शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

जप्त कागदपत्रांचे फॉरेन्सिक ऑडिट होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2020 04:32 IST

जळगाव : भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टीस्टेट क्रेडिट पतसंस्था (बीएचआर) फसवणुकीच्या प्रकरणात तक्रारदारांनी जे आरोप केलेले आहेत, त्यानुसार त्याची पडताळणी ...

जळगाव : भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टीस्टेट क्रेडिट पतसंस्था (बीएचआर) फसवणुकीच्या प्रकरणात तक्रारदारांनी जे आरोप केलेले आहेत, त्यानुसार त्याची पडताळणी आता सुरू झाली असून, कारवाईदरम्यान जप्त करण्यात आलेली कागदपत्रे व इतर पुराव्यांचे फॉरेन्सिक ऑडिट केले जाणार असल्याची माहिती पुणे आर्थिक गुन्हे शाखेच्या उपायुक्त भाग्यश्री नवटके यांनी दिली. दरम्यान, या प्रकरणात अटकेत असलेल्या विवेक ठाकरे, सुजित वाणी व इतरांनी जामिनासाठी अर्ज दाखल केले असून त्यावर १६ डिसेंबर रोजी कामकाज होणार आहे.

अवसायक जितेंद्र कंडारे व इतरांनी संगनमत करुन काही कोटी रुपयांची मालमत्ता कवडीमोल किमतीत विकली असल्याचे ठेवीदारांचे म्हणणे आहे. पुणे शहर आर्थिक गुन्हे शाखेने जप्त केलेली कागदपत्रे तपासून त्यातून खरोखरच आरोपींनी या मालमत्ता किती कमी किमतीला विकल्या. त्यांचा त्यावेळी बाजारभाव काय होता आणि प्रत्यक्षात त्या कितीला विकण्यात आल्या याचा शोध घेण्यात येत आहे. त्याचबरोबर आरोपी कंडारे, विवेक ठाकरे व इतरांनी ठेवीदारांना आश्वासन दिल्याप्रमाणे त्यांचे १०० टक्के पैसे परत केले नाहीत. खात्यावर एक रक्कम दाखविण्यात आली व प्रत्यक्षात ठेवीदारांना त्यापेक्षा किती कमी रक्कम देण्यात आली, याचा तपास केला जात आहे. त्यासाठी प्रत्येक ठेवीदाराचे खाते आणि आरोपींकडून जप्त केलेली कागदपत्रे याचा ताळमेळ लावण्याचे काम सध्या सुरू आहे. या कामाला साधारण एक महिन्याचा कालावधी लागू शकतो, असे आताच्या परिस्थितीवरुन दिसून येते. प्रत्यक्ष ही कागदपत्रे तपासणी सुरू केल्यावर त्यातून आणखी काही माहिती पुढे आल्यावर त्याअनुषंगाने तपास वाढत जाण्याची शक्यता आहे.

कागदपत्रांची जुळवाजुळव करताना कसरत

याबाबत आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलीस उपायुक्त भाग्यश्री नवटके यांनी सांगितले की, मुख्य फिर्यादीमध्ये जे जे आरोप करण्यात आले आहेत. त्याचे सध्या व्हेरिफिकेशन करण्यात येत आहे. त्याचबरोबर फॉरेन्सिक ऑडिट करण्यात येणार आहे. त्यावरुन नेमकी आर्थिक परिस्थिती समजणार आहे. सध्या त्यादृष्टीने तपास करण्यात येत आहे.यातील आरोपींनी ठेवीदारांना शंभर टक्के पैसे परत करण्याचे दाखवून प्रत्यक्षात केवळ ३० टक्के रक्कमच ठेवीदारांना दिली आहे. याबाबत नेमकी परिस्थिती काय? किती ठेवीदारांना कमी रक्कम देण्यात आली, विवेक ठाकरे याने किती जणांची कागदपत्रे स्वत:कडे घेतली. त्यातील किती मूळ कागदपत्रे आहेत. अशा सर्व कागदपत्रांची जुळवाजुळव करण्याचे काम सध्या सुरू आहे. हे काम करताना यंत्रणेची कमालीची कसरत होत आहे.

तिघांचा जामिनासाठी अर्ज

या प्रकरणातील ५ जणांची रविवारी न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. त्यापैकी विवेक ठाकरे, सुजित वाणी यांच्यासह तिघांनी विशेष न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल केला आहे. त्याचबरोबर प्रकाश वाणी, अनिल पगारिया यांना न्यायालयाने अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर करताना आठवड्यातून दोन दिवस पोलिसांना तपासासाठी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार सध्या त्यांच्याकडून कागदपत्रांची खातरजमा करण्याचे काम सुरू आहे. याशिवाय कुणाल शहा याचा अंतरिम अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे. या सर्व अर्जाची येत्या १६ डिसेंबर रोजी सुनावणी ठेवण्यात आली आहे.