शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

तोतया प्राध्यापकाने दोघींना फसवून थाटला तिसरीशी संसार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 04:22 IST

जळगाव : आधी एकीशी साखरपुडा, दुसरीशी तोतयेगिरी करुन तिसरीशी संसार थाटून तिच्याशी जबरदस्तीने अनैसर्गिक संबंध ठेवणाऱ्या पियुष हरिदास बावस्कर ...

जळगाव : आधी एकीशी साखरपुडा, दुसरीशी तोतयेगिरी करुन तिसरीशी संसार थाटून तिच्याशी जबरदस्तीने अनैसर्गिक संबंध ठेवणाऱ्या पियुष हरिदास बावस्कर या तोतया प्राध्यापकासह त्याचे वडील हरिदास खंडू बावस्कर, सासु वासंती बावस्कर व चुलत सासरे शंकर खंडू बावस्कर (सर्व रा.संभाजी कॉलनी, औरंगाबाद) यांच्याविरुध्द गुरुवारी जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जिल्हा पेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या मनिषा (वय २५,काल्पनिक नाव) हीचे औरंगाबाद येथील पियुष हरिदास बावस्कर याच्याशी ९ जानेवारी रोजी सरदार वल्लभभाई पटेल (लेवा भवन) येथे विवाह झाला होता. विवाहाच्या पूर्वी लग्न जुळविणाऱ्या लोकांनी तसेच पियुषच्या कुटुंबियांनी तो श्री साई पॉलिटेक्नीक कॉलेज ऑफ इंजिनियरींग औरंगाबाद या संस्थेत कायम स्वरुपी प्राध्यापक म्हणून नोकरीला असल्याचे सांगितले होते. लग्न झाल्यानंतर मनिषा सासरी गेली असता दोन दिवसानंतर पती दारु पिऊन आला व अश्लिल भाषेत शिवीगाळ करु लागला. यानंतर रोजच हा प्रकार सुरु असताना काही इतर महिला व मुलींशी त्याचे संबंध असल्याचे जाणवले, मोबाईलमध्ये रेकॉर्डींग तसेच व्हाटसअॅप झालेला संवाद दिसून आली. हा प्रकार सासु-सासऱ्यांना सांगितला असता त्यांनी मदत करण्याऐवजी धमकीच दिली. हा प्रकार वाढतच गेला. मद्याच्या नशेत पतीकडून जबरदस्तीने अनैसर्गिक कृत्य होत असल्याने पत्नीने हा प्रकार फोन करुन आई, वडिलांना सांगून घ्यायला औरंगाबाद येथे बोलावून घेतले. माहेरी येतान अंगावरील दागिनेही जबरदस्तीने काढून घेतल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

संस्थेच्या चेअरमनकडून दिशाभूल

दरम्यान, लग्न जमविण्याआधी मुलीच्या वडिलांनी पियुष खरच कायमस्वरुपी नोकरीला आहे का? याची चौकशी करण्यासाठी संस्थेच्या चेअरमनशी भेट घेतली असता, त्यांनी कायमस्वरुपी नोकरीला असल्याचे सांगितले होते. लग्नानंतर मुलगी, तिचा पती व कुटुंब चेअरमनकडे जेवणाला गेले असता तेथे त्यांच्या बोलण्यातच जाणवले की पियुष कायम नोकरीला नाही व त्याला साडे सहा लाखाचे पॅकेज पण नाही. लग्नाआधी चेअरमननेही दिशाभूल केल्याचे निष्पन्न झाले. दरम्यान, लग्न जमविण्यासाठी पियुष माझ्या संस्थेत नोकरीला असल्याचे खोटे सांगणाऱ्या चेअरमनलाही या गुन्ह्यात आरोपी केले जाणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

साखरपुड्याचे फोटो आढळले

दरम्यान, मनिषा हिने कागदपत्रांची पडताळणी केली असता त्याच्या जन्मतारखेत घोळ दिसून आला त्याशिवाय आधी एका मुलीसोबत झालेल्या साखरपुड्याचे फोटोही दिसून आले. माहेरी आल्यानंतर एका महिलेने फोन करुन तू त्याची लग्नाची तिसरी बायको आहे, असे सांगितले. त्याने अनेकांना असेच फसविल्याची माहिती या महिलेने दिली. पियुष याने लग्नाआधी बँकेतून तीन लाख रुपये कर्ज घेतले होते, ते कर्ज फेडण्यासाठी माहेरुन तीन लाख रुपये आणावे म्हणून देखील मनिषाला मारहाण करण्यात येत होती,असे फिर्यादीत नमूद आहे.