शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
5
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
6
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
7
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
8
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
9
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
10
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
11
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
12
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
13
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
14
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
15
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
16
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
17
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
18
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
19
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
20
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
Daily Top 2Weekly Top 5

मासिक पाळीवर लसीकरणाचा परिणाम नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2021 04:08 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : महिलांनी कधी लस घ्यावी, कधी घेऊ नये, मासिक पाळीत लस घेऊ ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : महिलांनी कधी लस घ्यावी, कधी घेऊ नये, मासिक पाळीत लस घेऊ नये किंवा घ्यावी, याबाबत बरेच गैरसमज समाजमाध्यमांवर फिरत आहेत. मात्र, मासिक पाळीवर लसीकरणाचा कुठलाही परिणाम होत नाही, असे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील स्त्री रोग व प्रसूतिशास्त्र विभाग प्रमुख डॉ. संजय बनसोडे यांनी स्पष्ट केले आहे. स्त्री आरोग्य आणि लसीकरण याबाबत त्यांनी ‘लोकमत’ला माहिती दिली आहे.

महिलांनी नोंदणीकृत दिवशी लस घ्यावी. मग ही तारीख मासिक पाळीमध्ये, पाळीपूर्वी, पाळीनंतर असली तरी हरकत नाही, असे त्यांनी म्हटले आहे. केंद्र सरकारच्या निर्देशानुसार गरोदरपणात लसीकरण करता येत नाही. इंग्लंड, अमेरिका या देशांमध्ये गरोदर महिलांना लसीकरण केले गेले आहे. लसीकरणामुळे गर्भाला व्यंग असल्याचे निदर्शनात आले नाही. गरोदरपणात लसीकरणामुळे गर्भातील बाळाला देखील अँटीबॉडीज मिळतात. अजून काही संशोधनानंतर आपल्या देशातही गरोदरपणात लसीकरणाला मान्यतेची शक्यता नाकारता येत नाही.

लस कुणी घ्यावी, कुणी घेऊ नये

१) अपत्याचे नियोजन असलेल्या जोडप्यांनी देखील लसीकरण करून घेण्यास हरकत नाही; पण लगेच एक ते दोन आठवड्यात टेस्ट ट्यूब बेबीच्या तयारीत असलेल्या जोडप्यांनी लसीकरण टाळावे.

२) लस घेतल्यानंतर गरोदरपणाचे निदान झाल्यास गरोदरपणाचे उपचार करावे. गर्भाला काहीही धोका होत नाही. त्यामुळे गर्भपात करण्याची गरज नाही. तसा विचारही मनात आणू नये. दुसरा डोस म्हणजेच बूस्टर डोस घेऊ नये.

३) प्रसूतीनंतर स्तनपानामुळे लस घेऊ नये, असे यंत्रणेचे निर्देश आहेत; पण पाश्चात्त्य देशात स्तनदा मातांना लस दिली जात आहे. स्तनपानाद्वारे अँटीबॉडीज बाळाला मिळतात. आपल्या देशात देखील याबाबत संशोधन होत असल्याने आपल्याकडेही चित्र बदलू शकते.

४) पीसीओडी, अंडाशयाच्या गाठी, मधुमेह, गर्भपिशवीच्या गाठी, रक्तदाब यातही लसीकरण सुरक्षित असल्याचे डॉ. बनसोडे यांनी सांगितले.

लस ही परिणामकारच

१) काेव्हिशिल्ड तसेच कोव्हॅक्सिन या दोन्ही प्रकारच्या लसी सारख्याच प्रमाणात उपयुक्त आहेत; पण लसीकरणात पहिला व दुसरा म्हणजेच बूस्टर डोस एकाच प्रकारच्या लसीचा असणे आवश्यक आहे. ताप येणे, थंडी वाजणे, डोके दुखणे, अंग दुखणे, जुलाब होणे हे दुष्परिणाम सौम्य प्रमाणात होऊ शकतात; पण सकारात्मक दृष्टिकोन व मानसिक तयारी यामुळे या दुष्परिणामांवर मात करता येते. आवश्यकता भासल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.

२) लसीकरणमुळे मृत्यू होत नाही. ज्या तुरळक मृत्यूंची नोंद झाली आहे, त्या रुग्णांना पूर्वीपासून इतर व्याधी होत्या. हा योगायोगाचा भाग आहे

३) दुष्परिणाम जाणवल्यास लस ही परिणामकारक आहे ही धारणा देखील चुकीची आहे. दुष्परिणाम झाले अथवा नाही झाले तरीही लस ही परिणामकारकच असल्याचे डॉ. बनसोडे यांनी म्हटले आहे.