शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Blast: २ वर्षांपासून सुरू होता स्फोटकं जमवण्याचा जीवघेणा खेळ; डॉ शाहीन शाहिदची कबुली
2
प्रशांत किशोर यांची भविष्यवाणी खरी होणार? बिहार निवडणुकीच्या एक्झिट पोलने केले शिक्कामोर्तब!
3
रेखा झुनझुनवालांच्या पोर्टफोलिओतील पेनी स्टॉकची पुन्हा भरारी! ६ महिन्यात तोटा भरुन काढत ३४ टक्के वाढ
4
जपानचे १,००,००० येन भारतामध्ये किती रुपये होतात? तुम्हाला फायदा होतो की नुकसान, जाणून घ्या
5
सीमेपासून अवघ्या २० किमी अंतरावर नवं आव्हान?; बांगलादेश सैन्यानं भारताला दिलेला शब्द मोडला
6
Tata घराण्यात मोठा बदल, नोएल टाटांच्या मुलाला मिळाली मोठी जबाबदारी; परदेशातून घेतलंय शिक्षण
7
एके-47 ठेवणाऱ्या डॉ. शाहीनचे थेट महाराष्ट्राशी कनेक्शन; जैशच्या महिला विंगची निघाली मास्टरमाईंड
8
“जनतेची काम करतो म्हणून प्रत्येक समाज घटक ८-८ लाखाच्या फरकाने निवडून देतात”: अजित पवार
9
दिल्लीतील स्फोटामुळे 'कॉकटेल २'चं शूट पुढे ढकललं, आजपासूनच होणार होती सुरुवात
10
एकही रुपया न गुंतवता दरवर्षी कमावू शकता ₹२.८८ लाख; पाहा PPF च सीक्रेट, लोकही विचारतील कसं केलं?
11
धर्मेंद्र यांना रुग्णालयातून डिस्चार्ज; सनी देओलच्या टीमने दिलं स्टेटमेंट, 'त्यांचं तुमच्यावर..."
12
Govinda Hospitalised : ६१ वर्षीय गोविंदाची अचानक तब्येत बिघडली, झाला बेशुद्ध, जुहूच्या रुग्णालयात दाखल
13
ATP Finals 2025: खेळ पाहण्यासाठी आलेल्या दोन चाहत्यांचा मृत्यू, क्रीडाविश्वात शोक!
14
इंजिनीअरिंग, फार्मसी, एमबीएची सीईटी वर्षातून दोनदा, यंदा एप्रिलमध्ये पहिली, तर मेमध्ये दुसरी सीईटी परीक्षा
15
महायुतीच्या त्सुनामीमुळे विरोधकांत भीती, आशिष शेलार यांचा टोला
16
आजचे राशीभविष्य, १२ नोव्हेंबर २०२५: आजचा दिवस आनंदी; पण 'या' राशीला स्त्रीमुळे अडचणीचा धोका
17
पोस्टरमुळे समोर आला डॉक्टरांचा दहशतवादी कट; स्फोटकांचा तपास यशस्वी, पण दिल्लीत कशी झाली चूक?
18
Delhi Blast: दिल्ली बॉम्बस्फोटावर पाकिस्ताननं काय म्हटलं? तुर्कीनं तर हद्द ओलांडली!
19
Dharmendra Health Update: धर्मेंद्र यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज, डॉक्टरांनी दिले हेल्थ अपडेट
20
कार चालविणाऱ्या डॉक्टरचे दहशतवादी मॉड्युलशी संबंध, ठार झालेल्यांत समावेश

रेल्वेतून पडलेल्या जखमी प्रवाशासाठी रेल्वे धावली चक्क दीड किमी मागे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2020 17:13 IST

