शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

नागरिकांच्या सहनशीलतेचा होतोय उद्रेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2021 04:12 IST

सुशील देवकर नागरिकांच्या सहनशीलतेचा होतोय उद्रेक अमृत योजना व भुयारी गटार योजनेच्या कामासाठी शहरातील सर्वच रस्ते खोदण्यात आल्याने व ...

सुशील देवकर

नागरिकांच्या सहनशीलतेचा होतोय उद्रेक

अमृत योजना व भुयारी गटार योजनेच्या कामासाठी शहरातील सर्वच रस्ते खोदण्यात आल्याने व त्यापैकी अनेक रस्त्यांची साधी डागडुजीही न केल्याने गेल्या दोन वर्षांपासून नागरिकांना रस्त्याने ये-जा करण्यासाठी त्रास सहन करावा लागत आहे. नागरिकांमध्ये या समस्येकडे दुर्लक्ष करणाऱ्या मनपाबाबतच नाराजी वाढत आहे. याबाबत सुरुवातीला मनपात सत्ताधारी असलेल्या भाजपाकडून दुर्लक्ष झाल्यानेच व लोकांच्या नाराजीची जाणीव असलेल्या नगरसेवकांनी भाजपला रामराम ठोकत महापौर निवडणुकीत सेनेला पाठिंबा दिला आहे. भाजपाने ज्या ठिकाणी अमृत योजनेचे काम झाले आहे, त्या रस्त्यांचे काम तातडीने सुरू करण्याचा निर्णय घेणे व त्याची अंमलबजावणी करणे अपेक्षित होते. मात्र भाजपाच्या कार्यकाळात केवळ कामांचे ठराव करणे व त्यानंतर पुन्हा त्यात बदल करून सुधारित ठराव करण्याचेच काम झाले. रस्त्यांवर खड्डे आणि धुळीचे साम्राज्य निर्माण झाले. खराब रस्त्यांमुळे त्रस्त नागरिकांनी सहनशीलता दाखवली. मात्र त्यांच्यात नाराजी दिवसेंदिवस वाढत आहे. आता सत्तांतर होऊन मनपात सेनेची सत्ता आली आहे. मात्र सेनेने पुन्हा नवीन ठराव केले. ते मंजूर होऊन काम सुरू होण्याआधीच पावसाळा सुरू झाला. त्यामुळे पावसाळ्यानंतरच नवीन रस्त्यांचे काम सुरू होईल. दरम्यानच्या काळात रस्ते दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले. मात्र ते देखील सर्व ठिकाणी झालेले नाही. तसेच मक्तेदारानेही अमृत गटारीचे काम केल्यानंतर खोदलेल्या रस्त्याची दुरुस्ती करणे अपेक्षित असताना अनेक ठिकाणी रस्ते खराब अवस्थेत आहेत. तर भुयारी गटार योजनेत मक्तेदाराने काम झाल्यावर खोदलेल्या रस्त्याची दुरुस्ती करण्याची तरतूदच करारात समाविष्ट केलेली नाही. त्यामुळे भुयारी गटार योजनेचे काम झालेल्या रस्त्यांच्या दुरुस्तीचे कामही रखडले आहे. त्यात आता पावसाळा सुरू झाल्याने आधीच खराब झालेल्या रस्त्यांवर चिखल होऊन वाहन चालविणेच काय पायी चालणेही मुश्कील होत असल्याने नाराजी वाढत आहे. त्याचाच परिपाक शनिवारी प्रभाग क्र.१६ मधील घटनेत झाला. अमृत योजना तसेच भुयारी गटारीचे अर्धवट काम करून सोडून दिल्यामुळे प्रभाग क्रमांक १६ मधील नागरिकांचे खराब रस्ते, खड्डे तसेच धुळीमुळे अतोनात हाल होत आहेत. त्यासंदर्भात नागरिकांनी शनिवारी सकाळी अमृत योजनेच्या अधिकाऱ्यांना समस्या मांडण्यासाठी बोलविले. त्यावेळी नागरिकांनी संताप व्यक्त करीत अक्षरश: अमृतच्या अधिकाऱ्यांची आरती करीत नाराजी व्यक्त केली. मनपातील सत्ताधाऱ्यांनी नागरिकांच्या या नाराजीची आता तरी गांभीर्याने दखल घ्यावी, यापुढे असे अनुचित प्रकार होणार या नाहीत, या दृष्टीने तातडीने उपाययोजना करीत नागरिकांच्या समस्या मार्गी लावण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. अन्यथा नागरिकांची सहनशीलता संपली तर संतापाचा उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही.