शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर राहुल गांधी दुसरे आंबेडकर सिद्ध होतील", ओबीसी समाजाला आवाहन करत काँग्रेसच्या मोठ्या नेत्याचं विधान
2
आयटी पार्क पुण्यातून बाहेर चालले..! अजित पवारांनी हिंजवडीच्या सरपंचांनाही सुनावले खडेबोल
3
ऑनलाईन मागवलं विष, दह्यामध्ये टाकून पतीला दोनदा पाजलं; पत्नीचा कारनामा पोलिसांनी केला उघड
4
२६ जुलै हा दिवस मुंबईकर कधीच विसरू शकत नाही! २० वर्षापूर्वी काय घडलं होतं त्या दिवशी?
5
Shravan 2025: शिवमंदिरात भाविक तीनदा टाळ्या का वाजवतात? काय आहे मान्यता? वाचा!
6
Thailand- Cambodia Conflict :'सीमेवर प्रवास टाळा', थायलंड- कंबोडिया संघर्षादरम्यान भारताच्या पर्यटकांसाठी दूतावासाने सूचना दिल्या
7
विवाहित वर्गमैत्रिणीला भेटला; पत्नीला घटस्फोट देत तिच्यासोबत लिव्ह इनमध्ये राहिला, मग जे घडलं...
8
अंगावर धावून गेली, चप्पल फेकून मारली अन्...; रुची गुज्जरची निर्मात्याला मारहाण, व्हिडीओ व्हायरल
9
कॉलेजला जाण्यापूर्वी हवी होती लीन बॉडी; ऑनलाईन ट्रेंड, लिक्विड डाएट बेतलं जीवावर, मुलाचा मृत्यू
10
आता सैनिकांसाठी अरबी भाषा आणि इस्लाम शिकणे अनिवार्य, इस्रायलचा मोठा निर्णय! कारण काय?
11
अरेरे! 'सैयारा' पाहून तुफान राडा; गर्लफ्रेंडसाठी थिएटरबाहेर भिडले २ तरुण, लाथा-बुक्क्यांनी मारहाण
12
Rain Update : ठाणे, रायगड, मुंबईत मुसळधार, ऑरेंज अलर्ट, पालघरसाठी रेड अलर्ट, भरती-ओहोटीबाबतही इशारा
13
५ वर्षांत १० पट वाढला TATA Sons चा नफा; समूहाच्या 'या' कंपनीनं केली सर्वाधिक कमाई, तुमच्याकडे स्टॉक आहे का?
14
'मला बुटाने मारा', सिद्धरामय्या अन् शिवकुमार यांच्या विशेष अधिकाऱ्यांमध्ये दिल्लीत हाणामारी; कारण काय?
15
शाहरुख फिटनेससाठी कोणते पदार्थ खात नाही? किती वाजता झोपतो? काय जेवतो? जाणून घ्या एका क्लिकवर
16
पहिल्यांदा नोकरी करणाऱ्यांना सरकार देणार १५ हजार रुपये; फक्त पूर्ण कराव्या लागतील 'या' २ अटी
17
"तुम्हाला आनंद देणाऱ्या गोष्टींवरदेखील खर्च करा..," राधिका गुप्ता यांनी दिला हृदयस्पर्शी सल्ला
18
आमदार रोहित पवारांच्या अडचणीत वाढ; मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीकडून मोठी कारवाई
19
महायुतीत २ मंत्र्यांमध्ये रंगलं मानापमान नाट्य; शिंदेसेनेचे मंत्री नाराज, भाजपा मंत्र्यांचा पलटवार
20
सुनील शेट्टीने 'हेरा फेरी ३'मधील परेश रावलच्या एंट्रीवर दिली प्रतिक्रिया, म्हणाली- "नजर लागते..."

विद्यार्थी प्रवेशासाठी शिक्षकांची चढाओढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2021 04:21 IST

काही शिक्षक अकरावी असो, आठवी किंवा पाचवीचे प्रवेश असो, तब्बल परस्पर शाळेत जाऊन विद्यार्थ्यांचा दाखला काढून घेण्यासाठी तत्पर असतात. ...

काही शिक्षक अकरावी असो, आठवी किंवा पाचवीचे प्रवेश असो, तब्बल परस्पर शाळेत जाऊन विद्यार्थ्यांचा दाखला काढून घेण्यासाठी तत्पर असतात. या वेगवेगळ्या शालेय प्रवेशाच्या निमित्ताने ग्रामीण भागातील पालकवर्ग संभ्रमात असतो की, नेमके माझ्या मुला-मुलीचे ॲडमिशन कोणत्या शाळेत घ्यावे, यामुळे विद्यार्थ्यांचे वैचारिक स्वातंत्र्य हिरावत आहे. या शिक्षकांच्या स्पर्धेत मुलेही गोंधळात पडत आहेत. नेमके एखाद्या विद्यार्थ्याला त्याच्या इच्छेने शाळा प्रवेश घ्यायचा असतो, परंतु त्या ठिकाणी हे शिक्षकवर्ग घरी जाऊन पालकांचे समुपदेशन करतात की, आमच्याकडे अशा सोयी आहेत, तशा सोयी आहेत, अशामुळे विद्यार्थ्यांची मानसिकता अवस्था संभ्रमित होत आहे.

सध्या तरी प्रत्येक शाळेतील शिक्षक विद्यार्थी प्रवेश निर्धारित संख्या, शाळा व शिक्षक नोकरी वाचविण्यासाठी दारोदारी प्रवेशासाठी फिरत आहेत. या कारणाने दोन-चार दिवसांपूर्वी कुऱ्हाड येथे विद्यार्थ्यांचे दाखले देण्याहून शिक्षकांमध्ये वाद निर्माण झाला होता. शिक्षकवर्ग जरी आपली विद्यार्थी प्रवेशसंख्या पूर्ण करण्यासाठी धडपड करीत असला, तरी शिक्षकांच्या स्पर्धात्मक प्रवेशासारख्या बाबी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांवर नको, असा सूर पालकवर्गातून निघत आहे.