शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदार यादी कायमसाठी एकसारखीच राहू शकत नाही, पुनरीक्षण आवश्यक; सर्वोच्च न्यायालयाचे निरीक्षण
2
मंत्रालयामधील मोकळ्या जागेवर मंत्र्यांचेच अतिक्रमण; सामान्यांना बसण्यासाठीच्या जागा व्यापल्या
3
कबुतरांना खाद्यबंदी कायम; 'तुम्ही एकांगी निर्णय घेऊ शकत नाही', हायकोर्टाने मुंबई महापालिकेला फटकारले
4
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
5
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
6
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
7
पुण्यात वाहतूक पोलीस आणि कॅब चालक यांच्यात वाद; शिवीगाळ करत मारहाण केली; व्हिडीओ व्हायरल
8
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
9
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
10
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
11
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
12
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
13
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
14
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
15
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
16
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
17
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
18
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
19
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
20
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला

लसीमुळे अंगाला नाणी, भांडी, लाकूड, चिकटणे शक्य नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:22 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : कोरोना प्रतिबंधक लस पूर्णपणे सुरक्षित असून, लस घेतल्याने शरीरात चुंबकीय तत्त्व तयार होऊन भांडे ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : कोरोना प्रतिबंधक लस पूर्णपणे सुरक्षित असून, लस घेतल्याने शरीरात चुंबकीय तत्त्व तयार होऊन भांडे अथवा इतर वस्तू चिकटणे शक्य नाही, अशी माहिती जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिली.

कोरोना प्रतिबंधक लस घेतल्यानंतर अंगाला भांडी, नाणी, लोखंड, लाकूड, प्लास्टिक चिकटायला लागले, असा प्रचार सुरू झाल्याने याविषयी सोमवारी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि मराठी विज्ञान परिषद यांनी अंगाला वस्तू चिकटण्यामागचे विज्ञान सांगून जिल्ह्यात सुरू असलेल्या अफवांना विश्वास ठेवू नका, असे आवाहन केले. लस घेतल्यानंतर काही दिवसांनी शरीरात मॅग्नेट सिस्टीम तयार होते व वस्तू चिकटतात, असा दावा नाशिक येथील व्यक्तीने केला. या दाव्याविषयी अंनिसच्या कार्यकर्त्यांनी प्रत्यक्ष प्रयोग करून दाखवीत त्यामागची चिकित्सा केली आणि शरीरात लस घेतल्यानंतर चुंबकत्व तयार होत नाही असे सांगितले. अंनिसचे जिल्हा कार्याध्यक्ष प्रा. दिगंबर कट्यारे व मराठी विज्ञान परिषदेचे सचिव दिलीप भारंबे यांनी काही प्रयोग करून दाखविले. यावेळी जिल्हाधिकारी राऊत यांच्यासह अप्पर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन, निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण उपस्थित होते. प्रस्तावना जिल्हा समन्वयक विश्वजित चौधरी यांनी केली.

लसीमध्ये लोखंडाला आकर्षण करणारा फेरोमॅग्नेट यासारखे कण नसतात. त्यामुळे लोखंडाला आकर्षण करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे कट्यारे यांनी सांगितले. आपल्या शरीरातून त्वचेतून घाम श्रवतो, त्यात सिबम नावाचे तेलकट, घामट द्रव श्रवतो. या द्रवातील रेणूंचा विषम पदार्थाशी संपर्क आल्यास विषम आकर्षण या वैज्ञानिक नियमानुसार हे दोन्ही विषम पदार्थ आकर्षिले जातात व बाहेरील पदार्थ घट्ट बसतो, एक बंध तयार होते. घर्षणामुळे अंगाला चिकटून राहतात, असा दावा कट्यारे यांनी केला.

लस पूर्णपणे सुरक्षित असून, लस घेतल्याने चुंबकत्व तयार होणे शक्य नसल्याचे सांगत आपला क्रमांक आल्यानंतर लस घ्यावी व कोरोनापासून बचाव करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी राऊत यांनी केले. अशा अफवांनी कोणी लस घेतली नाही व त्याला कोरोना झाल्यास हा प्रकार धोकादायक ठरू शकतो, असेही जिल्हाधिकारी म्हणाले.