शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
4
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
5
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
6
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
7
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
8
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
9
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
10
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
11
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
12
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
13
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
14
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
15
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
16
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
17
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
18
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
19
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
20
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
Daily Top 2Weekly Top 5

लसीमुळे अंगाला नाणी, भांडी, लाकूड, चिकटणे शक्य नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:22 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : कोरोना प्रतिबंधक लस पूर्णपणे सुरक्षित असून, लस घेतल्याने शरीरात चुंबकीय तत्त्व तयार होऊन भांडे ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : कोरोना प्रतिबंधक लस पूर्णपणे सुरक्षित असून, लस घेतल्याने शरीरात चुंबकीय तत्त्व तयार होऊन भांडे अथवा इतर वस्तू चिकटणे शक्य नाही, अशी माहिती जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिली.

कोरोना प्रतिबंधक लस घेतल्यानंतर अंगाला भांडी, नाणी, लोखंड, लाकूड, प्लास्टिक चिकटायला लागले, असा प्रचार सुरू झाल्याने याविषयी सोमवारी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि मराठी विज्ञान परिषद यांनी अंगाला वस्तू चिकटण्यामागचे विज्ञान सांगून जिल्ह्यात सुरू असलेल्या अफवांना विश्वास ठेवू नका, असे आवाहन केले. लस घेतल्यानंतर काही दिवसांनी शरीरात मॅग्नेट सिस्टीम तयार होते व वस्तू चिकटतात, असा दावा नाशिक येथील व्यक्तीने केला. या दाव्याविषयी अंनिसच्या कार्यकर्त्यांनी प्रत्यक्ष प्रयोग करून दाखवीत त्यामागची चिकित्सा केली आणि शरीरात लस घेतल्यानंतर चुंबकत्व तयार होत नाही असे सांगितले. अंनिसचे जिल्हा कार्याध्यक्ष प्रा. दिगंबर कट्यारे व मराठी विज्ञान परिषदेचे सचिव दिलीप भारंबे यांनी काही प्रयोग करून दाखविले. यावेळी जिल्हाधिकारी राऊत यांच्यासह अप्पर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन, निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण उपस्थित होते. प्रस्तावना जिल्हा समन्वयक विश्वजित चौधरी यांनी केली.

लसीमध्ये लोखंडाला आकर्षण करणारा फेरोमॅग्नेट यासारखे कण नसतात. त्यामुळे लोखंडाला आकर्षण करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे कट्यारे यांनी सांगितले. आपल्या शरीरातून त्वचेतून घाम श्रवतो, त्यात सिबम नावाचे तेलकट, घामट द्रव श्रवतो. या द्रवातील रेणूंचा विषम पदार्थाशी संपर्क आल्यास विषम आकर्षण या वैज्ञानिक नियमानुसार हे दोन्ही विषम पदार्थ आकर्षिले जातात व बाहेरील पदार्थ घट्ट बसतो, एक बंध तयार होते. घर्षणामुळे अंगाला चिकटून राहतात, असा दावा कट्यारे यांनी केला.

लस पूर्णपणे सुरक्षित असून, लस घेतल्याने चुंबकत्व तयार होणे शक्य नसल्याचे सांगत आपला क्रमांक आल्यानंतर लस घ्यावी व कोरोनापासून बचाव करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी राऊत यांनी केले. अशा अफवांनी कोणी लस घेतली नाही व त्याला कोरोना झाल्यास हा प्रकार धोकादायक ठरू शकतो, असेही जिल्हाधिकारी म्हणाले.