माणुसकीचे दर्शन : रेल्वे प्रशासन व ट्रेन लाईव्ह संघटनेच्या तत्परतेने तरुण रुखरूप

खडकदेवळा, ता.पाचोरा : नियमितपणे विद्यार्थी जळगावला महाविद्यालयात रेल्वेतून प्रवास करीत होता. गाडीतील प्रचंड गर्दीमुळे तोल जाऊन तो धावत्या रेल्वेतून अचानक खाली पडला. मात्र त्याचा जीव वाचविण्यासाठी रेल्वे चक्क दीड किमी मागे धावली आणि जखमी अवस्थेतील त्या तरुणावर प्रथमोपचार करून त्याला पुढील उपचारासाठी पाठविले. ही घटना गुरुवारी सकाळी सव्वा नऊ ते साडेनऊ वाजेच्या दरम्यान माहिजीजवळ घडली.६ रोजी ५११८१ क्रमांकाच्या देवळाली-भुसावळ शटलमधून दररोज अपडाऊन करणारा राहुल संजय पाटील (वय २२) हा विद्यार्थी जळगाव येथे आय.एम.आर. कॉलेजमध्ये शिक्षण घेत आहे. राहुल हा ६ रोजी पॅसेंजर (क्र.५११८१) मध्ये गर्दीत चढला व माहिजीजवळील रेल्वे खंबा क्र. ३८३ जवळ धावत्या रेल्वेतून पडून गंभीर जखमी झाला. या घटनेबाबत तत्काळ ट्रेन लाईव्ह प्रवासी संघटनेच्या सदस्यांनी संघटनेचे अध्यक्ष दिलीप पाटील यांना कळविले. पाटील यांनी पाचोरा स्टेशन प्रबंधक एस.टी. जाधव यांना घटनेबाबत माहिती दिली असता जाधव यांनी परधाडे येथील सहाय्यक स्टेशन मास्टर के.जे. बर्डे व माहिजी येथील सहाय्यक स्टेशन मास्टर ए.एस. पाल यांच्याशी संपर्क करुन आर.पी.एफ. विभागालाही याबाबत माहिती दिली. त्यानंतर पॅसेंजर थांबविण्यात आली. गार्ड व ड्रायव्हर यांनी आपसात चर्चा करून चौकशी केली. संघटनेकडून प्रशासनाला कळविण्यात आल्याने त्यांनीही ड्रायव्हरला विनंती आदेश केले. यावेळी प्रशासनाने माणुसकीची किंमत ठेवत देवळाली-भुसावळ शटल चक्क एक ते दीड किमी मागे घेत रेल्वे लाईनवर जखमी अवस्थेत पडलेल्या राहुल यास पॅसेंजरमध्ये बसविले. पुढील म्हसावद स्टेशनवर त्याच्यावर प्रथमोपचार करून त्यास पुढील उपचारासाठी रवाना करण्यात आले.ट्रेन मागे घेण्यात आल्याने व संबंधिताला वाचविण्यात यश आले. रेल्वे ड्रायव्हर, गार्ड व पाचोरा रेल्वे प्रशासनाचे आभार प्रवासी वगार्तून मानण्यात आले. अशा गर्दीला पर्याय म्हणून रेल्वेगाड्या वेळेवर धावणे, शटलला वाढीव कोच जोडणे, स्वतंत्र एम.एस.टी. कोच जोडणे, याबाबत तत्काळ दखल घेऊन उपाययोजना करावी, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे.

परधाडे- माहिजीदरम्यान रोजच्या वाढत्या गर्दीमुळे व ११०३९ महाराष्ट्र एक्स्प्रेस रोजच ३ ते ४ तास उशिरा धावत असल्यामुळे तसेच पयार्यी रेल्वे नसल्याने शटलचा सहारा सर्वच नियमित ये-जा करणारे प्रवासी घेतात. यामुळे या पॅसेंजरमध्ये प्रचंड गर्दी होते. त्यातून असे अपघात नित्याचेच होत असल्याने प्रशासनाने यावर उपायोजना करणे गरजेचे आहे.