शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
2
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
3
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा
4
Bihar Election: नितीश कुमारी की, तेजस्वी यादव, बिहारमध्ये कोणाचे सरकार येणार? फलोदी सट्टा बाजाराचा कौल काय?
5
सुटकेचा थरार! ओलीस ठेवलेल्या मुलांना सोडवण्यासाठी पोलिसांचा गोळीबार; आरोपी रोहित आर्यचा मृत्यू
6
"माजी मंत्री दीपक केसरकर यांनी पवईतील किडनॅपरबाबत दिली अशी माहिती, म्हणाले, मी स्वत:…’’  
7
IND vs AUS : ऑस्ट्रेलिया ऑलआउट! पण फायनलसाठी टीम इंडियासमोर सेट केलं ३३९ धावांचं टार्गेट
8
Kawasaki: कावासाकी व्हर्सिस-एक्स ३०० भारतात लॉन्च; केटीएम, रॉयल एनफील्डच्या 'या' बाईकशी स्पर्धा!
9
मुंबईत अपहरणाचा थरार: पोलिसांची एकीकडे आरोपीशी चर्चा, दुसरीकडे बाथरूमच्या खिडकीतून एन्ट्री
10
UFO संशोधन की आणखी काही, अमेरिकेच्या हवाई दलाच्या तळावर तीन संशोधकांचा मृत्यू , कारण गूढच राहिले
11
मंदिरांच्या भिंतीवर आय लव्ह मोहम्मद लिहिणारे हिंदू तरुण, पोलिसांनी ठोकल्या बेड्या; नावे आली समोर
12
IPL 2026: रोहित शर्मा KKRच्या वाटेवर? Mumbai Indiansची खास पोस्ट चर्चेत, नेमकं काय घडतंय?
13
"...पेक्षाही अधिक धाडस त्या महिलेत होतं"; इंदिरा गांधींचा उल्लेख करत राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
14
Crime: पतीच्या मृत्युनंतर पुन्हा पडली प्रेमात; ४० लाखांच्या विम्यासाठी एकुलत्या एक मुलाला संपवलं!
15
Phoebe Litchfield Fastest Century : फीबीचा 'ट्रॅविस हेड पॅटर्न'; विक्रमी शतकानंतर अतरंगी फटका मारताना फसली!
16
बिहारमध्ये प्रचारादरम्यान वाद, गोळीबारात प्रशांत किशोर यांच्या पक्षाच्या नेत्याचा मृत्यू  
17
नगराध्यक्ष निवडणुकीसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा पहिला उमेदवार घोषित, दोन नावे होती चर्चेत 
18
पवईत मुलांना ओलीस ठेवणारा रोहित आर्य कोण?; शिक्षण विभागाशी समोर आले कनेक्शन, काय आहे प्रकार?
19
बीचवर स्टंट करणे तरुणाच्या अंगलट; 60 लाखांची मर्सिडीज समुद्रात अडकली, पाहा Video...
20
Rohit Pawar: रोहित पवार यांच्या अडचणीत वाढ, मुंबईत गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?

मासिक पाळीवर लसीकरणाचा परिणाम नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2021 04:08 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : महिलांनी कधी लस घ्यावी, कधी घेऊ नये, मासिक पाळीत लस घेऊ ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : महिलांनी कधी लस घ्यावी, कधी घेऊ नये, मासिक पाळीत लस घेऊ नये किंवा घ्यावी, याबाबत बरेच गैरसमज समाजमाध्यमांवर फिरत आहेत. मात्र, मासिक पाळीवर लसीकरणाचा कुठलाही परिणाम होत नाही, असे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील स्त्री रोग व प्रसूतिशास्त्र विभाग प्रमुख डॉ. संजय बनसोडे यांनी स्पष्ट केले आहे. स्त्री आरोग्य आणि लसीकरण याबाबत त्यांनी ‘लोकमत’ला माहिती दिली आहे.

महिलांनी नोंदणीकृत दिवशी लस घ्यावी. मग ही तारीख मासिक पाळीमध्ये, पाळीपूर्वी, पाळीनंतर असली तरी हरकत नाही, असे त्यांनी म्हटले आहे. केंद्र सरकारच्या निर्देशानुसार गरोदरपणात लसीकरण करता येत नाही. इंग्लंड, अमेरिका या देशांमध्ये गरोदर महिलांना लसीकरण केले गेले आहे. लसीकरणामुळे गर्भाला व्यंग असल्याचे निदर्शनात आले नाही. गरोदरपणात लसीकरणामुळे गर्भातील बाळाला देखील अँटीबॉडीज मिळतात. अजून काही संशोधनानंतर आपल्या देशातही गरोदरपणात लसीकरणाला मान्यतेची शक्यता नाकारता येत नाही.

लस कुणी घ्यावी, कुणी घेऊ नये

१) अपत्याचे नियोजन असलेल्या जोडप्यांनी देखील लसीकरण करून घेण्यास हरकत नाही; पण लगेच एक ते दोन आठवड्यात टेस्ट ट्यूब बेबीच्या तयारीत असलेल्या जोडप्यांनी लसीकरण टाळावे.

२) लस घेतल्यानंतर गरोदरपणाचे निदान झाल्यास गरोदरपणाचे उपचार करावे. गर्भाला काहीही धोका होत नाही. त्यामुळे गर्भपात करण्याची गरज नाही. तसा विचारही मनात आणू नये. दुसरा डोस म्हणजेच बूस्टर डोस घेऊ नये.

३) प्रसूतीनंतर स्तनपानामुळे लस घेऊ नये, असे यंत्रणेचे निर्देश आहेत; पण पाश्चात्त्य देशात स्तनदा मातांना लस दिली जात आहे. स्तनपानाद्वारे अँटीबॉडीज बाळाला मिळतात. आपल्या देशात देखील याबाबत संशोधन होत असल्याने आपल्याकडेही चित्र बदलू शकते.

४) पीसीओडी, अंडाशयाच्या गाठी, मधुमेह, गर्भपिशवीच्या गाठी, रक्तदाब यातही लसीकरण सुरक्षित असल्याचे डॉ. बनसोडे यांनी सांगितले.

लस ही परिणामकारच

१) काेव्हिशिल्ड तसेच कोव्हॅक्सिन या दोन्ही प्रकारच्या लसी सारख्याच प्रमाणात उपयुक्त आहेत; पण लसीकरणात पहिला व दुसरा म्हणजेच बूस्टर डोस एकाच प्रकारच्या लसीचा असणे आवश्यक आहे. ताप येणे, थंडी वाजणे, डोके दुखणे, अंग दुखणे, जुलाब होणे हे दुष्परिणाम सौम्य प्रमाणात होऊ शकतात; पण सकारात्मक दृष्टिकोन व मानसिक तयारी यामुळे या दुष्परिणामांवर मात करता येते. आवश्यकता भासल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.

२) लसीकरणमुळे मृत्यू होत नाही. ज्या तुरळक मृत्यूंची नोंद झाली आहे, त्या रुग्णांना पूर्वीपासून इतर व्याधी होत्या. हा योगायोगाचा भाग आहे

३) दुष्परिणाम जाणवल्यास लस ही परिणामकारक आहे ही धारणा देखील चुकीची आहे. दुष्परिणाम झाले अथवा नाही झाले तरीही लस ही परिणामकारकच असल्याचे डॉ. बनसोडे यांनी म्हटले आहे.