शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
2
"मोदी सरकार उत्सव करत असताना लोक रेल्वेतून पडून मेली" मुंब्रातील घटनेवरून राहुल गांधी बरसले
3
Mumbra Train Accident: लोकल ट्रेनमधून पडले, किडे-मुंग्यांसारखा गेला जीव, मृत्यू झालेले कोण? नावे आली समोर
4
"रेल्वे मंत्री आहेत की रील मंत्री?" मुंबई रेल्वे दुर्घटनेवरून आदित्य ठाकरेंची केंद्रावर टीका
5
मुंबईला जाणाऱ्या मालवाहू जहाजात स्फोट, ५० कंटेनर समुद्रात पडले; ४ कर्मचारी बेपत्ता
6
ना युक्रेन, ना ब्रिटन, 'हा' देश रशियाचा शत्रू नंबर वन; हिटलरशी आहे थेट कनेक्शन, कारण...
7
भारताच्या कंपन्यांवर टाळं लावण्याच्या प्रयत्नात पाकिस्तानचा मित्र चीन! आपली काय आहे तयारी?
8
परप्रातांमधून मुंबईत आदळणारे लोंढेच जबाबदार; मुंबईत मुंब्रा घटनेवरून राज ठाकरेंचा संताप
9
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशीची हत्या करणारे हेच ते; आरोपींचे फोटो आले समोर, सोनमसोबत रचला भयंकर कट
10
लोकलमधील पोलला घट्ट धरून ठेवलं म्हणून, नाहीतर..; अपघातातून बचावलेल्या मच्छिंद्रने सांगितली आपबिती
11
पती, पत्नी आणि हत्याकांड! राजा रघुवंशीप्रमाणेचे 'या' तरुणांचाही पत्नीने काढला काटा
12
25 वर्षांच्या प्रियकराकडून 36 वर्षीय प्रेयसीची हत्या; दोन दिवसांनंतर हॉटेलमध्ये सापडला मृतदेह
13
आपल्याच कंपनीत अधिकाऱ्यांपेक्षाही कमी सॅलरी घेतात गौतम अदानी, पाहा किती आहे त्यांचं वेतन?
14
मुंब्र्याच्या 'त्या' धोकादायक वळणाबाबत मनसे कार्यकर्त्याने दिलं होतं पत्र; अपघातात त्यानेच गमावले पाय
15
मुंब्रा अपघात: "प्रवाशांवरच त्यांच्या मृत्यूचे खापर फोडून चालणार नाही"; शरद पवारांचे रोखठोक मत
16
NCP अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्याचा मृतदेह स्वत:च्या कारमध्येच आढळला; नेमकं काय घडलं?
17
Mumbai Train Accident: "घटना दुर्दैवी, 'रेल्वे'कडून अपघाताची चौकशी सुरू"; मुख्यमंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती
18
Raja Raghuvanshi :'सोनम माझ्यासोबत बोलत नाही, मला लग्न करायचं नाही'; लग्नाआधीच राजा रघुवंशीने आईला सांगितलं होतं
19
"दुआ लिपासोबत मुलं जन्माला घालायचीत", वादग्रस्त वक्तव्यावर बादशाहचं स्पष्टीकरण, म्हणाला...
20
IND vs ENG: 'तो बुमराहपेक्षाही भारी...' माजी क्रिकेटपटूनं घेतलं 'या' गोलंदाजाचं नाव!

यावल येथे महर्षी व्यास मंदिरावर गुरुपौर्णिमेला विविध कार्यक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2019 18:09 IST

महर्षी व्यासांचे यावल येथेच मंदिर असल्याने जिल्ह्यासह लगतच्या मध्य प्रदेशातून भाविक मोठ्या संख्येने येथे येत असतात. गुरूपौर्णिमेस येथे मोठा उत्सव साजरा केला जातो. दिवसभर विविध धार्मीक कार्यक्रम, महाप्रसादाचे आयोजन केले जाते.

