शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
2
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
3
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
4
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
5
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
6
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
7
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
8
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
9
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
10
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
11
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
12
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
13
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
14
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
15
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
16
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
17
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
18
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
19
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!

ऊर्जामंत्र्यांशी चर्चा करूनही तोडगा नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 04:17 IST

महावितरण : काम बंद आंदोलनामुळे प्रशासकीय कामकाज खोळंबले जळगाव : फ्रंटलाइन वर्कर्सचा दर्जा देण्याच्या मागणीसह इतर मागण्यांसाठी कृती समितीच्या ...

महावितरण : काम बंद आंदोलनामुळे प्रशासकीय कामकाज खोळंबले

जळगाव : फ्रंटलाइन वर्कर्सचा दर्जा देण्याच्या मागणीसह इतर मागण्यांसाठी कृती समितीच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांची ऊर्जामंत्र्यांसोबत चर्चा होऊनही यातून कुठलाही तोडगा न निघाल्यामुळे महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी तिसऱ्या दिवशीही कामबंद आंदोलन सुरूच ठेवले. दरम्यान, कर्मचाऱ्यांच्या या आंदोलनामुळे महावितरणचे प्रशासकीय कामकाज खोळंबळे आहे.

कोरोनाच्या भयावह परिस्थितीतही काम करणाऱ्या महावितरणच्या कर्मचाऱ्यांना फ्रंटलाइन वर्कर्सचा दर्जा देण्यासह वीज कर्मचाऱ्यांचे व त्यांच्या कुटुंबातील सदस्यांचे लसीकरण करावे, कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या वीज कर्मचाऱ्याला महाराष्ट्र शासनाप्रमाणे ५० लाख अनुदान द्यावे, कोरोनामुळे वीज बिल वसुलीची सक्ती करू नये आदी मागण्यांसाठी कृती समितीने शासनाला नोटीस देऊनही शासनातर्फे वीज कर्मचाऱ्यांच्या कुठल्याही मागण्या मान्य केलेल्या नाहीत. तसेच याबाबत ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्याशी कृती समितीच्या राज्यस्तरीय पदाधिकाऱ्यांची चर्चा होऊनही यातूनही अद्याप कुठलाही तोडगा निघालेला नाही.

शासनाकडून काही मागण्या मान्य करण्यात येत आहेत, तर काही टाळण्यात येत आहेत. कर्मचाऱ्यांच्या सर्व मागण्या मान्य कराव्यात, यासाठी कृती समितीचा पाठपुरावा सुरू आहे. त्यामुळे कृती समितीने जोपर्यंत शासनाकडून मागण्या मान्य होत नाही, तोपर्यंत कामबंद आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्णय घेतला असल्याचे सांगण्यात आले.

इन्फो :

सध्याच्या कोरोनाच्या अवघड परिस्थितीतही महावितरणचे कर्मचारी जीव धोक्यात घालून काम करत आहेत. त्यांना शासनाने फ्रंटलाइन वर्कर म्हणून घोषित करून सर्व सुविधा द्याव्यात, ही आमची प्रमुख मागणी आहे. या मागण्यांबाबत ऊर्जामंत्र्यांशी चर्चा करूनही कुठलाही तोडगा निघालेला नाही. जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत आमचे आंदोलन सुरू राहणार आहे.

-पराग चौधरी, उपाध्यक्ष, सबऑर्डिनेट इंजिनिअर्स असोसिएशन तथा कृती समिती सदस्य

इन्फो

कामबंद आंदोलनामुळे प्रशासकीय कामकाज ठप्प

महावितरणच्या कर्मचारी व अधिकाऱ्यांचे तीन दिवसांपासून सुरू असलेल्या कामबंद आंदोलनामुळे महावितरणची अनेक प्रशासकीय कामे ठप्प झाली आहेत. त्यामुळे ग्राहकांच्या विजेबाबत असणाऱ्या समस्या सुटण्यास विलंब होत आहे. त्यामुळे महावितरण, शासनाने कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत लवकर तोडगा काढावा किंवा पर्यायी व्यवस्था करण्याची मागणी नागरिकांमधून केली जात आहे.