शहरं
Join us  
Trending Stories
1
बॅडमिंटन स्टार सायना नेहवाल आणि पारुपल्ली कश्यप यांचा घटस्फोट, ७ वर्षांनी लग्न तुटले!
2
Wimbledon 2025 Final : अल्काराझची हॅटट्रिक हुकली! नंबर वन यानिक सिनरनं विम्बल्डन जेतेपद जिंकत रचला इतिहास
3
इंग्लंड: लंडनच्या साऊथएन्ड विमानतळावर मोठा अपघात! उड्डाणानंतर काही वेळातच विमानाला आग
4
मैत्रिणीला सोडायला गेलेली स्नेहा परत आलीच नाही; थेट यमुना नदीत सापडला मृतदेह; नेमकं काय घडलं?
5
अमरावती: पोलिसांनी उधळली तरुणाईची मद्य पार्टी ! अल्पवयीन मुला-मुलींसह १००-१५० जण ताब्यात
6
टीम इंडियासाठी सोपा वाटणारा पेपर झाला अवघड; ५८ धावांत ४ विकेट्स! KL राहुल एकटा पडला!
7
क्रॉसिंग गेटवर रेल्वेचे ‘झिरो अ‍ॅक्सिडेन्ट’चे लक्ष्य; मध्य रेल्वे नागपूर विभागात सुरक्षा मोहीम
8
"भाजपाने पेरलेल्या विषाला..."; प्रवीण गायकवाड प्रकरणावरून संजय राऊत यांनी व्यक्त केला संताप
9
IND vs ENG : वॉशिंग्टन सुंदरनं घेतली इंग्लंडची फिरकी; टीम इंडियासमोर १९३ धावांचे आव्हान
10
Video: बापरे!! पर्यटक समोर असताना चित्ता अचानक माणसांसारखा दोन पायांवर उभा राहिला अन्...
11
लातुरात ड्रग्ज विक्री नेटवर्कचा उलगडा! आणखी तिघांना अटक; चार दिवसांची पाेलिस काेठडी
12
दुर्गम जंगलातील खोल गुहेमध्ये २ मुलींसह सापडली रशियन महिला, विठ्ठल मूर्तीची करायची पूजा, तपासामधून धक्कादायक माहिती उघड  
13
IND vs ENG : अति 'सुंदर'! वॉशिंग्टनच्या फिरकीतील जादूसह टीम इंडियाच्या विजयातील मोठा अडथळा झाला दूर
14
नीरज चोप्रा अन् अरशद नदीम पुन्हा भिडणार; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिलीच लढत
15
ठाणे: जि.प., पं. समित्यांचा निवडणूक प्रभाग रचना मसुदा प्रसिद्ध; हरकतींसाठी २१ जुलैपर्यंत मुदत
16
भाजपाकडून खासदारकी मिळालेल्या उज्ज्वल निकम यांची संपत्ती किती? मुंबईत किती कोटींची घरं?
17
ब्रूकची आडवी-तिडवी फटकेबाजी! ३ चेंडूत कुटल्या १४ धावा; मग आकाशदीपनं 'मिडल स्टंप' उडवत घेतला बदला
18
"प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ला करणाऱ्या गुंडांना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करा’’, काँग्रेसची मागणी  
19
जगद्गुरू अविमुक्तेश्वरानंद यांनी व्यक्त केली मराठी शिकण्याची इच्छा; शिंदेसेना देणार मराठीचे धडे
20
मोठी बातमी! संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाडांना अक्कलकोटमध्ये काळं फासलं

वाक शिवारात ‘तेजापूर’ मिरचीचे तेज...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2019 16:50 IST

