शहरं
Join us  
Trending Stories
1
‘दोन शून्यां’ची बेरीज केली, त्यावर कितीही शून्य जोडले तरी…; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
2
CM रेखा गुप्तांवर हल्ला करणाऱ्या व्यक्तीचा फोटो आला समोर, आरोपी गुजरातचा रहिवासी
3
India China Talks: व्यापारापासून ते थेट उड्डाणांपर्यंत; भारत-चीन यांच्यातील चर्चेत अनेक समस्यांवर निघाला तोडगा
4
BMC: पावसाळ्यात कुठे अडकलात तर काय कराल? मुंबई महानगरपालिकेची महत्त्वाची पोस्ट!
5
'हिला भुतांनी पछाडलेले आहे'; तांत्रिक गरम सळीने चटके देत राहिला, वेदनेने मुलीचा मृत्यू झाला
6
खळबळजनक! बीडमधील कोर्टात सरकारी वकिलाने स्वतःला संपवलं; कारण काय?
7
"चहलने तो टीशर्ट स्टंट खरंच केला? माझा विश्वासच बसत नव्हता..", धनश्री वर्माने व्यक्त केल्या भावना
8
पंतप्रधान अन् मुख्यमंत्र्यांनाही पदावरुन हटवण्याची तरतूद; केंद्र सरकारच्या नवीन विधेयकात नेमकं काय?
9
BEST Election Results: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
10
आधी बोलत होता, अचानक हात खेचला, धक्का दिला; रेखा गुप्ता यांच्यावर कसा हल्ला झाला? प्रत्यक्षदर्शी म्हणाले...
11
Toll: खराब रस्त्यांवर टोल नाही; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय!
12
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला; जनसुनावणीदरम्यान कागद हातात दिला, केस ओढले अन्....
13
रात्रीच्या वेळी शेतामध्ये प्रियकरासोबत आक्षेपार्ह अवस्थेत होती मुलगी; मागून गेलेल्या वडिलांनी बघितलं, उचललं टोकाचं पाऊल अन्...
14
फक्त ३ वर्षात पैसे दुप्पट! FD पेक्षाही जास्त परतावा देणारे टॉप ५ म्युच्युअल फंड, १० वर्षांत कोट्यधीश
15
व्हाट्सॲप युजर्ससाठी महत्त्वाची बातमी: 'Meta AI' मुळे ग्रुप चॅट्सची प्रायव्हसी धोक्यात? पेटीएम संस्थापकांचा दावा
16
बेस्ट निवडणूक २०२५: शशांक राव-महायुती पॅनलची बाजी, ठाकरे बंधू चितपट; विजयी उमेदवारांची यादी
17
HDFC बँकेच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! २२-२३ ऑगस्टला 'या' ऑनलाईन सेवा राहणार बंद
18
BEST Election Results: 'ब्रँडचे बॉस एकही जागा जिंकले नाहीत'; बेस्ट निवडणुकीतील पराभवावरुन ठाकरे बंधूंना भाजपचा टोला
19
India-China Trade: भारत की चीन.. या मैत्रीचा सर्वाधिक फायदा कोणाला होणार? काय सांगते आकडेवारी
20
महाराष्ट्र जलमय... पिके खरडली, घरे बुडाली; मराठवाड्यात ११ जीव गेले, ४९८ जनावरे दगावली

‘वंदे मातरम्’ साठी 22 वर्षापूर्वी जळगावातून लढा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2017 00:12 IST

आठवणींना उजाळा : शिक्षकाचा पुढाकार

ठळक मुद्देशाळा आणि महाविद्यालयात ‘वंदे मातरम्’ सुरु करण्याचे आदेशमातृभूमीची महती सांगणारे राष्ट्रभक्ती निर्माण करणारे ‘वंदे मातरम्’ राष्ट्रगीताबद्दल प्रत्येकाला अभिमान असायलाच हवा

ऑनलाईन लोकमत / चुडामण बोरसे  

जळगाव, दि. 7 -  गेल्याच आठवडय़ात ‘वंदे मातरम्’ वरुन राज्यात  मोठाच गदारोळ झाला होता. शाळांमध्ये ‘वंदे मातरम्’  सक्तीचे करण्यात यावे, यासाठी जळगाव जिल्ह्यातील संजय चौधरी या  शिक्षकाने 22 वर्षापूर्वी न्यायालयीन लढा दिला होता. त्यामुळे या आठवणींना उजाळा मिळाला आहे.   एरंडोल तालुक्यातील कासोदा  येथील संजय आत्माराम चौधरी असे या शिक्षकाचे नाव. राज्यातील शाळा आणि महाविद्यालयांमधून ‘वंदे मातरम्’ सक्तीचे करावे,  यासाठी त्यांनी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात विनंती अर्ज (क्र.93/95) 26 जून 1995 केला होता.   त्यावर  खंडपीठाचे तत्कालीन अतिरिक्त रजिस्टार  जी.डी. पारेख यांनी न्यायालयाच्या अधीन राहून शाळा व महाविद्यालयांमध्ये ‘वंदे मातरम्’ सक्तीचे करण्याचे आदेश 14 ऑगस्ट  1995 रोजी दिले होते. आजमितीस यास 22 वर्षे पूर्ण होत आहेत. यानंतर राज्याच्या तत्कालीन शिक्षण संचालकांनी 24 नोव्हेंबर 1995 रोजी शाळा आणि महाविद्यालयात ‘वंदे मातरम्’ सुरु करण्याचे आदेश बजावले होते. या आदेशानंतर जिल्हा परिषदेतील शिक्षण  समितीचे तत्कालीन सभापती पी.सी.पाटील यांनी ‘वंदे मातरम्’ सक्तीचे करण्याचे आदेश मे 2005 मध्ये दिले होते. मुलांमध्ये लहानपणापासून देशभक्ती अंगी बाणावी आणि मातृभूमीची महती सांगणारे राष्ट्रभक्ती निर्माण करणारे ‘वंदे मातरम्’ सर्व शाळा आणि महाविद्यालयांमध्ये नियमित म्हटले जावे, यासाठी आपण 22 वर्षापूर्वी हा लढा दिला होता, राष्ट्रगीताबद्दल प्रत्येकाला अभिमान असायलाच हवा. आणि तो वेळोवेळी व्यक्त व्हावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.  

अशी सुचली कल्पनाआकाशवाणीवर  रोज पहाटे दिवसाची सुरुवात ही ‘वंदे मातरम्’ या गीताने होत असते. मग शाळांमधून हे गीत का म्हटले जाऊ नये, असा विचार मनात आला. यासाठी आपण उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र या आदेशाची अंमलबजावणी मात्र होत नाही. 15 ऑगस्ट 2017 पासून शाळा व महाविद्यालयात ‘वंदे मातरम’ सक्तीचे करावे.      - संजय आत्माराम चौधरी