शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

भाजीपाला विक्रेत्यांमुळे अजिंठा चौकात वाहतूक कोंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2021 04:08 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर दररोज होणाऱ्या भाजीपाला विक्रेत्यांच्या गर्दीमुळे सोमवारी सकाळी ८ वाजता अजिंठा ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर दररोज होणाऱ्या भाजीपाला विक्रेत्यांच्या गर्दीमुळे सोमवारी सकाळी ८ वाजता अजिंठा चौक ते आर. एल. चौकादरम्यान वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. भाजीपाला मार्केटमधून लिलाव करून येणारी वाहने व मार्केटसमोरील रस्त्यालगत भाजीपाला विक्रेत्यांनी थाटलेल्या दुकानांमुळे औरंगाबाद रस्त्यालगत मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. विशेष म्हणजे या ठिकाणी वाहतूक विभागाचा कोणताही कर्मचारी नसल्याने तब्बल दीड तास वाहतुकीचा खोळंबा या ठिकाणी झाला.

कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दररोज जिल्ह्यातून अनेक शेतकरी आपला माल घेऊन येत असतात. त्यातच बाजार समिती प्रशासनाने किरकोळ विक्रेत्यांना बाजार समितीत व्यवसाय करण्यास सद्यस्थितीत बंदी घातली आहे. यामुळे अनेक विक्रेते बाजार समितीच्या बाहेरच भाजीपाल्याची विक्री करत असतात. बाहेरगावाहून येणारी वाहने व बाजार समितीच्या मुख्य प्रवेशद्वारासमोरच भाजीपाला विक्रेत्यांनी थाटलेली दुकाने यामुळे अजिंठा चौकादरम्यानच्या रस्त्यालगत एकाच वेळी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. यामुळे महामार्गालगत होणाऱ्या वाहतुकीवर देखील याचा परिणाम झाला, बाजार समितीच्या भाजीपाला मार्केटमध्ये जाणाऱ्या प्रवेशद्वारासमोरच माल वाहतूक करणारी मोठी वाहने देखील खोळंबल्याने, महामार्गालगतच्या वाहनांना देखील ये-जा करण्यासाठी जागाच शिल्लक राहिली नाही. त्यामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूस वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या.

कामगार वर्गाला कामावर जायला झाला उशीर

शहरातील एमआयडीसी भागातील कंपन्यांमध्ये काम करणारे कामगार, सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास या रस्त्यावरून ये-जा करत असतात. तसेच अनेक वाहने देखील सकाळच्या वेळेस या ठिकाणावरून जात असतात. मात्र, प्रचंड वाहतूक कोंडीमुळे सगळीच वाहने या ठिकाणी खोळंबली होती. यामुळे कामगार वर्गाला देखील कामावर जाण्यास उशीर झाला. तब्बल दीड तास वाहतूक पूर्णपणे खोळंबल्याने, अजिंठा चौक ते काशिनाथ चौकापर्यंत वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. त्यात अनेक बेशिस्त वाहनधारकांनी शॉर्टकट काढण्याच्या नादामुळे वाहतुकीची कोंडी अधीकच वाढत गेली. त्यातच याठिकाणी वाहतूक विभागाचे कर्मचारी देखील नसल्याने वाहनधारकांनाच वाहतूक कर्मचाऱ्यांची भूमिका पार पाडावी लागली.

नेहमीचीच निर्माण झाली समस्या

कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोमवारी व शनिवारी जिल्हाभरातून येणाऱ्या भाजीपाल्याची आवक मोठ्या प्रमाणात असते. या दिवशी अनेक वाहने भरून माल बाजार समितीमध्ये येत असतो. यामुळे दर सोमवारी व शनिवारी या रस्त्यालगत वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत आहे. यासह अनेक विक्रेते रस्त्यालगतच व्यवसाय करत असल्याने देखील वाहतुकीवर मोठा परिणाम होत आहे. तसेच वाहतूक कर्मचारी व मनपा अतिक्रमण निर्मूलन विभागाचे देखील याकडे दुर्लक्ष होत असल्याने, या रस्त्यावरून सकाळी व सायंकाळी मार्ग काढणे देखील आता कठीण होत आहे. सोमवारी सकाळी देखील वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या, वाहतूक कोंडी वाढतच जात असल्याने तब्बल दीड तासानंतर एमआयडीसी पोलीस स्टेशनमधील कर्मचाऱ्यांनी येऊन वाहतूक कोंडी सुरळीत केली. तसेच सकाळी दहा वाजेनंतर अनेक विक्रेत्यांनीही आपला व्यवसाय गुंडाळल्याने या ठिकाणची वाहतूक कोंडी कमी होऊन, वाहनांचा मार्ग मोकळा झाला. मात्र, या ठिकाणी नेहमी होणाऱ्या वाहतूक कोंडीवर तोडगा काढण्यासाठी मनपा अतिक्रमण निर्मूलन विभाग व वाहतूक विभागाने लक्ष देण्याची मागणी वाहनधारकांकडून केली जात आहे.