शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
2
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
3
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
4
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
5
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
6
विपिन भाटी खरं बोलतोय? निक्की हत्याकांडात झाला मोठा खुलासा, पोलिसांच्या तपासात नवा ट्विस्ट!
7
Asia Cup : संजूनं भक्कम केली ओपनिंगची दावेदारी! 'खंबीर' खेळीमुळं गंभीरचा प्लॅन फिस्कटणार?
8
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू
9
Amravati: मेहुणाच निघाला अतुल पुरींच्या हत्येचा मास्टरमाईंड; ५ लाखांत दिली खुनाची सुपारी, हत्येसाठी अल्पवयीन मुलांचा वापर
10
समाजसेविका सरिता खानचंदानी यांची सातव्या मजल्यावरून उडी, उपचारादरम्यान मृत्यू; घातपात की आत्महत्या?
11
नासाला तगडे आव्हान; ISRO आणि रशियाची ROSCOSMOS एकत्र आली, 'या' मोहिमेवर करणार काम...
12
Nagpur Politics: भाजपची पकड 'मजबूत', १२० जागांचा आकडा आधीच जाहीर; ठाकरेंच्या नेतृत्वाची पुन्हा 'परीक्षा'
13
'नमामि गंगे'चा जगाला आदर्श; 'स्टॉकहोम वॉटर वीक'मध्ये नदी संवर्धनासाठी भारताचे कौतुक
14
'भारताने रशियाचे तेल घेणे बंद केले नाही तर...', ट्रम्प यांच्या सल्लागाराने भारत सरकारला आणखी टॅरिफ वॉरची धमकी दिली
15
Navi Mumbai Traffic: मराठा मोर्चा नवी मुंबईच्या वेशीवर, वाहतुकीत मोठे बदल; कोणते रस्ते बंद, कोणते खुले?
16
संजय गायकवाडांच्या आमदारकीचं काय होणार? ठाकरेंच्या नेत्याने ठोठावले उच्च न्यायालयाचे दार
17
पत्नीचा संताप अनावर झाला, पतीच्या तोंडावर फेकली उकळती चहा; नेमकं झालं तरी काय?
18
संभल समितीनं CM योगींना सादर केला अहवाल, करण्यात आले खळबळजनक खुलासे; जिल्ह्यात फक्त १५% हिंदू उरले!
19
निक्की भाटी प्रकरणात वृद्ध शेजाऱ्याने केला धक्कादायक खुलासा; म्हणाला, 'निक्की जळत होती तेव्हा विपिन...'
20
भारतासाठी गुड न्यूज! अमेरिकेला मागे टाकत बनू शकतो जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था; EY च्या रिपोर्टमध्ये काय?

दहावी, बारावीची परीक्षा तीन महिन्यांवर,

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2021 04:18 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : दहावी, बारावीची परीक्षा तीन महिन्यांवर येऊन ठेपली आहे. अजूनही काही शाळा व कनिष्ठ ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : दहावी, बारावीची परीक्षा तीन महिन्यांवर येऊन ठेपली आहे. अजूनही काही शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांचे अभ्यासक्रम अपूर्ण राहिले असून ते पूर्ण करण्यासाठी आता कसरत सुरू आहे. महिनाभरात संपूर्ण अभ्यासक्रम शिकवून पुर्व चाचणी परीक्षा घेण्याचे नियोजन शाळा व महाविद्यालयांनी आखले असल्याचे मुख्याध्यापक व प्राध्यापकांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

