शहरं
Join us  
Trending Stories
1
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार
2
"पार्थ पवारांकडून खुलासा घेणे गरजेचे; उद्योग विभागाचा या प्रकरणाशी संबंध नाही"; शिंदे गटाच्या मंत्र्यांनी स्पष्टच सांगितले
3
जीएसटी कमी पडला की काय...! टाटा, मारुती, होंडापासून सर्व कंपन्यांनी इअर एंड डिस्काऊंट सुरु केले...
4
सुरेश रैना, शिखर धवन यांना ईडीचा झटका; कोट्यवधी रुपयांची संपत्ती जप्त, कोणत्या मालमत्तांचा समावेश?
5
१ कोटींचं घर अवघ्या ११ लाखांत, EWS कोट्यातील ७२ जणांना लॉटरी; योगी आदित्यनाथ यांनी कमाल
6
बाजार 'लाल' रंगात बंद! निफ्टी २५,५२० च्या खाली, IT वगळता सर्वच क्षेत्रांत दबाव; 'या' कारणांचा झाला परिणाम
7
बिहारमध्ये राडा! उपमुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर हल्ला; दुसरीकडे सीपीएम आमदाराला मारहाण, गाडी फोडली
8
Ravi Shastri On Shubman Gill : शुभमन गिल आधीच होतोय ट्रोल, त्यात शास्त्रींच्या कमेंटची भर, म्हणाले...
9
लॅपटॉपच्या स्क्रीनवर धूळ बसली आहे? टिश्यू पेपर की कापड कशाने साफ कराल? 'या' टिप्स येतील कामी
10
सैनिकी शाळेत १२ वर्षीय मुलाचा गूढ मृत्यू,'त्या' बंद दारामागे काय घडले?; बहिणीचा गंभीर आरोप
11
सोशल मीडियाच्या ट्रॉलिंगचा बळी; माफी मागितली तरी छळ थांबेना, तरुणाने अखेर जीवन संपवले
12
बदल्याची आग! तरुणाने नकार देताच 'ती' संतापली, ११ राज्यांमधील शाळांना दिली बॉम्बची धमकी
13
"14 तारखेला 11 वाजेपर्यंत लालू अँड कंपनीचा..."; अमित शाह स्पष्टच बोलले, घुसखोरांसंदर्भात काय म्हणाले?
14
Anil Ambani ED: अनिल अंबानींची पुन्हा चौकशी होणार, ED नं १४ नोव्हेंबरला बोलावलं; प्रकरण काय?
15
विजय देवराकोंडा-रश्मिका मंदाना 'या' महिन्यात लग्न करणार? काही दिवसांपूर्वीच झालेला साखरपुडा
16
बायकोला ब्रेन ट्युमर, नवऱ्याने मृत्यूच्या दारातून परत आणलं; मराठी रीलस्टार कपलच्या रिअल लाइफ स्टोरीवर येतोय साऊथ मुव्ही
17
भाजप कार्यकर्त्याने आधी दिल्लीत नंतर बिहारमध्ये मतदान केले; राहुल गांधींनंतर आप नेत्याने आरोप केला
18
Canada Visa Rules : कॅनडाने व्हिसा नियमांमध्ये केला मोठा बदल, भारतावर काय परिणाम होईल?
19
SBI नं रचला इतिहास, मार्केट कॅप १०० अब्ज डॉलर्सच्या पार; देशातील दिग्गजांच्या यादीत सामील
20
"माझ्या पप्पांना अडकवण्यात आलंय"; वडील जेलमध्ये, लेकीने अभ्यास सोडून केला प्रचार

दोन महिन्यांपासून नळांना पाणी पुरवठा नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2021 04:17 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : जुने जळगावातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर नगरातील २० ते २५ रहिवाशांच्या नळांना गेल्या दोन महिन्यांपासून ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : जुने जळगावातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर नगरातील २० ते २५ रहिवाशांच्या नळांना गेल्या दोन महिन्यांपासून पाणी येणे बंद झाले आहे. यामुळे रहिवाशांना दुसरीकडून पिण्याचे पाणी आणावे लागत आहे. या बाबत रहिवाशांनी मनपा पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांकडे अनेकदा तक्रारी केल्या. मात्र,अद्यापही पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी आमच्या तक्रारीची दखल घेतली नसल्याची खंत या भागातील रहिवाशांनी ''लोकमत'' कडे व्यक्त केली.

