शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
3
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
4
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
5
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
6
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
7
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
8
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
9
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
10
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
11
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
12
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
13
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
14
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
15
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
16
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
17
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
18
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
19
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
20
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
Daily Top 2Weekly Top 5

बदल्यांची माहिती तयार, प्रतिक्षा शासन‌ आदेशाची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2021 04:17 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : पोलीस दलातील शिपाई ते साहाय्यक फौजदार या संवर्गातील बदलीपात्र अमलदारांची माहिती पोलीस अधीक्षक कार्यालय ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : पोलीस दलातील शिपाई ते साहाय्यक फौजदार या संवर्गातील बदलीपात्र अमलदारांची माहिती पोलीस अधीक्षक कार्यालय प्राप्त झालेली आहे. मात्र त्याला शासन आदेशाचा ब्रेक लागला आहे. राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने आदेश काढून सर्व बदल्यांना ३० जूनपर्यंत स्थगिती दिलेली आहे. हा आदेश पोलीस दलालाही लागू असल्याचे अखेर स्पष्ट झाले आहे.

कोरोनाचा संसर्ग वाढतच चाललेला आहे, त्यामुळे शासनाने ३० जूनपर्यंत कोणत्याही बदल्या न करण्याचा निर्णय घेतला आहे. हा आदेश ज्या दिवशी निघाला त्याच दिवशी सायंकाळी अप्पर पोलीस महासंचालक कुलवंतकुमार सारंगल यांनी पोलीस दलाचा आदेश काढला व त्यात बदल्याबाबत मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.

काय आहेत महासंचालकांचे आदेशअप्पर पोलीस महासंचालक कुलवंत कुमार सारंगल (आस्थापना) यांनी १० मे रोजी बदल्यांबाबत आदेश जारी केले आले आहेत. विहित कालावधी पूर्ण झालेले, विहित कालावधीत पूर्ण नाही परंतु, मुदतपूर्व बदलीसाठी सादर केलेली लेखी विनंती व प्रतिकूल अहवालावरुन करावयाची बदली या तीन प्रकारच्या मार्गदर्शक सूचना या आदेशात जारी केलेल्या आहेत. बदलीपात्र असलेल्या अमलदाराकडून माहिती मागविताना त्यांचे तीन पसंतीक्रम मागवून घ्यावे, बदलीवर नेमणूक देतांना त्यांच्या पसंतीक्रमानुसार तसेच पूर्वीच्या घटकास झालेला कालावधी विचारात घेऊन त्यांना उदाहरणार्थ जास्त कालावधी झालेल्या अंमलदारा पहिला पसंतीक्रम देण्यास प्राधान्य व त्यानंतर त्या क्रमानुसार दुसर्‍या व तिसर्‍या पसंतीच्या ठिकाणी नेमणूक देण्याची कार्यवाही करावी. जर तीनही पसंतीच्या ठिकाणी पदे रिक्त नसल्यास अन्य ठिकाणी नियुक्ती देण्यात यावी, असे या आदेशात म्हटले आहे.

प्रभारी अधिकारी बदलण्याचे संकेत

जिल्ह्यातील सर्वच पोलीस ठाण्यांमध्ये तसेच व अकार्यकारी शाखेत असलेले प्रभारी अधिकारी नवीनच आहेत. मात्र राज्यस्तरावर परमविर सिंह व सचिन वाझे या पोलीस अधिकाऱ्यांच्या प्रकरणाचे पडसाद राज्यातील इतर जिल्ह्यांमध्ये उमटत आहेत. जळगाव जिल्ह्यातही काही संकेत असून महत्त्वाच्या पदावरील प्रभारी अधिका-यांची उचलबांगडी होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. उचलबांगडीचे संकेत मिळाल्यानंतर काही अधिकाऱ्यांनी मुंबईवारीही केलेली आहे.

कोट....

३० जूनपर्यंत बदल्यांना स्थगितीचा शासन आदेश पोलीस दलालाही लागू आहे. जिल्हा पोलीस दलातील बदलीपात्र अमलदारांची माहिती तयार आहे. स्थगिती संपताच बदल्यांचे आदेश काढले जातील. यावेळी अंमलदारांना प्रत्यक्ष बोलावले जाईल.

- डॉ. प्रवीण मुंढे, पोलीस अधीक्षक