शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकनंतर पुण्यातही महायुती फुटीच्या उंबरठ्यावर; दोन्ही राष्ट्रवादीसोबत शिंदेसेना करणार युती?
2
BMC Elections: महानगरपालिकेसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली गर्जना; ७ उमेदवारांची यादी जाहीर!
3
पॉलिटिकल 'स्टेटस' ठेवाल तर सरकारी नोकरी गमावून बसाल ! कर्मचाऱ्यांसाठी काय नियम ?
4
वर्षानुवर्षे द्वेष मनात विषासारखा पेरला जातो..; एंजेल चकमाच्या मृत्यूवर राहुल-अखिलेश संतापले
5
नाशिकमध्ये महायुतीत फूट! भाजपा स्वबळावर तर एकनाथ शिंदे अन् अजित पवारांचा पक्ष युतीत लढणार
6
Video:साडेचार कोटींचा दरोडा! डोक्याला लावल्या बंदुका, ज्वेलरी शॉप कसे लुटले? सीसीटीव्ही बघा
7
Kishori Pednekar: अर्ज भरण्यासाठी फक्त एकच दिवस शिल्लक, अजूनही एबी फॉर्म नाही; किशोरीताईंची मातोश्रीवर धाव!
8
"जे झालं ते झालं! आता मला पुन्हा शून्यातून सुरुवात करावी लागेल"; असं का म्हणाली स्मृती मानधना?
9
ज्यांनी ज्यांनी धनुष्यबाणाला मतदान केलं ते स्वर्गात जातील; शिंदेसेनेचे नेते शहाजीबापूंचं विधान
10
न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या एकदिवसीय मालिकेपूर्वी विराटने घेतला मोठा निर्णय, आता...
11
BMC Election 2026: मुंबई मनपासाठी काँग्रेसकडून ८७ उमेदवारांची पहिली यादी प्रसिद्ध, ‘या’ चेहऱ्यांना संधी  
12
क्रिकेट खेळताना वाद, लग्नाच्या रिसेप्शनमध्ये चाकू हल्ला; कुणालचा रेल्वे स्टेशन जवळच्या झुडूपात सापडला मृतदेह
13
"अन्याय कितीही मोठा असला तरी..." मुंबईत भाजपाच्या माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत
14
IND vs NZ ODI : न्यूझीलंडविरुद्धच्या वनडेत बुमराह–हार्दिकला विश्रांती; श्रेयस अय्यरचं काय?
15
मनसेचा पहिला उमेदवार ठरला, राज ठाकरेंनी दिला AB फॉर्म; यशवंत किल्लेदार कुठून लढणार?
16
बाजारात 'मंदीचा' सोमवार! सेन्सेक्स-निफ्टी धडाधड कोसळले; 'या' ५ कारणांमुळे घसरण
17
दीड लाख पगार अन् राहण्या-खाण्याची सोय! रशियात भारतीयांसाठी मोठी संधी, असे मिळवा वर्क परमिट
18
Prakash Mahajan: "भाजपच्या घराला दार नाही, फक्त पहारेकरी" प्रकाश महाजन यांचा घणाघात!
19
"आमिर खानचे पैसे माझे नाहीत..."; बॉलिवूडपासून दूर असलेला इमरान खान सापडलेला आर्थिक संकटात, म्हणाला...
20
आता शिक्षक करणार भटक्या कुत्र्यांची मोजणी, ‘या’ राज्यातील सरकारने दिले आदेश
Daily Top 2Weekly Top 5

रस्त्यावरील खांब हटविण्याबाबत बांधकाम विभागाचे तीन वेळा पत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2019 14:44 IST

शिवाजीनगर उड्डाणपूल : बांधकाम विभागाचे तीन वेळा पत्र, आयुक्तांकडून उत्तर नाही

जळगाव : रेल्वे प्रशासनाने शिवाजीनगर उड्डाण पुलावरील रेल्वे हद्दीतील बहुतांश काम आटोपले आहे. दुसरीकडे रस्त्यावरील विद्युत खांब आणि जलवाहिनी असल्यामुळे मोठाच अडथळा निर्माण झाला आहे. ते दूर करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे मनपा आयुक्तांना तीन वेळा पत्र पाठविण्यात आले आहेत. मात्र, या पत्रांवर मनपा आयुक्तांकडून कुठलेही उत्तर देण्यात आलेले नसल्याची माहिती सूत्रांनी दिली.रेल्वे प्रशासनाने शिवाजी पूलावरील वाहतूक बंद करुन, २५ फेब्रुवारीपासून उड्डाण पूलावरील रस्ता जेसीबीच्या साहाय्याने खोदण्याच्या कामाला सुरुवात केली आहे. गेल्या आठवड्यांत खोदाईचे काम पूर्ण झाले असून, ९ एप्रिल रोजी गर्डर काढण्याचा अंतिम ठप्पाही पूर्ण केला जाणार आहे.रेल्वे प्रशासनाने कामाला सुरुवात केल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागानदेखील मक्तेदारामार्फत जोड रस्त्याच्या कामाला सुरुवात केली होती. यावेळी गर्डर काढण्यासाठी पुलाच्या खोदाईचे काम न करता, जोड रस्त्याच्या कामाला सुरुवात करण्याचे नियोजन बांधकाम विभागाचे होेते. मात्र, या ठिकाणी पत्र्या हनुमान मंदिरासमोर असलेले महावितरणचे खांब व जलवाहिनीमुळे हे काम सुुरुच करण्यात आले नव्हते.या संदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे विद्युत खांब व जलवाहिनी स्थलांतरित करण्यासंदर्भात तत्कालीन आयुक्त चंद्रकांत डांगे यांना पत्र पाठविले होते.मात्र, त्यांच्या या पत्रावर आयुक्तांकडून कुठलेही उत्तर देण्यात आले नाही. यानंतर पुन्हा आयुक्तांशी दोन वेळा पत्र व्यवहार करण्यात आला.पत्राला उत्तर मिळेनाशिवाजीनगर उड्डाणपुलाच्या कामासंदर्भात तत्कालीन जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांच्याकडे झालेल्या बैठकीत, जिल्हाधिकाऱ्यांनी मनपाला महावितरणकडून या ठिकाणचे विद्युत खांब व पाण्याचे पाईपलाईन स्थलांतरित करण्याच्या सूचना केल्या होत्या. या सुचनांना अनुसरुन सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे मनपा आयुक्तांना पत्र व्यवहार करण्यात येत होता.दीड महिन्यात तब्बल सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे आयुक्तांना तीन वेळा पत्र व्यवहार करण्यात आला. मात्र, पत्रांमुळे विद्युत खांब ना पाईपलाईनचे स्थलांतर झाले नसून, या पत्राला आयुक्तांकडून उत्तरही देण्यात आलेले नाही.या तारखांना दिली गेली पत्रसार्वजनिक बांधकाम विभागातर्फे अधिक्षक अभियंता व कार्यकारी अभियंता या नावाने मनपा आयुक्तांना तीन वेळा पत्र दिले गेले. यामध्ये पहिले पत्र पहिले पत्र २० फेब्रुवारीला, दुसरे ६ मार्चला व तिसरे ३० मार्चला दिले आहे.जिल्हा परिषदेजवळील पत्र्या हनुमान मंदिरापासून ते टॉवर चौकापर्यंत रस्त्याच्या मधोमध असलेली विद्युत खांबाची रांग स्थलांतरित करण्यासंदर्भात तीन वेळा आयुक्तांना पत्र दिले आहे. तसेच या ठिकाणी जल वाहिनी आहे. त्यादेखील स्थलांतरित करण्यासंदर्भात आयुक्तांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे. बांधकाम विभागातर्फे करण्यात येणाऱ्या पुलाच्या कामासाठी हे अडथळे हटणे गरजेचे आहे. मात्र, मनपाकडून आमच्या पत्राला कुठलेही उत्तर देण्यात आलले नाही. अडथळे दूर झाल्यावरच पुढील कामाला सुरुवात होईल.-प्रशांत सोनवणे, अधीक्षक अभियंता, सा. बां.विभाग, जळगावशिवाजीनगर उड्डाणपूलाच्या कामाचा आराखडा सार्वजनिक बांधकाम विभागाने तयार केला आहे. त्या बजेटमध्ये अडथळा ठरणाºया विद्युत लाईनच्या स्थलातरांचा व ग्राऊंड केबलचा खर्चही त्यांत समाविष्ट करणे गरजेचे आहे. त्या विद्युत लाईनवर व्यावसायिकांचे कनेक्शनदेखील आहेत. त्या संदर्भात महापालिका प्रशासनातर्फे सार्वजनिक बांधकाम विभागाला पत्र देण्यात आले आहे. मनपा अंतर्गंत येणारे विद्युत पोल व पाईपलाईनही लवकरच स्थलांतर करण्यात येईल.-डॉ.उदय टेकाळे, आयुक्त, मनपा