शहराच्या मध्यवर्ती असलेल्या या भागात प्रत्येक नागरिकाकडे नळ कनेक्शन आहे. परिसरात सार्वजनिक बोअरवेल अथवा कुपनलिका नसल्याने नागरिकांना या नळानद्वारेच पाणी साठा करावा लागतो. मात्र,या ठिकाणच्या २० ते २५ रहिवाशांच्या नळांना काही पाणी येत नाही. विशेष म्हणजे गेल्या दोन महिन्यांपासून हा प्रकार सुरू आहे. ऐन उन्हाळ्यात या नागरिकांची पाण्यासाठी भटकंती होत आहे. पाईपलाईन मध्ये गाळ किंवा कुठेतरी गळती होत असल्याने नळांना पाणी येणे बंद झाले असल्याचे रहिवाशांनी सांगितले.

इन्फो :

तक्रार करूनही दखल नाही

या भागातील रहिवाशांनी सांगितले की, नळांना पाणी येत नसल्याबाबत मनपाच्या या भागातील अधिकाऱ्यांना भेटून तक्रार केली.यावेळी त्यांनी या बाबत पाहणी करणार असल्याचे आश्वासन या भागातील नागरिकांना दिले. माञ, संबंधित अधिकारी फक्त आश्वासन देत असल्यामुळे, येथील काही रहिवाशांनी मनपाच्या पाणी पुरवठा विभागात जाऊन, तेथील अधिकाऱ्यांकडेही तक्रार केली असल्याचे सांगितले. विशेष म्हणजे दोन महिन्यात पाच ते सहा वेळा त्यांनी पाणी पुरवठा विभागाकडे तक्रार केली असल्याचे सांगितले. मात्र, आश्वासना व्यक्तिरिक्त अद्याप या अधिकाऱ्यांनी पाणी टंचाईची समस्या दूर केली नसल्याचे या रहिवाशांनी सांगितले.

इन्फो :

दोन महिन्यांपासून नळाला पाणी येत नाही. अचानक पाणी कसे बंद झाले, याबाबत मनपा प्रशासनाकडे आम्ही रहिवाशांनी तक्रार केली आहे. परंतु, अद्याप मनपाचे कुठलेही अधिकारी या ठिकाणी आले नाही. दोन महिन्या पासून आम्हाला पाणी टंचाईचा त्रास सहन करावा लागत आहे.

विमलबाई भालेराव, रहिवासी

नळांना पाणी येत नसल्याने, आम्हाला दुसरीकडून पाणी आणावे लागत आहे. मात्र, यात पिण्याचे पाणीही पूर्ण होत नाही. तसेच या ठिकाणी सार्वजनिक नळ अथवा बोअरवेल नसल्याने खूपच हाल होत आहेत. दोन महिन्यापासून ऐन उन्हाळ्यात आम्हाला पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे.

आशाबाई भालेराव,रहिवासी

या पाणी पुरवठ्याच्या समस्येबाबत या भागातील मनपाच्या पाणी पुरवठा अधिकाऱ्यांकडे अनेकदा प्रत्यक्ष भेटुन तक्रार केली. या बाबत त्यांना वारंवार भेटूनही अद्याप दखल घेतलेली नाही. या रहिवाशांना इकडून-तिकडून पाणी आणावे लागत आहे. या प्रकाराकडे आता महापौरांनी लक्ष देण्याची गरज आहे.

सतीश बागुल, रहिवासी

मनपाच्या अधिकाऱ्यांना नागरिकांच्या समस्येशी काही घेणे-देणे नाही. दोन महिन्यापासून तक्रार करूनही अधिकाऱ्यांनी पाण्याची समस्या सोडविली नाही. या बेजबाबदार अधिकाऱ्यांवर आयुक्तांनी कारवाई करायला हवी, तरच हे अधिकारी नागरीकांच्या समस्या सोडवतील.

गौरव बागुल,रहिवासी