शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
2
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
3
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
4
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
5
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
6
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
7
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
8
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
9
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
10
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
11
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
12
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
13
पाकिस्तानचं आर्थिक कंबरडं मोडणार? हल्ल्याच्या भीतीने शेअर बाजार धडाम; काय आहे परिस्थिती?
14
अभिनेत्री लग्नानंतर ६ वर्षांनी होणार आई, व्हिडिओ शेअर करत दिली गुडन्यूज; पतीही आहे अभिनेता
15
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
16
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
17
Nashik Crime: हर्षद पाटणकरच्या सांगण्यावरून करण चौरेची हत्या; तपासातून समोर आली खबळजनक माहिती
18
LoC Tensions Escalate: तणाव वाढताच पाकिस्तानी जवानांनी सीमेवरील चौक्या सोडल्या, झेंडेही हटवले
19
मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन पुन्हा अडचणीत; आता ₹2000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप
20
भारत-पाकिस्तान युद्ध झालेच तर पाकिस्तानच्या बाजुने कोणते देश? भारताला कोण मदत करू शकतो...

दोन कुटुंबे झाली निराधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2021 04:12 IST

कासोदा, ता. एरंडोल: अचानक आलेल्या आसमानी संकटात वीज कोसळल्याने तळई येथील दोन जणांचा मृत्यू ...

कासोदा, ता. एरंडोल: अचानक आलेल्या आसमानी संकटात वीज कोसळल्याने तळई येथील दोन जणांचा मृत्यू झाला. दोन कुटुंब निराधार झाली तर केवळ नशिबाने सात शेतकऱ्यांचा जणू पुनर्जन्मच झाला आहे.

दि.१७ आक्टोबर २०२० रोजी एरंडोल तालुक्यातील आडगाव येथे कापूस वेचणी करीत असतानाच अचानक आलेला पाऊस व वीज कोसळल्याने दोन शेतकऱ्यांचा असाच मृत्यू ओढवला होता. बुधवारी पुन्हा तळई येथे भोकरच्या झाडाखाली थांबलेल्या शेतकऱ्यांवर ही संकटरुपी वीज कडाडली, विक्रम दौलत चौधरी (माळी) हे जागीच ठार झाले तर भूषण अनिल पाटील यास उपचारासाठी जळगावी नेत असतांनाच रस्त्यातच त्याची प्राणज्योत मालवली.

यंदाच्या हंगामात नव्या दमाने शेती करावी, नवनवे आधुनिक प्रयोग करून उत्पादन वाढविण्याचे या शेतकऱ्यांचे स्वप्न क्षणार्धात निसर्गाच्या प्रकोपाचे धुळीस मिळाले आहे. भूषण तर अगदीच कोवळा मुलगा, यंदा ११व्या वर्गात होता. शिक्षणासोबतच पाण्याचे जार पुरवायचा त्याचा व्यवसायही सुरू होता. तीन बहिणींचा एकुलता भाऊ होता. कुटुंबाचा आधार होता. विक्रम चौधरी व भूषणवर दीड तासाच्या अंतराने अंत्यसंस्कार करण्यात आ.

शांताराम आनंदा धनगर (४३),योगेश रवींद्र धनगर (१८), रमेश कौतिक धनगर (५५) निवृत्ती रमेश धनगर (३८), संदीप वामन वाघ (३५), सुरेश हरी पाटील (३०) व विजय नामदेव नाईक (२५) हे इतर लोक केवळ नशीब बलवत्तर होते, म्हणून बचावले आहेत. या सगळ्याचा हा पुनर्जन्मच म्हणता येईल, अशा भावना यावेळी उपस्थित लोक व्यक्त करीत होते. आता या कुटुंबाला सरकारकडून मदत मिळेल ही, काही ठरावीक काळ अनेक लोक संवेदना व्यक्त करतील ही, पण हे दोन्ही व्यक्ती कुटुंबाचे प्रमुख आधार होते, ती पोकळी मात्र कधीही न भरून निघणारी आहे.

फोटो ओळ: तळई येथील हेच ते भोकरचे झाड,याच झाडाखाली आश्रयाला असलेल्या शेतकऱ्यांवर वीज कोसळली होती,त्यात दोघांना प्राण गमवावे लागले.