नाव शेख, अन् मिरची देख । ऐन उन्हाळा आणि दुष्काळावर मात करीत फुलवला मळा

संजय हिरे।खेडगाव, ता.भडगाव : ऐन उन्हाळ्यात ४५ डिग्री सेल्सिअसवर तापमान, शिवाय सोबतीला दुष्काळामुळे विहिरीला जेमतेम पाणी असतांना गिरणाकाठालगतच्या केळी, ऊसपट्टा म्हणुन ओळखल्या जाणाऱ्या वाक शिवारात शेख जाफर शेख बिस्मिल्ला या शेतकºयाने दीड एकरावर तेजापुरी जातीच्या मीरचीचे पीक घेत शेतक-यांचे लक्ष वेधुन घेतले आहे.ऐन उन्हाळ्यात तीचे तेज (हिरवीगार) पाहुन तालुक्यात आश्चर्य व्यक्त होत आहे. नाही त्या चढाओढीने बढाया इतर शेतकऱ्यांकडुन मारल्या गेल्यात म्हणुन या शेतावर भेट देत लोकमतने जाणुन घेतलेल्या खाण्यास तेज (तीखट) अशा तेजापुरी मिरचीच्या तेजाचे रहस्य जाणून घेतले.प्रतीकुल हवामानामुळे यंदा मीरची लागवड नाहीच. तालुक्यात पळासखेडे,गुढे व इतर तालुक्यात देखील कुठेतरी एखाद्या दोन ठिकाणीच तीची लागवड दिसते. बाजारात येते ती मिरची नाशीक व तापीकाठालगतच्या काही गावातुन.आता तीव्र तापमानामुळे पाँलीहाऊस व ग्रीन हाऊसमधे मिरची लागवड केली जाते. अशी कोणतीही उपलब्धता नसतांना वा भाजीपाला लागवाडीचा कोणताही अनुभव गाठीस नसतांना या अल्पभुधारक शेतकºयाने केलेले धाडस म्हणुनच उल्लेखनीय आहे.शेख यांनी जवळच्या नातेवाईकाच्या सल्ल्याने घाटनांद्रा ता. कन्नड येथील नर्सरीतुन २७ एप्रील रोजी तेजापुर मीरचीचे रोप आणले. ऐन उन्हाळ्यात आणलेले रोप संध्याकाळी माना टाकु लागले. तेव्हा इतर शेतकºयांनी त्यांना वेड्यात काढले. त्याच स्थीतीत सरी-वरंबा पध्दतीने ठिबकवर ती दुसºया दिवशी लावलीत. रोप, लावणी १५ हजार खर्च आला. बुरशीनाशक, किटकनाशक फवारणी व ठिबकमधुन लिक्विड (द्रवरुप खते, सुक्ष्मखते,आदी रसायने) सोडत योग्य निगा राखली. याचा ४५-५० हजार एकुण खर्च आला. मे मधे मीरचीचे हिरवेगार क्षेत्र पाहुन शेतकरी थांबु लागले. तेजापुर मिरचीला वाशी,गुजरात असे मार्केट आहे. हॉटेलमधे वडा-पाव बरोबर व भैय्या लोकांची ती आवडीची आहे. निसर्गाने साथ दिल्यास यापुढे चांगला तोडा निघण्याची आशा शेतकºयाला आहे. उत्पन्नाच्या बाबतीत 'पहलेच बढा-चढाके कहेनेमे क्या ठीक नही,...!अशी भावना जाफर शेख यांची आहे. मुले भडगावी सेंट्रीग काम करतात.तेथुन येत पती-पत्नी दोघेच शेतात राबतात. तरी देखील या वयात काळ्या आईची सेवा करण्यात त्यांना जो आनंद मिळतो त्याची चमक त्यांच्या चेहºयाबरोबर प्रत्यक्ष शेतातही दिसते हे मात्र नक्की.यांची रोप लावणी, त्यांची मिरची काढणीयावर्षी खान्देशात दुष्काळामुळे उन्हाळी मिरचीचे क्षेत्र नगण्य आहे. विहिरींना पाणीच नसल्याने खरिपात देखील मिरची रोप कमी प्रमाणात उपलब्ध आहे. पाऊस झाल्यानंतर आता कुठे रोपाला मागणी वाढली. आहे ते रोप आता लावणीला घेतले आहे. जवळजवळ एक-दिड महिना उशीर झाला आहे. यामुळे इतर भाजीपाल्याचे भाव खाली आले तरी हिरव्या मिरचीचे दर स्थिर आहेत. अजुन एक महिना किंवा खरिपातील मिरची काढणीला येईस्तोवर भाव टिकुन राहतील, अशी शेतकºयाला आशा आहे. यामुळे शेख यांच्यासह मिरची काढणीला आलेल्या इतर शेतकºयांना याचा लाभ मिळु शकतो.मिरची तोडण्यास घाटावरील मजूर मागवणारयावर्षी पावसाळा उशीरा सुरु झाल्याने मीरची निघण्यास देखील एक महीना विलंब झाला. मागील आठवड्यात पहीला तोडा ११ हजाराचा निघाला. दोन क्विंटलचा. सध्या भाव पन्नास रुपये किलो मिळतोय. ही मीरची तोडण्यास लागणारे कुशल महिला मजुर आपल्याकडे नाही यामुळे घाटावरुन मजुर मागवणार असल्याचे शेतकरी सांगतो. सध्या विविध कृषी कंपन्यांचे प्रतिनिधी येतात फोटोसेशन करीत भंडावुन सोडत आहेत. लाभ मात्र त्यांच्यापासुन कोणताच नाही.