शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
2
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
3
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
4
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
5
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
6
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
7
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
8
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
9
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
10
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
11
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग
12
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
13
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
14
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
15
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
16
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
17
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
18
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
19
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
20
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?

वरणगाव न.प. याद्यांमध्ये प्रचंड घोळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 16:18 IST

याद्यांमधील दुरुस्त्या न केल्यास शिवसेना आपल्या पद्धतीने पाठपुरावा करेल, असा इशारा देण्यात आला.

 वरणगाव : येथील नगरपरिषदेच्या निवडणूक याद्यांवर आक्षेप व हरकती घेण्याचा सोमवारी अखेरचा दिवस होता. त्यावर अक्षरश: तक्रारीचा व आक्षेपांचा जणू काही पाऊसच पडला. त्यासाठी शिवसेनेचे शिष्टमंडळ नगरपरिषदेत  जाऊन धडकले आणि  लेखी स्वरुपात पुराव्यांसह  हरकती आणि तक्रारी दाखल करण्यात आल्या. यापूर्वीच १३४९ हरकती दाखल झालेल्या होत्या आणि आज सुमारे एक हजारच्या आसपास तक्रारी प्राप्त झाल्या. या तक्रारींचे निरसन करून याद्या अद्ययावत न केल्यास वेळप्रसंगी औरंगाबाद उच्च न्यायालयामध्ये जाण्याचा इशारा शिवसेनेच्या वतीने तालुकाप्रमुख समाधान महाजन व सर्व पदाधिकाऱ्यांनी नगरपालिकेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी सूर्यवंशी व इतर अधिकाऱ्यांना दिला.१५ फेब्रुवारी २०१९ रोजी नगरपरिषदेने प्रसिद्ध केलेल्या प्रारूप याद्यांमध्ये प्रचंड घोळ आहे. नियमबाह्य पद्धतीने बेकायदेशीर नावे त्यात समाविष्ट करण्यात आली आहेत. मतदार प्रत्यक्षात ज्या ठिकाणी राहात आहे तिथेच त्याचे नाव नोंदणी अपेक्षित आहे परंतु असे न करता त्यांची नोंदणी इतर प्रभागांमध्ये करण्यात आली आहे. काही मतदार वरणगाव शहरात राहत नसूनदेखील बनावट आणि खोट्या कागदपत्रांच्या आधारे राजकीय हेतूने नगरपालिकेच्या काही अधिकाऱ्यांना हाताशी धरून राजकारण्यांनी याद्यांमध्ये प्रचंड घोळ निर्माण केला आहे. या याद्या नियमाप्रमाणे बिनचूक करून लोकशाही मार्गाने निवडणुका पार पाडाव्यात, अशी अपेक्षा शिवसेनेच्या वतीने व्यक्त करण्यात आली.याद्यांमधील दुरुस्त्या न केल्यास शिवसेना आपल्या पद्धतीने पाठपुरावा करेल, असा इशारा देण्यात आला. या शिष्टमंडळात रावेर लोकसभा मतदारसंघाचे उपजिल्हा संघटक विलास मुळे, उपजिल्हा प्रमुख प्रा.उत्तम सुरवाडे, तालुकाप्रमुख समाधान महाजन, निळू सरोदे, सुभाष चौधरी, सईद मुल्ला, सागर वंजारी, राहुल बावणे, सुरेश चौधरी आदी उपस्थित होते.                                         दरम्यान, दुसरीकडे उपनगराध्यक्ष शेख अखलाक यांच्या वार्डातसुध्दा अनोळखी नवीन मतदारांची नावे समाविष्ट करण्यात आल्याने त्यांनीसुध्दा न्यायालयात जाण्याचा इशारा दिला आहे.

टॅग्स :nagaradhyakshaनगराध्यक्षBhusawalभुसावळ