शहरं
Join us  
Trending Stories
1
India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल
2
सरकार शेतकरी कर्जमाफी कधीपर्यंत करणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी बैठकीनंतर सांगितला प्लॅन
3
IND vs AUS : "ना फिफ्टीचं सेलिब्रेशन, ना सेंच्युरीचं! विजयी धाव घेताच जेमिमाला अश्रू अनावर; म्हणाली...
4
"मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची?"; राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं, चढवला हल्ला
5
क्रिकेटच्या देवाकडून जेमी-हरमनप्रीतला शाब्बासकी! ऐतिहासिक विजय युवी, एबी आणि गंभीरलाही भावला
6
Sangli Crime: ‘व्हाईट हाऊस हॉटेल’च्या बारमध्ये मित्रानेच चिरला गळा, तरुणाचा जागेवरच मृत्यू
7
Jemimah Rodrigues Century : शाब्बास जेमी! घरच्या मैदानात अविस्मरणीय शतकी खेळीसह लुटली मैफील
8
एकीकडे दिलासा, मात्र दुसरीकडे बच्चू कडू, राजू शेट्टी यांच्यासह हजारो शेतकरी आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल
9
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
10
‘चाचा पीएमओ है हमारे’, एअरपोर्ट ऑथोरिटीत नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली बंटी-बबलीकडून ७ लाखांचा गंडा
11
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
12
Maoist Leader: ‘देवजी’च्या महासचिवपदी निवडीचा दावा सपशेल खोटा, आत्मसमर्पण करणाऱ्या 'चंद्राण्णा'वर साधला निशाणा
13
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
14
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
15
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
16
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
17
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
18
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम
19
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
20
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा

भाजीपाला विक्रेत्यांमुळे अजिंठा चौकात वाहतूक कोंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2021 04:08 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर दररोज होणाऱ्या भाजीपाला विक्रेत्यांच्या गर्दीमुळे सोमवारी सकाळी ८ वाजता अजिंठा ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर दररोज होणाऱ्या भाजीपाला विक्रेत्यांच्या गर्दीमुळे सोमवारी सकाळी ८ वाजता अजिंठा चौक ते आर. एल. चौकादरम्यान वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. भाजीपाला मार्केटमधून लिलाव करून येणारी वाहने व मार्केटसमोरील रस्त्यालगत भाजीपाला विक्रेत्यांनी थाटलेल्या दुकानांमुळे औरंगाबाद रस्त्यालगत मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. विशेष म्हणजे या ठिकाणी वाहतूक विभागाचा कोणताही कर्मचारी नसल्याने तब्बल दीड तास वाहतुकीचा खोळंबा या ठिकाणी झाला.

कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दररोज जिल्ह्यातून अनेक शेतकरी आपला माल घेऊन येत असतात. त्यातच बाजार समिती प्रशासनाने किरकोळ विक्रेत्यांना बाजार समितीत व्यवसाय करण्यास सद्यस्थितीत बंदी घातली आहे. यामुळे अनेक विक्रेते बाजार समितीच्या बाहेरच भाजीपाल्याची विक्री करत असतात. बाहेरगावाहून येणारी वाहने व बाजार समितीच्या मुख्य प्रवेशद्वारासमोरच भाजीपाला विक्रेत्यांनी थाटलेली दुकाने यामुळे अजिंठा चौकादरम्यानच्या रस्त्यालगत एकाच वेळी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. यामुळे महामार्गालगत होणाऱ्या वाहतुकीवर देखील याचा परिणाम झाला, बाजार समितीच्या भाजीपाला मार्केटमध्ये जाणाऱ्या प्रवेशद्वारासमोरच माल वाहतूक करणारी मोठी वाहने देखील खोळंबल्याने, महामार्गालगतच्या वाहनांना देखील ये-जा करण्यासाठी जागाच शिल्लक राहिली नाही. त्यामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूस वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या.

कामगार वर्गाला कामावर जायला झाला उशीर

शहरातील एमआयडीसी भागातील कंपन्यांमध्ये काम करणारे कामगार, सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास या रस्त्यावरून ये-जा करत असतात. तसेच अनेक वाहने देखील सकाळच्या वेळेस या ठिकाणावरून जात असतात. मात्र, प्रचंड वाहतूक कोंडीमुळे सगळीच वाहने या ठिकाणी खोळंबली होती. यामुळे कामगार वर्गाला देखील कामावर जाण्यास उशीर झाला. तब्बल दीड तास वाहतूक पूर्णपणे खोळंबल्याने, अजिंठा चौक ते काशिनाथ चौकापर्यंत वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. त्यात अनेक बेशिस्त वाहनधारकांनी शॉर्टकट काढण्याच्या नादामुळे वाहतुकीची कोंडी अधीकच वाढत गेली. त्यातच याठिकाणी वाहतूक विभागाचे कर्मचारी देखील नसल्याने वाहनधारकांनाच वाहतूक कर्मचाऱ्यांची भूमिका पार पाडावी लागली.

नेहमीचीच निर्माण झाली समस्या

कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोमवारी व शनिवारी जिल्हाभरातून येणाऱ्या भाजीपाल्याची आवक मोठ्या प्रमाणात असते. या दिवशी अनेक वाहने भरून माल बाजार समितीमध्ये येत असतो. यामुळे दर सोमवारी व शनिवारी या रस्त्यालगत वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत आहे. यासह अनेक विक्रेते रस्त्यालगतच व्यवसाय करत असल्याने देखील वाहतुकीवर मोठा परिणाम होत आहे. तसेच वाहतूक कर्मचारी व मनपा अतिक्रमण निर्मूलन विभागाचे देखील याकडे दुर्लक्ष होत असल्याने, या रस्त्यावरून सकाळी व सायंकाळी मार्ग काढणे देखील आता कठीण होत आहे. सोमवारी सकाळी देखील वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या, वाहतूक कोंडी वाढतच जात असल्याने तब्बल दीड तासानंतर एमआयडीसी पोलीस स्टेशनमधील कर्मचाऱ्यांनी येऊन वाहतूक कोंडी सुरळीत केली. तसेच सकाळी दहा वाजेनंतर अनेक विक्रेत्यांनीही आपला व्यवसाय गुंडाळल्याने या ठिकाणची वाहतूक कोंडी कमी होऊन, वाहनांचा मार्ग मोकळा झाला. मात्र, या ठिकाणी नेहमी होणाऱ्या वाहतूक कोंडीवर तोडगा काढण्यासाठी मनपा अतिक्रमण निर्मूलन विभाग व वाहतूक विभागाने लक्ष देण्याची मागणी वाहनधारकांकडून केली जात आहे.