शहरं
Join us  
Trending Stories
1
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
2
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
3
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
4
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
5
महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
6
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
7
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
8
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
9
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
10
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
11
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
12
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
13
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
14
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
15
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
16
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
17
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
18
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
19
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
20
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
Daily Top 2Weekly Top 5

नागरिकांच्या सहनशीलतेचा होतोय उद्रेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2021 04:12 IST

सुशील देवकर नागरिकांच्या सहनशीलतेचा होतोय उद्रेक अमृत योजना व भुयारी गटार योजनेच्या कामासाठी शहरातील सर्वच रस्ते खोदण्यात आल्याने व ...

सुशील देवकर

नागरिकांच्या सहनशीलतेचा होतोय उद्रेक

अमृत योजना व भुयारी गटार योजनेच्या कामासाठी शहरातील सर्वच रस्ते खोदण्यात आल्याने व त्यापैकी अनेक रस्त्यांची साधी डागडुजीही न केल्याने गेल्या दोन वर्षांपासून नागरिकांना रस्त्याने ये-जा करण्यासाठी त्रास सहन करावा लागत आहे. नागरिकांमध्ये या समस्येकडे दुर्लक्ष करणाऱ्या मनपाबाबतच नाराजी वाढत आहे. याबाबत सुरुवातीला मनपात सत्ताधारी असलेल्या भाजपाकडून दुर्लक्ष झाल्यानेच व लोकांच्या नाराजीची जाणीव असलेल्या नगरसेवकांनी भाजपला रामराम ठोकत महापौर निवडणुकीत सेनेला पाठिंबा दिला आहे. भाजपाने ज्या ठिकाणी अमृत योजनेचे काम झाले आहे, त्या रस्त्यांचे काम तातडीने सुरू करण्याचा निर्णय घेणे व त्याची अंमलबजावणी करणे अपेक्षित होते. मात्र भाजपाच्या कार्यकाळात केवळ कामांचे ठराव करणे व त्यानंतर पुन्हा त्यात बदल करून सुधारित ठराव करण्याचेच काम झाले. रस्त्यांवर खड्डे आणि धुळीचे साम्राज्य निर्माण झाले. खराब रस्त्यांमुळे त्रस्त नागरिकांनी सहनशीलता दाखवली. मात्र त्यांच्यात नाराजी दिवसेंदिवस वाढत आहे. आता सत्तांतर होऊन मनपात सेनेची सत्ता आली आहे. मात्र सेनेने पुन्हा नवीन ठराव केले. ते मंजूर होऊन काम सुरू होण्याआधीच पावसाळा सुरू झाला. त्यामुळे पावसाळ्यानंतरच नवीन रस्त्यांचे काम सुरू होईल. दरम्यानच्या काळात रस्ते दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले. मात्र ते देखील सर्व ठिकाणी झालेले नाही. तसेच मक्तेदारानेही अमृत गटारीचे काम केल्यानंतर खोदलेल्या रस्त्याची दुरुस्ती करणे अपेक्षित असताना अनेक ठिकाणी रस्ते खराब अवस्थेत आहेत. तर भुयारी गटार योजनेत मक्तेदाराने काम झाल्यावर खोदलेल्या रस्त्याची दुरुस्ती करण्याची तरतूदच करारात समाविष्ट केलेली नाही. त्यामुळे भुयारी गटार योजनेचे काम झालेल्या रस्त्यांच्या दुरुस्तीचे कामही रखडले आहे. त्यात आता पावसाळा सुरू झाल्याने आधीच खराब झालेल्या रस्त्यांवर चिखल होऊन वाहन चालविणेच काय पायी चालणेही मुश्कील होत असल्याने नाराजी वाढत आहे. त्याचाच परिपाक शनिवारी प्रभाग क्र.१६ मधील घटनेत झाला. अमृत योजना तसेच भुयारी गटारीचे अर्धवट काम करून सोडून दिल्यामुळे प्रभाग क्रमांक १६ मधील नागरिकांचे खराब रस्ते, खड्डे तसेच धुळीमुळे अतोनात हाल होत आहेत. त्यासंदर्भात नागरिकांनी शनिवारी सकाळी अमृत योजनेच्या अधिकाऱ्यांना समस्या मांडण्यासाठी बोलविले. त्यावेळी नागरिकांनी संताप व्यक्त करीत अक्षरश: अमृतच्या अधिकाऱ्यांची आरती करीत नाराजी व्यक्त केली. मनपातील सत्ताधाऱ्यांनी नागरिकांच्या या नाराजीची आता तरी गांभीर्याने दखल घ्यावी, यापुढे असे अनुचित प्रकार होणार या नाहीत, या दृष्टीने तातडीने उपाययोजना करीत नागरिकांच्या समस्या मार्गी लावण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. अन्यथा नागरिकांची सहनशीलता संपली तर संतापाचा उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही.