शहरं
Join us  
Trending Stories
1
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
3
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
4
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
5
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
6
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
7
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
8
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
9
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
10
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
11
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
12
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
13
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
14
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
15
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
16
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
17
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
18
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
19
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज

सारासार विचार करा उठाउठी।

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2021 04:19 IST

नाम धरा कंठी विठोबाचे.. सारासार विचार करा उठाउठी। नाम धरा कंठी विठोबाचे, तयाच्या चिंतने निरसेल संकट। तराल दुर्घट भवसिंधु, ...

नाम धरा कंठी विठोबाचे..

सारासार विचार करा उठाउठी। नाम धरा कंठी विठोबाचे, तयाच्या चिंतने निरसेल संकट। तराल दुर्घट भवसिंधु, जन्मोनिया कुळी वाचे स्मरे राम, धरी हाचि नेम अहर्निशी, तुका म्हणे कोटी कुळे ती पुनीत। भावें गाता गीत विठोबाचे... श्रीमंत श्रीसंत जगद्गुरू तुकोबाराय ।। या अभंगातून आपल्याला उपदेश करतात, महाराज म्हणतात अहो जन हो...

सार आणि असार यांचा विचार आपण मनुष्यजिवाने लागलीच केला पाहिजे आणि अनंतकोटी ब्रह्मांडनायक परमात्म्याचे नाम आपल्या कंठात धरलं पाहिजे. त्यानं काय होईल बरं का, आपल्या जीवनातली सगळी संकटे, बाधा टळून जातील आणि आपण ज्या मायेत अडकलो आहोत, म्हणजे त्या भवसागरातून आपल्याला भगवंत तारून नेईल. एवढा अमूल्य मनुष्य जीव आपल्या भगवंतकृपेने प्राप्त झाला, इतकी सुंदर आपल्याला नामस्मरण करायला वाचा दिली. ते रामनाम आपण रात्रंदिवस घेतलंच पाहिजे. मग असे जर निष्ठेने, अंतःकरण भावाने जर आपण नाम घ्यायला लागलोत, तर आपला उद्धार होईलच, यात शंकाच नाही. पण ज्या कुळात आपण जन्माला आलो, त्या कुळाचा उद्धार भगवंत करतील. म्हणून तुकोबाराय आपल्याला सांगतात, बाबा, नामामध्ये सार आहे, त्याच्यात आपलं हित आहे, आपण नाम घेतल्याने आपला उद्धार नक्कीच होणार आहे, असा हा हितकारक विचार त्याच्यात संपूर्ण सार भरलेला आहे... असा विचार मनुष्याने लगेच केला पाहिजे; कारण भगवंताचे नाम ह्या जगात सर्वश्रेष्ठ आहे, श्रेष्ठ होते आणि श्रेष्ठ राहील. सध्याची जी कोरोनाची स्थिती आपल्यासमोर आहे, त्यात आपल्याला सिद्ध झालेच आहे की, नाम हे खरं आहे, त्यात सार आहे.

निरूपण : हभप श्री मंगेश महाराज जोशी, जळगाव.