपविभागीय अधिकारी डाॅ. विक्रम बांदल, भडगावचे प्रभारी तहसीलदार मुकेश हिवाळे, निवासी नायब तहसीलदार रमेश देवकर, मंडल अधिकारी आर. ...

पाचोरा उपविभागीय अधिकारी डाॅ. विक्रम बांदल, भडगावचे प्रभारी तहसीलदार मुकेश हिवाळे, निवासी नायब तहसीलदार रमेश देवकर, मंडल अधिकारी आर. पी. शेजवळकर, कजगाव तलाठी उमेश पाटील, टोणगाव तलाठी राहुल पवार आदींनी कजगाव, पासर्डी, भोरटेक, नगरदेवळा स्टेशन वस्तीसह तितूर नदी काठावरील गावांना भेट देऊन पूर परिस्थितीची पाहणी केली. कजगाव येथील तितूर नदीकाठालगत असलेल्या काही घरांजवळ पुराचे पाणी पोहोचल्याने त्यांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले.

तितूर नदीकाठावरील सर्व गावांतील नागरिकांना सतर्कतेच्या सूचना महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिल्या. तितूर नदीला पुराचे पाणी जास्त वाढल्यास काठालगत राहणाऱ्या नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्याच्या सूचना पाचोरा उपविभागीय अधिकारी डाॅ. विक्रम बांदल, प्रभारी तहसीलदार मुकेश हिवाळे, निवासी नायब तहसीलदार रमेश देवकर यांनी संबंधितांना दिल्या. या तितूर नदीच्या पुरांमुळे तितूर नदीकाठालगत काही घरांमध्ये, काही शेतांमध्ये पाणी साचून नुकसान होत आहे.

पुराचे पाणी ओसरल्यावर संबंधित नुकसान झालेल्या घरांचे, शेती पिकांचे शासकीय नियमानुसार नुकसानीचे पंचनामे करण्यात येतील, मदत करण्यात येईल, अशी माहीती तहसीलदार मुकेश हिवाळे, निवासी नायब तहसीलदार रमेश देवकर यांनी दिली. मात्र, कुठेच जीवित हानी झाली नसल्याचीही माहिती महसूल विभागामार्फत देण्यात आली. भडगाव तालुक्यात दि. ३० रोजी दिवसभर व रात्री ‘ब्रेक के बाद’ कुठे जादा तर कुठे रिमझिम पाऊस बरसला. यात भडगाव तालुक्यात एकूण २७.२५ मिलीमीटर पाऊस बरसला तर भडगाव महसूल मंडळात २५ मिलीमीटर, आमडदे महसूल मंडळात ८ मिलीमीटर, गोंडगाव महसूल मंडळात ५० मिलीमीटर, कोळगाव २८ मिलीमीटर पाऊस बरसला.

याची नोंद महसूल प्रशासनाने केल्याची माहिती महसूल प्रशासनामार्फत देण्यात आली. सर्वाधिक पाऊस गोंडगाव महसूल मंडळात तर सर्वात कमी पाऊस आमडदे महसूल मंडळात बरसला आहे. दि. ३१ रोजी सकाळी तालुक्यात तुरळक रिमझिम पाऊस वगळता नंतर दिवसभर पावसाने विश्रांती घेत ऊन, सावलीचा खेळ सुरू होता. या आठवड्यात सुरु असलेल्या पावसामुळे खरीप हंगामासह शेती पिकांना मोठ्या फायद्याचे ठरत आहे.

मन्याड धरण या आठवड्यात ओव्हरफ्लो झाल्याने गिरणा नदीला जामदा गिरणा बंधाऱ्यातून एकूण ८ हजार क्युसेक पाणी सोडण्यात आले आहे. पावसाचे प्रमाण वाढल्यास पुराचे पाणी वाढू शकते. गिरणा काठावरील गावातील नागरिकांनी सतर्कता बाळगावी, असे आवाहन चाळीसगाव गिरणा पाटबंधारे विभागाचे अभियंता हेमंत पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.