यावल, जि.जळगाव :   महर्षी व्यासांचे यावल येथेच मंदिर असल्याने जिल्ह्यासह लगतच्या मध्य प्रदेशातून भाविक मोठ्या संख्येने येथे येत असतात. गुरूपौर्णिमेस येथे मोठा उत्सव साजरा केला जातो. दिवसभर विविध धार्मीक कार्यक्रम, महाप्रसादाचे आयोजन केले जाते.गुरू-शिष्य परंपरेस अनन्य महत्त्वअध्यात्मिक क्षेत्रात गुरू-शिष्य परंपरेस अनन्य महत्व आहे. या परंपरेत महर्षी व्यास गुरूंच्या अग्रस्थानी आहेत. महर्षी व्यासांना भारतीय संस्कृतीतील अद्भुत रहस्य मानले जाते. असे म्हणतात की, ‘व्यासोच्छीट जगत सर्व।’ (अर्थात जगातील कोणत्याही ज्ञानाची जाणीव सर्वप्रथम महर्षी व्यासानाच होते.) महर्षी व्यास हे गुरूंचे प्रतिनिधी आहेत. चार वेद, १८ पुराण व महाभारत रचयिते महर्षी व्यासांचे येथे भव्य मंदिर असून, गुरूपोर्णिमेस मोठा उत्सव साजरा केला जातो.आख्यायिकामहाभारत रचयिते श्री महर्षी व्यासांनी यावलला काही काळ वास्तव्य केल्याचे आणि महाभारताचे काही पर्व येथे लिहिल्याची दंतकथा आहे. महाभारत काळात सातपुड्याचे घनदाट जंगल यावलपर्यंत होते, असे सांगितले जाते. सध्याच्या येथील हडकाई-खडकाई नद्या म्हणजेच पूर्वीच्या हरीता-सरीता नद्या होत. या नद्यांच्या संगमानंतर वाहत असलेली सुर नदी ही दक्षिण वाहिनी आहे. याच नदीच्या उंच टेकडीवर लोमेश नावाच्या ऋषींंचा आश्रम होता. एकदा लोमेशांनी महर्षी व्यासांच्या हस्ते यज्ञ आयोजित केला होता. त्याचवेळेस अज्ञानवासातून पांडव हस्तीनापुराकडे परतताना लोमेश ऋषींच्या आश्रमावर आले असता त्यांच्या हस्ते लोमेशांनी महर्षीना यज्ञासाठी निमंत्रित केले होते व महर्षी व्यासांच्या हस्ते यज्ञ पार पडला. यज्ञ समाप्तीनंतर महर्षींनी काही काळ येथील भूमीत वास्तव्य केल्याचे व महाभारताची काही पर्वे लिहिली असल्याचे म्हटले जाते. महर्षी व्यास हे सप्त चिरंजिवापैकी एक होत. चिरंजीवी व्यास आजही या भूमीत वावरत असल्याची परिसरातील नागरिकांची भावना आहे. भारतात महर्षी व्यासांचे मुख्य स्थान बद्रिकारण्यातील व्यासचट्टी, दुसरे बनारसमधील रामनगर तर तिसरे मंदिर यावल येथेच असल्याने जिल्ह्यातील भाविक येथे गुरूपौर्णिमेस येवून गुरूंच्या चरणी लीन होतात.मंगळवारी गुरूपौर्णिमेनिमित्ताने महर्षी व्यास मंदिरात संस्थेच्या वतीने विविध धार्मिक कार्यक्रम आयोजन आयोजित केले आहेत. महापूजेस सकाळी आठला प्रारंभ होईल. यात्रेनिमित्ताने मंदिर परीसरात माधवराव गोळवलकर रक्तपेढी व संस्थेतर्फे रक्तदान शिबिर तसेच मंदिर परिसरात वृक्षारोपण करण्यात येणार आहे.

टॅग्स :Religious programmeधार्मिक कार्यक्रमYawalयावल