शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

अंडरग्राऊंड केबलमुळे वीजपुरवठा खंडित होण्याची समस्या मिटणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 04:14 IST

जळगाव : दोन दिवसांपूर्वी पालकमंत्र्यांकडे झालेल्या बैठकीत शिवाजी नगर उड्डाणपुलावरील विद्युत खांब हटविण्याचा प्रश्न मार्गी लागला असून, महावितरणतर्फे या ...

जळगाव : दोन दिवसांपूर्वी पालकमंत्र्यांकडे झालेल्या बैठकीत शिवाजी नगर उड्डाणपुलावरील विद्युत खांब हटविण्याचा प्रश्न मार्गी लागला असून, महावितरणतर्फे या ठिकाणी अंडरग्राऊंड केबल टाकण्याचे नियोजन सुरू आहे. या केबलमुळे वारा-वादळ यामध्येही वीज पुरवठा खंडित होण्याची समस्या कायमची मिटणार असून, वीज खांब व तारांचा खर्चही काही प्रमाणात वाचणार असल्याचे महावितरणतर्फे सांगण्यात आले.

गेल्या दोन वर्षांपासून लागणाऱ्या निधीवरून शिवाजीनगर उड्डाण पुलाच्या कामाला अडथळा ठरणाऱ्या विद्युत खांब हटविण्याचे काम रखडले आहे. त्यामुळे या कामाला अधिकच विलंब झाला आहे. अखेर मनपाच्या शिल्लक निधीतून पालकमंत्र्यांनी दीड कोटीचा निधी उपलब्ध करून दिल्यानंतर महावितरणतर्फे लवकरच या कामाला सुरुवात केली जाणार आहे. मात्र, पुढील भवितव्याचा विचार करता या ठिकाणी विद्युत खांब टाकून नवीन लाईन न उभारता अंडरग्राऊंड केबल टाकण्यात येणार आहे. टॉवर चौकापासून ते शिवाजीनगरमधील पुलाच्या अंतरापर्यंत ही केबल टाकण्यात येणार आहे. परिसरातील ग्राहकांना विजेचे कनेक्शन देण्यासाठी ठिकठिकाणी फिडर उभारले जाणार आहेत. दरम्यान, येत्या दोन ते तीन दिवसांत महावितरणचे अधिकारीही केबल टाकण्याबाबत पाहणी करणार आहेत. या केबल टाकण्यासाठी साधारणतः तीन ते चार फुटांपर्यंत चरी खोदावी लागणार असल्याचे महावितरणतर्फे सांगण्यात आले.