शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वेतून पडलेल्या जखमी प्रवाशासाठी रेल्वे धावली चक्क दीड किमी मागे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2020 17:13 IST

माणुसकीचे दर्शन : रेल्वे प्रशासन व ट्रेन लाईव्ह संघटनेच्या तत्परतेने तरुण रुखरूप

खडकदेवळा, ता.पाचोरा : नियमितपणे विद्यार्थी जळगावला महाविद्यालयात रेल्वेतून प्रवास करीत होता. गाडीतील प्रचंड गर्दीमुळे तोल जाऊन तो धावत्या रेल्वेतून अचानक खाली पडला. मात्र त्याचा जीव वाचविण्यासाठी रेल्वे चक्क दीड किमी मागे धावली आणि जखमी अवस्थेतील त्या तरुणावर प्रथमोपचार करून त्याला पुढील उपचारासाठी पाठविले. ही घटना गुरुवारी सकाळी सव्वा नऊ ते साडेनऊ वाजेच्या दरम्यान माहिजीजवळ घडली.६ रोजी ५११८१ क्रमांकाच्या देवळाली-भुसावळ शटलमधून दररोज अपडाऊन करणारा राहुल संजय पाटील (वय २२) हा विद्यार्थी जळगाव येथे आय.एम.आर. कॉलेजमध्ये शिक्षण घेत आहे. राहुल हा ६ रोजी पॅसेंजर (क्र.५११८१) मध्ये गर्दीत चढला व माहिजीजवळील रेल्वे खंबा क्र. ३८३ जवळ धावत्या रेल्वेतून पडून गंभीर जखमी झाला. या घटनेबाबत तत्काळ ट्रेन लाईव्ह प्रवासी संघटनेच्या सदस्यांनी संघटनेचे अध्यक्ष दिलीप पाटील यांना कळविले. पाटील यांनी पाचोरा स्टेशन प्रबंधक एस.टी. जाधव यांना घटनेबाबत माहिती दिली असता जाधव यांनी परधाडे येथील सहाय्यक स्टेशन मास्टर के.जे. बर्डे व माहिजी येथील सहाय्यक स्टेशन मास्टर ए.एस. पाल यांच्याशी संपर्क करुन आर.पी.एफ. विभागालाही याबाबत माहिती दिली. त्यानंतर पॅसेंजर थांबविण्यात आली. गार्ड व ड्रायव्हर यांनी आपसात चर्चा करून चौकशी केली. संघटनेकडून प्रशासनाला कळविण्यात आल्याने त्यांनीही ड्रायव्हरला विनंती आदेश केले. यावेळी प्रशासनाने माणुसकीची किंमत ठेवत देवळाली-भुसावळ शटल चक्क एक ते दीड किमी मागे घेत रेल्वे लाईनवर जखमी अवस्थेत पडलेल्या राहुल यास पॅसेंजरमध्ये बसविले. पुढील म्हसावद स्टेशनवर त्याच्यावर प्रथमोपचार करून त्यास पुढील उपचारासाठी रवाना करण्यात आले.ट्रेन मागे घेण्यात आल्याने व संबंधिताला वाचविण्यात यश आले. रेल्वे ड्रायव्हर, गार्ड व पाचोरा रेल्वे प्रशासनाचे आभार प्रवासी वगार्तून मानण्यात आले. अशा गर्दीला पर्याय म्हणून रेल्वेगाड्या वेळेवर धावणे, शटलला वाढीव कोच जोडणे, स्वतंत्र एम.एस.टी. कोच जोडणे, याबाबत तत्काळ दखल घेऊन उपाययोजना करावी, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे.

परधाडे- माहिजीदरम्यान रोजच्या वाढत्या गर्दीमुळे व ११०३९ महाराष्ट्र एक्स्प्रेस रोजच ३ ते ४ तास उशिरा धावत असल्यामुळे तसेच पयार्यी रेल्वे नसल्याने शटलचा सहारा सर्वच नियमित ये-जा करणारे प्रवासी घेतात. यामुळे या पॅसेंजरमध्ये प्रचंड गर्दी होते. त्यातून असे अपघात नित्याचेच होत असल्याने प्रशासनाने यावर उपायोजना करणे गरजेचे आहे.