शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange: '...तोपर्यंत मुंबई सोडणार नाही', नोटीसनंतर मनोज जरांगेंचा मुख्यमंत्री फडणवीसांना इशारा
2
Manoj Jarange Patil Maratha Morcha Live: बस… आता थांबा, नामुष्की टाळायची असेल तर आंदोलन संपवा, सरकारला सहकार्य करा; जरांगेंना कुणाचा सल्ला?
3
औषधांवर २०० टक्क्यांपर्यंत टॅरिफ लावण्याचा डोनाल्ड ट्रम्प यांचा प्लॅन; भारतावर किती होणार परिणाम?
4
सोन्याने गाठली विक्रमी पातळी! तुमच्या शहरात एक तोळ्याचा आजचा भाव काय? अचानक का आली तेजी?
5
तुळजाभवानीच्या पुजारी मंडळावरून पेटला वाद, आजी-माजी पदाधिकारी आमने-सामने
6
आंदोलनात बेकायदेशीर कृत्ये, लवकरात लवकर मैदान रिकामं करा; मनोज जरांगेंना पाठवलेल्या पोलिसांच्या नोटीसमध्ये काय?
7
UAE चा कॅप्टन Muhammad Waseem नं साधला मोठा डाव! हिटमॅन रोहित शर्माचा वर्ल्ड रेकॉर्ड मोडला
8
भारत-रशिया मैत्री पाहून अमेरिका भडकली, ट्रम्प यांचे सल्लागार संतापले; म्हणाले, 'आमच्यासोबत...!'
9
"ती काम करत नाही, पण मी...", मृणालने अनुष्कावर साधला निशाणा? सलमानचा 'सुलतान' नाकारल्याचा दावा
10
Parivartani Ekadashi 2025: ज्यांना आयुष्यात परिवर्तन घडवायचे आहे, त्यांनी 'असे' करा एकादशी व्रत!
11
अनंत चतुर्दशी २०२५: गणेशोत्सवाची सांगता; पाहा, मान्यता, २०२६ मध्ये कधी येणार गणपती बाप्पा?
12
Mitchell Starc T20I Retirement : आगामी टी-२० वर्ल्ड कप आधी स्टार गोलंदाजाने घेतला निवृत्तीचा निर्णय; जाणून घ्या त्यामागचं कारण
13
४ राजयोगात परिवर्तिनी एकादशी: ९ राशींचे कल्याण-भरभराट, सुबत्ता-शुभ-लाभ; धनलक्ष्मी प्रसन्न!
14
GST बैठकीच्या पार्श्वभूमीवर शेअर बाजारात तेजी; रिलायन्समध्ये सर्वाधिक वाढ तर 'हे' स्टॉक्स घसरले
15
अनवाणी चालत बाप्पाच्या दर्शनाला पोहोचला सलमान खान, पळत पळतच कारजवळ आला अन्...
16
Punjab Flood: अर्धा पंजाब पाण्यात! १३०० गावांना पुराचा वेढा, हजारो लोक बेघर; २९ जणांचा मृत्यू
17
Parivartani Ekadashi 2025: परिवर्तनी एकादशी; चातुर्मासाचा मध्यंतर, यादिवशी श्रीहरी श्रीविष्णूंची बदलतात कूस!
18
Maharashtra Rain: राज्यात पाऊस पुन्हा धुमाकूळ घालणार, आठ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
19
गणेशोत्सव साजरा करत नाही आलिया? ट्रोल झाल्यानंतर दिलं सडेतोड उत्तर; फोटो शेअर करत म्हणाली...
20
'ही' आंतरराष्ट्रीय बँक भारतातून गाशा गुंडाळण्याच्या तयारीत? ग्राहकांच्या पैशांचं काय होणार?

दोन महिन्यांपासून नळांना पाणी पुरवठा नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2021 04:17 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : जुने जळगावातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर नगरातील २० ते २५ रहिवाशांच्या नळांना गेल्या दोन महिन्यांपासून ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : जुने जळगावातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर नगरातील २० ते २५ रहिवाशांच्या नळांना गेल्या दोन महिन्यांपासून पाणी येणे बंद झाले आहे. यामुळे रहिवाशांना दुसरीकडून पिण्याचे पाणी आणावे लागत आहे. या बाबत रहिवाशांनी मनपा पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांकडे अनेकदा तक्रारी केल्या. मात्र,अद्यापही पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी आमच्या तक्रारीची दखल घेतली नसल्याची खंत या भागातील रहिवाशांनी ''लोकमत'' कडे व्यक्त केली.

