शहरं
Join us  
Trending Stories
1
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
2
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
3
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
4
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
5
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी
6
प्रक्षेपण सुरू असतानाच झाला होता हल्ला, आता इस्राइलच्या नाकावर टिच्चून त्या महिला अँकरने दिल्या बातम्या  
7
"भारतीय एजंट्सनं अपहरण केलं होतं..," फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सीचा खळबळजनक दावा
8
आर. अश्विनच्या टीमवरील बॉल टेम्परिंगचा आरोप खरा की, खोटा? TNPL आयोजकांनी निर्णय दिला, आता...
9
तुम्ही 'या' क्षेत्रात काम करताय का? सरकार दरमहा देणार ३,००० रुपये, आजच अर्ज करा!
10
अहमदाबाद विमान अपघातात २३ वर्षीय क्रिकेटपटूचा दुर्दैवी मृत्यू; टीमने वाहिली श्रद्धांजली
11
कधीही अण्वस्त्र तयार करू शकणार नाही इराण? G7 शिखर परिषदेतून तेहरानला इशारा; या सर्व देशांचा इस्रायलला पाठिंबा
12
Groww, Zerodha सह टॉप ब्रोकर्सनं २ महिन्यांत गमावले ४.७ लाख अ‍ॅक्टिव्ह ग्राहक, काय आहे कारण?
13
Israel Iran Conflict : अमेरिका आता इराणवर हल्ला करणार? ट्रम्प यांनी दिला इशारा; म्हणाले, तेहरान रिकामे करा...
14
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
15
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
16
Devendra Fadnavis: स्थलांतरित शाळाबाह्य मुलांना जबरदस्तीने शाळेत आणा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन
17
'सैराट'मधील हा अभिनेता लवकरच गर्लफ्रेंडसोबत बांधणार लग्नगाठ, ती दिसायला आहे खूप सुंदर
18
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
19
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात
20
नाशिक भाजपाचा आज प्रवेशोत्सव ! माजी मंत्री बबनराव घोलप, उद्धव सेनेचे सुधाकर बडगुजर यांच्यासह दहा ते बारा माजी नगरसेवक कमळ हातात घेणार 

भाजीपाला विक्रेत्यांमुळे अजिंठा चौकात वाहतूक कोंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2021 04:08 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर दररोज होणाऱ्या भाजीपाला विक्रेत्यांच्या गर्दीमुळे सोमवारी सकाळी ८ वाजता अजिंठा ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर दररोज होणाऱ्या भाजीपाला विक्रेत्यांच्या गर्दीमुळे सोमवारी सकाळी ८ वाजता अजिंठा चौक ते आर. एल. चौकादरम्यान वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. भाजीपाला मार्केटमधून लिलाव करून येणारी वाहने व मार्केटसमोरील रस्त्यालगत भाजीपाला विक्रेत्यांनी थाटलेल्या दुकानांमुळे औरंगाबाद रस्त्यालगत मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. विशेष म्हणजे या ठिकाणी वाहतूक विभागाचा कोणताही कर्मचारी नसल्याने तब्बल दीड तास वाहतुकीचा खोळंबा या ठिकाणी झाला.

कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दररोज जिल्ह्यातून अनेक शेतकरी आपला माल घेऊन येत असतात. त्यातच बाजार समिती प्रशासनाने किरकोळ विक्रेत्यांना बाजार समितीत व्यवसाय करण्यास सद्यस्थितीत बंदी घातली आहे. यामुळे अनेक विक्रेते बाजार समितीच्या बाहेरच भाजीपाल्याची विक्री करत असतात. बाहेरगावाहून येणारी वाहने व बाजार समितीच्या मुख्य प्रवेशद्वारासमोरच भाजीपाला विक्रेत्यांनी थाटलेली दुकाने यामुळे अजिंठा चौकादरम्यानच्या रस्त्यालगत एकाच वेळी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. यामुळे महामार्गालगत होणाऱ्या वाहतुकीवर देखील याचा परिणाम झाला, बाजार समितीच्या भाजीपाला मार्केटमध्ये जाणाऱ्या प्रवेशद्वारासमोरच माल वाहतूक करणारी मोठी वाहने देखील खोळंबल्याने, महामार्गालगतच्या वाहनांना देखील ये-जा करण्यासाठी जागाच शिल्लक राहिली नाही. त्यामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूस वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या.

कामगार वर्गाला कामावर जायला झाला उशीर

शहरातील एमआयडीसी भागातील कंपन्यांमध्ये काम करणारे कामगार, सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास या रस्त्यावरून ये-जा करत असतात. तसेच अनेक वाहने देखील सकाळच्या वेळेस या ठिकाणावरून जात असतात. मात्र, प्रचंड वाहतूक कोंडीमुळे सगळीच वाहने या ठिकाणी खोळंबली होती. यामुळे कामगार वर्गाला देखील कामावर जाण्यास उशीर झाला. तब्बल दीड तास वाहतूक पूर्णपणे खोळंबल्याने, अजिंठा चौक ते काशिनाथ चौकापर्यंत वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. त्यात अनेक बेशिस्त वाहनधारकांनी शॉर्टकट काढण्याच्या नादामुळे वाहतुकीची कोंडी अधीकच वाढत गेली. त्यातच याठिकाणी वाहतूक विभागाचे कर्मचारी देखील नसल्याने वाहनधारकांनाच वाहतूक कर्मचाऱ्यांची भूमिका पार पाडावी लागली.

नेहमीचीच निर्माण झाली समस्या

कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोमवारी व शनिवारी जिल्हाभरातून येणाऱ्या भाजीपाल्याची आवक मोठ्या प्रमाणात असते. या दिवशी अनेक वाहने भरून माल बाजार समितीमध्ये येत असतो. यामुळे दर सोमवारी व शनिवारी या रस्त्यालगत वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत आहे. यासह अनेक विक्रेते रस्त्यालगतच व्यवसाय करत असल्याने देखील वाहतुकीवर मोठा परिणाम होत आहे. तसेच वाहतूक कर्मचारी व मनपा अतिक्रमण निर्मूलन विभागाचे देखील याकडे दुर्लक्ष होत असल्याने, या रस्त्यावरून सकाळी व सायंकाळी मार्ग काढणे देखील आता कठीण होत आहे. सोमवारी सकाळी देखील वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या, वाहतूक कोंडी वाढतच जात असल्याने तब्बल दीड तासानंतर एमआयडीसी पोलीस स्टेशनमधील कर्मचाऱ्यांनी येऊन वाहतूक कोंडी सुरळीत केली. तसेच सकाळी दहा वाजेनंतर अनेक विक्रेत्यांनीही आपला व्यवसाय गुंडाळल्याने या ठिकाणची वाहतूक कोंडी कमी होऊन, वाहनांचा मार्ग मोकळा झाला. मात्र, या ठिकाणी नेहमी होणाऱ्या वाहतूक कोंडीवर तोडगा काढण्यासाठी मनपा अतिक्रमण निर्मूलन विभाग व वाहतूक विभागाने लक्ष देण्याची मागणी वाहनधारकांकडून केली जात आहे.