शहरं
Join us  
Trending Stories
1
शशी थरूर भाजपात जाणार? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
2
Beed Crime News : बीडमध्ये पैशांसाठी अपहरण, मुलासाठी ५० हजार रुपयांची मागणी; नेमकं प्रकरण काय?
3
चीन-पाकिस्तानचं वाढणार टेन्शन; भारताला लवकरच मिळणार हायटेक्निक मिसाईल, कसं करणार काम?
4
हास्यास्पद! पाऊस पडतोय म्हणून नाही आणले...; एअर इंडियाची दोन विमाने लगेज न घेताच आली
5
"इराण भारताचा जुना मित्र, दुसरीकडे इस्त्रायल..."; मध्य पूर्वेतील युद्धावर सोनिया गांधी स्पष्ट बोलल्या
6
Air India :'या' तीन कर्मचाऱ्यांना तात्काळ बडतर्फ करा'; अहमदाबाद विमान अपघातानंतर एअर इंडियाला डीजीसीएचे आदेश
7
"संपूर्ण युक्रेन आमचा..."; पुतिन यांनी झेलेन्स्की यांच्या संपूर्ण देशावरच ठोकला दावा! मिळालं असं उत्तर
8
ऑफिसला न जाताच कर्मचाऱ्याला मिळाले २६ लाख रुपये; कोर्टाने दिला मोठा निर्णय
9
"मी इनसाइडर असते तर बरं झालं असतं", इंडस्ट्रीतील स्ट्रगलवर लोकप्रिय अभिनेत्रीची क्रिप्टिक पोस्ट
10
"गोयंकाजी पाहताय ना?’’, इंग्लंडमध्ये पंतच्या फटकेबाजीनंतर फॅन्सनी घेतली लखनौच्या मालकांची शाळा  
11
हनीमुनचा प्लॅन, रसगुल्लामध्ये विष भरले अन्...; बेवफा सोनमपेक्षाही खतरनाक आहे खूनी 'मुस्कान'
12
NSE चा IPO कधी येणार? सेबीचे अध्यक्ष म्हणाले, "आयपीओ आणण्यात कोणताही अडथळा..."
13
Air India Plane Crash: "१४ वर्षांनी घरी लक्ष्मी जन्मली अन् विमान दुर्घटनेत दुर्दैवाने तिलाच गमावले..."
14
गळफास लावलेल्या स्थितीत सापडला भाजपा नेत्याचा मृतदेह, दोरीने बांधलेले होते दोन्ही हात, संशयास्पद मृत्युमुळे खळबळ
15
भीषण अपघात! नवी मुंबईत मुलीने मर्सिडीजने दुचाकीला उडवले; महिलेचा जागेवर मृत्यू, एकजण गंभीर जखमी
16
८ वर्षांपूर्वी आई गेली, नुकतेच बाबाही गेले; रीमा लागूंच्या वाढदिवसानिमित्त लेकीची भावुक पोस्ट
17
"मी शांततेसाठी कितीही प्रयत्न केले तरी...!"; काँगो-रवांडा शांतता करारानंतर ट्रम्प यांचं दुःख, बोलून दाखवली नोबेल पुरस्काराची इच्छा
18
Israel-Iran War: भारतासाठी कायपण ! परतीसाठी इराणने आपले हवाई क्षेत्र उघडले, आणखी दोन विमाने नवी दिल्लीत पोहोचणार
19
पाकिस्तानमध्ये चार हिंदू भावंडांचे अपहरण, जबरदस्तीने धर्म बदलण्यास भाग पाडले; आईकडून न्यायाची मागणी
20
Ashadhi Ekadashi 2025: ईश्वरभेटीची सोपी वाट दाखवणार्‍या गुरुंचे आपल्या आयुष्यातील योगदान जाणून घ्या!

१७१ शेतकºयांच्या आत्महत्या

By admin | Updated: January 5, 2017 00:10 IST

शेतकरी आत्महत्येनंतर वारसांनी दाखल केलेल्या मदतीसाठीचे ९० प्रस्ताव जिल्हास्तरीय समितीने अपात्र ठरविले आहे तर ३० प्रस्ताव प्रलंबित ठेवल्याने मृत्यूनंतरही वारसांची वणवण कायम आहे.

जळगाव : कर्जबाजारीपणा, नापिकी आणि निसर्गाचा लहरीपणा या साºयाला कंटाळून जिल्ह्यातील तब्बल १७१ शेतकºयांनी आत्महत्या केली आहे. शेतकरी आत्महत्येनंतर वारसांनी दाखल केलेल्या मदतीसाठीचे ९० प्रस्ताव जिल्हास्तरीय समितीने अपात्र ठरविले आहे तर ३० प्रस्ताव प्रलंबित ठेवल्याने मृत्यूनंतरही वारसांची वणवण कायम आहे.१७१ शेतकºयांच्या आत्महत्या निसर्गाची अवकृपा, अतिवृष्टीमुळे झालेले नुकसान, खाजगी सावकाराकडून घेतलेले कर्ज तसेच  शेतमालाला नसलेला भाव  यासाºयात खचलेल्या १७१ शेतकºयांनी जानेवारी ते डिसेंबर या कालावधीत आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय घेतला.  ९० शेतकºयांच्या वारसाची मृत्यूनंतरही वणवणशासनाने शेतकरी आत्महत्येनंतर वारसांना मदतीची घोषणा केली आहे. यासाठी जिल्हास्तरीय समिती गठीत केली आहे. या समितीकडे आलेल्या १७१ मदतीच्या प्रस्तावातून या समितीने तब्बल ९० प्रस्ताव अपात्र ठरविले आहे. त्यामुळे मृत्युनंतरही या शेतकºयांच्या वारसाची शासनाकडून उपेक्षा कायम आहे.दुष्काळी व नापिकीमुळे आत्महत्येचे प्रमाणगेल्या दोन वर्षांपासून दुष्काळीस्थिती आणि अवकाळी पाऊस अशी स्थिती कायम असल्याने बळीराजा पार कोलमडला आहे. त्यातच दोन वर्षापासून आत्महत्येच्या प्रमाणात जास्त वाढ झाली आहे. २०१३ मध्ये ९२ शेतकºयांनी आत्महत्या केली होती. २०१४ मध्ये त्यात वाढ होऊन हा आकडा १७४ पर्यंत पोहचला. तर जानेवारी ते डिसेंबर या काळात तब्बल १७१ शेतकºयांनी आत्महत्या केल्या आहेत.२७ हजार शेतकरी अनुदानापासून वंचितगेल्यावर्षी सप्टेंबर व आॅक्टोबर महिन्यात वादळी पाऊस होऊन शेतमालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सप्टेंबर महिन्यात जिल्ह्यातील ४० गावांमधील २ हजार २९८ शेतकºयांच्या १ हजार १९१.२१ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले होते. तर आॅक्टोबर महिन्यात १७१ गावांमधील २५ हजार २९३ शेतकºयांचे ११ हजार ८७५.०७ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाले आहे. २७ हजार ५९१ शेतकºयांना शासनाने मदत उपलब्ध करून द्यावी या आशयाचा प्रस्ताव जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल यांनी दीड महिन्यांपूर्वी शासनाकडे पाठविला आहे. मात्र अजूनही त्यावर निर्णय न झाल्याने हे शेतकरी मदतीपासून वंचित आहेत.