कोरोनामुळे मार्च-२०२० मध्ये शाळा व महाविद्यालय बंद झाली. त्यात विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्यामुळे शासनाकडून ऑनलाईन शिक्षणाला परवानगी देण्यात आली. दुसरीकडे अभ्यासक्रम सुध्दा कमी केला. गेल्या महिनाभरापासून दहावी ते बारावीच्या वर्गांना सुरूवात झाली आहे. काही शाळांचे ऑनलाईन शंभर टक्के अभ्यासक्रम शिकवून पूर्ण झाले आहेत. विद्यार्थ्यांना कुठलीही अडचण येवू नये म्हणून पुन्हा अध्यापनाला सुरूवात करण्यात आली आहे. काही शाळा, महाविद्यालयांचे दहा ते वीस टक्के अभ्यासक्रम अजूनही अपूर्ण आहे. त्यामुळे तो अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी कसरत सुरू आहे. मे महिन्यात परीक्षा होणार आहे. मात्र, अद्याप कुठलीही तारीख जाहीर करण्यात आलेली नाही़ त्यामुळे परीक्षांच्या तारखा जाहीर करण्याची मागणी होत आहे.

०००००००००००००००००००००

दहावीचा अभ्यासक्रम

- यंदा कोरोनामुळे दहावीचा अभ्यासक्रम २५ टक्क्यांनी कमी केला आहे. ऑनलाईन पद्धतीने शिकविण्यात आले असले तरी इंग्रजी, गणित, विज्ञान हे विषय ऑनलाईन पद्धतीने समजून घेणे कठीणच आहे. कमी कालावधीत अभ्यासक्रम पूर्ण करण्याची कसरत शिक्षकांसह विद्यार्थ्यांना करावी लागते.

------------------

बारावीचा अभ्यासक्रम

यंदा कोरोनामुळे बारावीचा अभ्यासक्रम ३० टक्क्यांनी कमी केला आहे. अभ्यासक्रम पूर्ण व्हायला साधारणत: एक महिन्याचा कालावधी लागू शकतो. इंग्रजी, फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटीक्स आदी विषय प्रत्यक्ष वर्गात शिकविले जात आहेत. त्यामुळे प्राध्यापकांकडून अभ्यासक्रम पूर्ण करून पूर्व चाचणी घेतली जाणार आहे.

०००००००००००००००००००००००००००००००

मुख्याध्यापक, प्राचार्य प्रतिक्रिया

कोरोनामुळे शिक्षणक्षेत्र जरी प्रभावित झाले असले तरी ऑनलाईन पद्धतीने सुरुवातीपासूनच विद्यार्थ्यांना शिकविण्यात आले आहे. शंभर टक्के अभ्यासक्रम पूर्ण झाला आहे. विद्यार्थ्यांना पूर्ण एकदा अभ्यास व्हावा म्हणून पुन्हा अध्यापन केले जात आहे. त्यानंतर पूर्व परीक्षा घेतली जाईल.

- ज्ञानेश्वर पाटील, मुख्याध्यापक

--------------------

बारावीचा तीस टक्के अभ्यासक्रम कमी केला आहे. सत्तर ते एैंशी टक्के अभ्यासक्रम पूर्ण झाला आहे. उर्वरित अभ्यासक्रम हा महिनाभरात पूर्ण केला जाणार आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांची सराव चाचणी परीक्षा घेतली जाईल. मे महिन्यात परीक्षा असली तरी तारखा जाहीर झाल्या नाहीत़ त्या जाहीर होणे अपेक्षित आहेत.

- राजेंद्र वाघुळदे, प्राचार्य

०००००००००००००००००००००००००

- विद्यार्थी प्रतिक्रिया

कोरोनामुळे सुरूवातीला ऑनलाईन पध्दतीने शिकविण्यात आले. मात्र, गणित व विज्ञान हे विषय प्रत्यक्ष शिकविल्यामुळेच चांगले स्मरणात राहतात. कमी कालावधीत अभ्यासक्रम पूर्ण करण्याची कसरत आहे.

- आशिष पाटील, विद्यार्थी

------------------------------

परीक्षा जवळ आली आहे. अभ्यासक्रम पूर्ण होण्यास फेब्रुवारी महिनाही उलटेल. अधिक चांगला अभ्यास व्हावा म्हणून घरी सुध्दा अभ्यासाला जादा वेळ देत आहोत. त्यामुळे विद्यार्थ्यांची कसरत होत आहे.

- रोहित सोनवणे, विद्यार्थी