शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
2
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
3
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
4
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
5
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
6
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
7
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
8
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
9
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
10
'जर तरची गोष्ट' नाटकाचा तरुण दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड; ४२व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन
11
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
12
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
13
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
14
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
15
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
16
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
17
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
18
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
19
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दराचा नवा उच्चांक, चांदीच्या दरात ७,२१४ रुपयांची वाढ; सोन्याच्या दरातही जोरदार तेजी
20
नोकरी गेली खड्ड्यात, आज राजीनामा देणारच, कारण...; ढसाढसा रडत शिक्षिकेने बनवला Video
Daily Top 2Weekly Top 5

दोन महिन्यांपासून नळांना पाणी पुरवठा नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2021 04:17 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : जुने जळगावातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर नगरातील २० ते २५ रहिवाशांच्या नळांना गेल्या दोन महिन्यांपासून ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : जुने जळगावातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर नगरातील २० ते २५ रहिवाशांच्या नळांना गेल्या दोन महिन्यांपासून पाणी येणे बंद झाले आहे. यामुळे रहिवाशांना दुसरीकडून पिण्याचे पाणी आणावे लागत आहे. या बाबत रहिवाशांनी मनपा पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांकडे अनेकदा तक्रारी केल्या. मात्र,अद्यापही पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी आमच्या तक्रारीची दखल घेतली नसल्याची खंत या भागातील रहिवाशांनी ''लोकमत'' कडे व्यक्त केली.

शहराच्या मध्यवर्ती असलेल्या या भागात प्रत्येक नागरिकाकडे नळ कनेक्शन आहे. परिसरात सार्वजनिक बोअरवेल अथवा कुपनलिका नसल्याने नागरिकांना या नळानद्वारेच पाणी साठा करावा लागतो. मात्र,या ठिकाणच्या २० ते २५ रहिवाशांच्या नळांना काही पाणी येत नाही. विशेष म्हणजे गेल्या दोन महिन्यांपासून हा प्रकार सुरू आहे. ऐन उन्हाळ्यात या नागरिकांची पाण्यासाठी भटकंती होत आहे. पाईपलाईन मध्ये गाळ किंवा कुठेतरी गळती होत असल्याने नळांना पाणी येणे बंद झाले असल्याचे रहिवाशांनी सांगितले.

इन्फो :

तक्रार करूनही दखल नाही

या भागातील रहिवाशांनी सांगितले की, नळांना पाणी येत नसल्याबाबत मनपाच्या या भागातील अधिकाऱ्यांना भेटून तक्रार केली.यावेळी त्यांनी या बाबत पाहणी करणार असल्याचे आश्वासन या भागातील नागरिकांना दिले. माञ, संबंधित अधिकारी फक्त आश्वासन देत असल्यामुळे, येथील काही रहिवाशांनी मनपाच्या पाणी पुरवठा विभागात जाऊन, तेथील अधिकाऱ्यांकडेही तक्रार केली असल्याचे सांगितले. विशेष म्हणजे दोन महिन्यात पाच ते सहा वेळा त्यांनी पाणी पुरवठा विभागाकडे तक्रार केली असल्याचे सांगितले. मात्र, आश्वासना व्यक्तिरिक्त अद्याप या अधिकाऱ्यांनी पाणी टंचाईची समस्या दूर केली नसल्याचे या रहिवाशांनी सांगितले.

इन्फो :

दोन महिन्यांपासून नळाला पाणी येत नाही. अचानक पाणी कसे बंद झाले, याबाबत मनपा प्रशासनाकडे आम्ही रहिवाशांनी तक्रार केली आहे. परंतु, अद्याप मनपाचे कुठलेही अधिकारी या ठिकाणी आले नाही. दोन महिन्या पासून आम्हाला पाणी टंचाईचा त्रास सहन करावा लागत आहे.

विमलबाई भालेराव, रहिवासी

नळांना पाणी येत नसल्याने, आम्हाला दुसरीकडून पाणी आणावे लागत आहे. मात्र, यात पिण्याचे पाणीही पूर्ण होत नाही. तसेच या ठिकाणी सार्वजनिक नळ अथवा बोअरवेल नसल्याने खूपच हाल होत आहेत. दोन महिन्यापासून ऐन उन्हाळ्यात आम्हाला पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे.

आशाबाई भालेराव,रहिवासी

या पाणी पुरवठ्याच्या समस्येबाबत या भागातील मनपाच्या पाणी पुरवठा अधिकाऱ्यांकडे अनेकदा प्रत्यक्ष भेटुन तक्रार केली. या बाबत त्यांना वारंवार भेटूनही अद्याप दखल घेतलेली नाही. या रहिवाशांना इकडून-तिकडून पाणी आणावे लागत आहे. या प्रकाराकडे आता महापौरांनी लक्ष देण्याची गरज आहे.

सतीश बागुल, रहिवासी

मनपाच्या अधिकाऱ्यांना नागरिकांच्या समस्येशी काही घेणे-देणे नाही. दोन महिन्यापासून तक्रार करूनही अधिकाऱ्यांनी पाण्याची समस्या सोडविली नाही. या बेजबाबदार अधिकाऱ्यांवर आयुक्तांनी कारवाई करायला हवी, तरच हे अधिकारी नागरीकांच्या समस्या सोडवतील.

गौरव बागुल,रहिवासी