शहराच्या मध्यवर्ती असलेल्या या भागात प्रत्येक नागरिकाकडे नळ कनेक्शन आहे. परिसरात सार्वजनिक बोअरवेल अथवा कुपनलिका नसल्याने नागरिकांना या नळानद्वारेच पाणी साठा करावा लागतो. मात्र,या ठिकाणच्या २० ते २५ रहिवाशांच्या नळांना काही पाणी येत नाही. विशेष म्हणजे गेल्या दोन महिन्यांपासून हा प्रकार सुरू आहे. ऐन उन्हाळ्यात या नागरिकांची पाण्यासाठी भटकंती होत आहे. पाईपलाईन मध्ये गाळ किंवा कुठेतरी गळती होत असल्याने नळांना पाणी येणे बंद झाले असल्याचे रहिवाशांनी सांगितले.

इन्फो :

तक्रार करूनही दखल नाही

या भागातील रहिवाशांनी सांगितले की, नळांना पाणी येत नसल्याबाबत मनपाच्या या भागातील अधिकाऱ्यांना भेटून तक्रार केली.यावेळी त्यांनी या बाबत पाहणी करणार असल्याचे आश्वासन या भागातील नागरिकांना दिले. माञ, संबंधित अधिकारी फक्त आश्वासन देत असल्यामुळे, येथील काही रहिवाशांनी मनपाच्या पाणी पुरवठा विभागात जाऊन, तेथील अधिकाऱ्यांकडेही तक्रार केली असल्याचे सांगितले. विशेष म्हणजे दोन महिन्यात पाच ते सहा वेळा त्यांनी पाणी पुरवठा विभागाकडे तक्रार केली असल्याचे सांगितले. मात्र, आश्वासना व्यक्तिरिक्त अद्याप या अधिकाऱ्यांनी पाणी टंचाईची समस्या दूर केली नसल्याचे या रहिवाशांनी सांगितले.

इन्फो :

दोन महिन्यांपासून नळाला पाणी येत नाही. अचानक पाणी कसे बंद झाले, याबाबत मनपा प्रशासनाकडे आम्ही रहिवाशांनी तक्रार केली आहे. परंतु, अद्याप मनपाचे कुठलेही अधिकारी या ठिकाणी आले नाही. दोन महिन्या पासून आम्हाला पाणी टंचाईचा त्रास सहन करावा लागत आहे.

विमलबाई भालेराव, रहिवासी

नळांना पाणी येत नसल्याने, आम्हाला दुसरीकडून पाणी आणावे लागत आहे. मात्र, यात पिण्याचे पाणीही पूर्ण होत नाही. तसेच या ठिकाणी सार्वजनिक नळ अथवा बोअरवेल नसल्याने खूपच हाल होत आहेत. दोन महिन्यापासून ऐन उन्हाळ्यात आम्हाला पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे.

आशाबाई भालेराव,रहिवासी

या पाणी पुरवठ्याच्या समस्येबाबत या भागातील मनपाच्या पाणी पुरवठा अधिकाऱ्यांकडे अनेकदा प्रत्यक्ष भेटुन तक्रार केली. या बाबत त्यांना वारंवार भेटूनही अद्याप दखल घेतलेली नाही. या रहिवाशांना इकडून-तिकडून पाणी आणावे लागत आहे. या प्रकाराकडे आता महापौरांनी लक्ष देण्याची गरज आहे.

सतीश बागुल, रहिवासी

मनपाच्या अधिकाऱ्यांना नागरिकांच्या समस्येशी काही घेणे-देणे नाही. दोन महिन्यापासून तक्रार करूनही अधिकाऱ्यांनी पाण्याची समस्या सोडविली नाही. या बेजबाबदार अधिकाऱ्यांवर आयुक्तांनी कारवाई करायला हवी, तरच हे अधिकारी नागरीकांच्या समस्या सोडवतील.

गौरव बागुल,रहिवासी