शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
4
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
5
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
6
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
7
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
8
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
10
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
11
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
12
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
13
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
14
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
15
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
16
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
17
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
18
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
19
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
20
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

नाहाटा चौफुलीवर पुलाखालून वाहतूक खुली झाल्याने वाहनधारकांना दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2020 04:17 IST

चिखली ते तरसोद महामार्ग चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. याचाच एक भाग म्हणून गेल्या अनेक महिन्यांपासून नाहाटा चौफुलीवर पुलाचे काम ...

चिखली ते तरसोद महामार्ग चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. याचाच एक भाग म्हणून गेल्या अनेक महिन्यांपासून नाहाटा चौफुलीवर पुलाचे काम सुरू आहे. त्यामुळे अत्यंत गजबजलेल्या या चौफुलीवर नेहमीच वाहतुकीची कोंडी होत होती. सुरू असलेल्या पुलाच्या कामामुळे वाहनांना फेरा मारून जावे लागत होते. तसेच कच्च्या रस्त्यामुळे उडणाऱ्या धूळ तसेच खड्ड्यांमुळे वाहनधारक त्रस्त झाले होते. सभोवतालच्या परिसरातील रहिवाशांचे आरोग्यही धोक्यात आले होते. शिवाय वाहतूक शाखेचे कर्मचारी यांनाही कर्तव्य बजावत असताना धुळीचा मोठा त्रास सहन करावा लागत होता.

मात्र पुलाखालील रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात आल्याने जामनेरकडे व शहरातील नाहाटा परिसर, विकास कॉलनी, साई मंदिराकडे जाणाऱ्या वाहनचालकांना मोठा दिलासा मिळाला आहे. याशिवाय महामार्गावर रेल्वे उड्डाणपुलाचे कामही गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू आहे. त्यामुळे जुन्या महामार्गावर वाहतुकीची कोंडी नित्याची बाब झालेली आहे, मात्र रेल्वे उड्डाणपुलाच्या पुढे शहराकडील दिशेने सिंधी कॉलनी व शहरातील अनेक भागांना जोडणारा सर्व्हिस रोड नाहाटा चौफुलीपर्यंत खुला करण्यात आल्याने शहरात येणाऱ्या दुचाकी, तीनचाकी जुन्या महामार्गावरून न जाता सर्व्हिस रोडचा वापर करत आहे, त्यामुळेही महामार्गावरील वाहतूक विभागली गेली आहे. याचा वाहनचालकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

नवोदय विद्यालयासमोर उड्डाणपुलाच्या कामाची गती वाढवावी

महामार्ग चौपदरीकरणाअंतर्गत नवोदय विद्यालयासमोर उभारण्यात येणाऱ्या उड्डाणपुलाचे काम सुमारे दीड वर्षापासून सुरू आहे. जळगावकडून भुसावळ शहर, अकोला, नागपूरकडे जाणाऱ्या वाहनांना या ठिकाणाहून यावे लागते. पुलाचे काम संथ गतीने सुरू असल्यामुळे अनेकवेळा मलकापूर, अकोला, नागपूरकडे जाणारी अवजड वाहने रस्ता लक्षात न आल्यामुळे शहरातून जाणाऱ्या मार्गावरून बऱ्हाणपूरकडे जातात पुढे लांब फेरा मारून परत माघारी येऊन वळण घेऊन मलकापूरकडे जातात. यामुळे या ठिकाणी वाहतुकीची कोंडी होत आहे तसेच या ठिकाणी मोठ्या प्रमाणात धूळ उडत आहे. नवोदय विद्यालयासमोरील पूल लवकरात लवकर कार्यान्वित झाल्यास जड वाहनचालकांची दिशाभूल होणार नाही. यामुळे या पुलाच्या कामाला गती मिळावी, अशी मागणी वाहनधारकांकडून होत आहे