शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
2
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
3
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
4
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
5
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
6
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
7
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
8
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
9
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
10
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
11
पाकिस्तानसोबतच्या युद्धविरामावर असदुद्दीन ओवेसींनी उपस्थित केलं प्रश्नचिन्ह, सरकारला विचारले चार सवाल  
12
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
13
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
14
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
15
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
16
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
17
Operation Sindoor Live Updates: नागरोटा येथे लष्कराच्या तळावर गोळीबार, १ जवान जखमी
18
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
19
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video
20
Act of War: 'यापुढे कुठलाही दहशतवादी हल्ला हा देशाविरोधातील युद्ध मानलं जाणार’, केंद्र सरकारचा मोठा निर्णय

कडक निर्बंधातही आव्हाणे येथे निघाल्या बारा गाड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:17 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : तालुक्यातील आव्हाणे येथे बुधवारी मरीमाता यात्रा उत्सवानिमित्त हजारोंच्या उपस्थित बारा गाड्या ओढण्यात आल्या. विशेष ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : तालुक्यातील आव्हाणे येथे बुधवारी मरीमाता यात्रा उत्सवानिमित्त हजारोंच्या उपस्थित बारा गाड्या ओढण्यात आल्या. विशेष म्हणजे, या उत्सवादरम्यान पोलिसांचा बंदोबस्त असतानाही सोशल डिस्टंसिंगचा फज्जा उडवत हा उत्सव साजरा करण्यात आल्याने प्रशासनाच्या निर्बंधावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.

तालुक्यातील आव्हाणे येथे दरवर्षी मरीमाता यात्रोत्सवाचे आयोजन केले जाते. यावर्षीदेखील कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे हा यात्रोत्सव रद्द करण्यात आला. मात्र, अनेक वर्षांची परंपरा असलेल्या बारा गाड्या ओढण्याचा कार्यक्रम मात्र या ठिकाणी पार पडला आहे. प्रतीकात्मक स्वरूप म्हणून बारा गाड्याऐवजी एकच गाडे ओढण्यात आले असले तरी या कार्यक्रमादरम्यान हजारो नागरिकांची उपस्थिती होती.

पोलिसांच्या उपस्थितीत हजारोंचा जमाव एकत्र होतोच कसा ?

आव्हाणे गावाचा यात्रा उत्सव असताना तालुका पोलीस स्टेशनचे कर्मचारी सकाळपासून गावातच होते. त्यामुळे गावाच्या मुख्य बाजारपेठ भागात दुपारी तीन वाजेपर्यंत गर्दी झालेली नव्हती. मात्र, दुपारी ४ वाजेनंतर गावातील बसस्थानक परिसरात शेकडो नागरिकांची गर्दी होऊ लागली होती. त्यानंतर गावात बंदोबस्तासाठी अनेक पोलीस कर्मचारीदेखील दाखल झाले होते. मात्र, पोलिसांचा बंदोबस्त असतानादेखील गावाचा बारा गाड्या उत्सवादरम्यान हजारो नागरिक जमा झाले असतानाही पोलीस प्रशासनाकडून कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. विशेष म्हणजे, या कार्यक्रमाचा व्हिडिओ व छायाचित्र सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

पहिल्या लाटेत आव्हाणे गाव होते कोरोनाचा हॉटस्पॉट

कोरोनाच्या पहिल्या लाटेत जळगाव आव्हाणे हे गाव हॉटस्पॉट ठरले होते. या गावात आतापर्यंत २४५ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले असून १४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. अशा परिस्थितीतही या धार्मिक कार्यक्रमाला परवानगी कशी दिली, यावरदेखील आता प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. जळगावसारख्या शहरापासून हे गाव केवळ ७ किमी अंतरावर असून या ठिकाणी अशा प्रकारचा कार्यक्रम होत असतानाही जिल्हा प्रशासनाकडून कोणतीही कारवाई न झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

कोट.....

आमच्या हद्दीत लग्न लागू देत नाही. बारा गाड्यांचा विषय तर लांबच आहे. आव्हाण्यात कोणत्याही बारा गाड्या ओढल्या नाहीत. पोलिसांचे ठिकठिकाणी पाॅईंट लावण्यात आले आहेत.

- रविकांत सोनवणे, पोलीस निरीक्षक, तालुका पोलीस ठाणे