शहरं
Join us  
Trending Stories
1
बँक चौकात रात्रीतून उभा केला सावित्रीबाई फुलेंचा पुतळा; जयंतीच्या पूर्वसंध्येलाच रंगले नाट्य!
2
Mira-Bhayandar: मीरा भाईंदरमध्ये ९५ जागांसाठी ४३५ उमेदवारांत चुरस; भाजपात नाराजीचा सूर कायम!
3
Nagpur: काँग्रेसमध्ये 'ऑल वेल', पण भाजपची डोकेदुखी वाढली; ६ बंडखोरांचा माघार घेण्यास नकार!
4
Sanjay Raut: "लोकशाहीच्या नावानं झुंडशाही सुरू" बिनविरोध निवडीवरून राऊत संतापले, दिला महत्त्वाचा इशारा!
5
Eknath Shinde: महायुतीचे उमेदवार कशामुळं बिनविरोध निवडून आले? एकनाथ शिंदेंनी सांगितलं त्यामागचं खरं कारण!
6
Obscene Content: अश्लील कंटेंटवरून सरकारचा एलन मस्क यांना इशारा, ७२ तासांत मागितला अहवाल!
7
मतदानापूर्वीच महायुतीचं अर्धशतक! कोणत्या महापालिकेत किती उमेदवार बिनविरोध विजयी झाले? वाचा यादी
8
T20 World Cup 2026: क्विंटन डी कॉक, डेव्हिड मिलर, बेबी एबी; दक्षिण आफ्रिकेने उतरवला तगडा संघ
9
महापालिका निवडणुकीचे चित्र स्पष्ट! ७८ जागांवर ३८१ उमेदवार, अनेक प्रभागात चौरंगी-बहुरंगी लढत
10
"मुंबईचे लुटारू तुम्ही, रखवालदार आम्ही"; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर नाव न घेता जहरी टीका
11
पनवेल महानगरपालिकेत मतदानाआधीच विजयाचा गुलाल, महायुतीचे तब्बल सात नगरसेवक बिनविरोध
12
Solapur BJP: सोलापुरात भाजपच्या दोन गटांत मोठा राडा, माजी नगरसेवकाचं कार्यालय फोडलं, नेमका वाद काय?
13
महाराष्ट्रात फक्त मराठीच सक्तीची, साहित्य संमेलनातून मुख्यमंत्र्यांचा स्पष्ट संदेश 
14
"...तर निकाल वेगळा लागला असता"; ठाकरे बंधू युतीवर देवेंद्र फडणवीसांनी मतांचं 'गणित' उलगडलं
15
Shreyas Iyerचे न्यूझीलंडविरूद्ध Team India मध्ये पुनरागमन शक्य, पण BCCIने ठेवली 'ही' एक अट
16
'राहुल गांधी अन् भारत विरोधी लॉबी...', उमर खालिदसाठी आलेल्या 'त्या' पत्रांवरुन भाजपची टीका
17
साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून मुख्यमंत्र्यांची फोनाफोनी; कुणाशी आणि काय बोलले स्वतःच सांगितलं!
18
मुंबईचा महापौर हिंदू होईल आणि तो मराठीच असेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलं स्पष्ट
19
आदित्य-अमित ठाकरेंकडून जाहीरनामा प्रसिद्ध; ७०० फुटांपर्यंत घरपट्टी माफ, महिलांना १५०० रुपये स्वाभिमान निधी
20
R Ashwin: "यंदाचा टी-२० विश्वचषक कोणीही पाहणार नाही"; रविचंद्रन अश्विन असं का म्हणाला?
Daily Top 2Weekly Top 5

फवारणीसाठीही शेतात पाणी नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2021 04:20 IST

मका, तूर, उडीद, मूग, सोयाबीन पिकेही खराब होत असून, पाण्याअभावी वाढ खुंटत चालली आहे. शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत असून, आतुरतेने ...

मका, तूर, उडीद, मूग, सोयाबीन पिकेही खराब होत असून, पाण्याअभावी वाढ खुंटत चालली आहे. शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत असून, आतुरतेने वाट पाहत आहे. अद्याप या परिसरात एकही दमदार पाऊस झाला नसून, नदी, नाले शेतातील विहिरी कोरडेठाक आहेत. नदी, नाल्यांनाही पाणी नसल्याने जनावरांना पिण्याच्या पाण्याची उणीव भासत आहे.

फवारणीसाठी पाणीही नाही

शेतातील पिके सध्या मोठी झाली असून, रोगराईचा प्रादुर्भाव झाल्याने वेळोवेळी फवारणी करावी लागत आहे. शेतातील विहिरींनी पातळी गाठली असून, काहींच्या शेतात पाणीही नसल्याने गावातून विकत टाकी घ्यावी लागत आहे. काहींना हात पंपावरून आणून शेतात फवारणी करावी लागत असल्याची मोठी समस्या निर्माण झाली आहे. पावसाअभावी शेतकरी वर्ग चिंतातुर झाला आहे. वाकोदसह परिसरात रखरखते उन्ह पडत असून, पावसाने पावसाचा कोणताच पत्ता दिसत नाही.

परिसर पावसावर अवलंबून

वाकोदसह जामनेर परिसरात शेतकरी वर्ग मोठा असून, २० टक्के वगळता पूर्णतः शेतकरी वर्गाची मान्सूनच्या पावसावर शेती अवलंबून असते. गेल्या तीन वर्षांपासून दुष्काळाच्या झळा शेतकरी वर्गाला सोसाव्या लागत असतानाच, यंदाही पावसाच्या लहरीपणामुळे शेतकरी चांगलाच आर्थिक संकटात सापडला आहे. कर्जाच्या खाईत अडकण्याची चिन्हे दिसत आहे.

दिवसभरात वेळोवेळी मोसम बदलतोय

सकाळी आभाळ, दुपारी कडक उन्ह, संध्याकाळी ढगाळ वातावरण तर रात्री थंड वाऱ्यासह पावसाच्या आगमनाचे चिन्ह पाहता, वेळावेळात मोसम बदलत असल्याने नेमके पावसाचे आगमन होणार, तरी कधी अशा विवंचनेत शेतकरी अडकला आहे.

महिनाभरापासून पावसाने दडी मारल्याने कपाशी पिकांवर रोगराई पडत आहे, तर काही ठिकाणी पावसाअभावी खराब होत आहे. मकाही खराब होत असून, रोगाने थैमान मांडल्याने हातची पिके वाया जात आहे. शेतावर मोठा पैसा खर्च झाला असून, उत्पन्न हातातून जाताना दिसत आहे.

- दिलीप पाटील, शेतकरी, वडाळी, ता.जामनेर

परिसरात पाऊस नसल्याने यंदा पहिल्यांदाच पाण्याची मोठी समस्या निर्माण होत आहे. शेतात लावलेल्या पिकांवर फवारणीसाठीही पाणी उपलब्ध नसल्याने टाकीभर पाणी विकत आणून फवारणी करावी लागत आहे, तसेच पाण्याअभावी जनावरांचे पाणी पिण्याचेही हाल होत आहेत.

- ईश्वर कोळी, शेतकरी, कुंभारी, ता.जामनेर