शहरं
Join us  
Trending Stories
1
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
2
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
3
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
4
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
5
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
6
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
7
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
8
पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
9
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
10
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
11
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
12
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
13
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
14
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
15
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
16
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
17
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
18
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
19
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
20
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

ऊर्जामंत्र्यांशी चर्चा करूनही तोडगा नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 04:17 IST

महावितरण : काम बंद आंदोलनामुळे प्रशासकीय कामकाज खोळंबले जळगाव : फ्रंटलाइन वर्कर्सचा दर्जा देण्याच्या मागणीसह इतर मागण्यांसाठी कृती समितीच्या ...

महावितरण : काम बंद आंदोलनामुळे प्रशासकीय कामकाज खोळंबले

जळगाव : फ्रंटलाइन वर्कर्सचा दर्जा देण्याच्या मागणीसह इतर मागण्यांसाठी कृती समितीच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांची ऊर्जामंत्र्यांसोबत चर्चा होऊनही यातून कुठलाही तोडगा न निघाल्यामुळे महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी तिसऱ्या दिवशीही कामबंद आंदोलन सुरूच ठेवले. दरम्यान, कर्मचाऱ्यांच्या या आंदोलनामुळे महावितरणचे प्रशासकीय कामकाज खोळंबळे आहे.

कोरोनाच्या भयावह परिस्थितीतही काम करणाऱ्या महावितरणच्या कर्मचाऱ्यांना फ्रंटलाइन वर्कर्सचा दर्जा देण्यासह वीज कर्मचाऱ्यांचे व त्यांच्या कुटुंबातील सदस्यांचे लसीकरण करावे, कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या वीज कर्मचाऱ्याला महाराष्ट्र शासनाप्रमाणे ५० लाख अनुदान द्यावे, कोरोनामुळे वीज बिल वसुलीची सक्ती करू नये आदी मागण्यांसाठी कृती समितीने शासनाला नोटीस देऊनही शासनातर्फे वीज कर्मचाऱ्यांच्या कुठल्याही मागण्या मान्य केलेल्या नाहीत. तसेच याबाबत ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्याशी कृती समितीच्या राज्यस्तरीय पदाधिकाऱ्यांची चर्चा होऊनही यातूनही अद्याप कुठलाही तोडगा निघालेला नाही.

शासनाकडून काही मागण्या मान्य करण्यात येत आहेत, तर काही टाळण्यात येत आहेत. कर्मचाऱ्यांच्या सर्व मागण्या मान्य कराव्यात, यासाठी कृती समितीचा पाठपुरावा सुरू आहे. त्यामुळे कृती समितीने जोपर्यंत शासनाकडून मागण्या मान्य होत नाही, तोपर्यंत कामबंद आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्णय घेतला असल्याचे सांगण्यात आले.

इन्फो :

सध्याच्या कोरोनाच्या अवघड परिस्थितीतही महावितरणचे कर्मचारी जीव धोक्यात घालून काम करत आहेत. त्यांना शासनाने फ्रंटलाइन वर्कर म्हणून घोषित करून सर्व सुविधा द्याव्यात, ही आमची प्रमुख मागणी आहे. या मागण्यांबाबत ऊर्जामंत्र्यांशी चर्चा करूनही कुठलाही तोडगा निघालेला नाही. जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत आमचे आंदोलन सुरू राहणार आहे.

-पराग चौधरी, उपाध्यक्ष, सबऑर्डिनेट इंजिनिअर्स असोसिएशन तथा कृती समिती सदस्य

इन्फो

कामबंद आंदोलनामुळे प्रशासकीय कामकाज ठप्प

महावितरणच्या कर्मचारी व अधिकाऱ्यांचे तीन दिवसांपासून सुरू असलेल्या कामबंद आंदोलनामुळे महावितरणची अनेक प्रशासकीय कामे ठप्प झाली आहेत. त्यामुळे ग्राहकांच्या विजेबाबत असणाऱ्या समस्या सुटण्यास विलंब होत आहे. त्यामुळे महावितरण, शासनाने कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत लवकर तोडगा काढावा किंवा पर्यायी व्यवस्था करण्याची मागणी नागरिकांमधून केली जात आहे.