शहरं
Join us  
Trending Stories
1
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
2
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
5
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
6
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
7
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
8
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
9
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
10
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
11
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
12
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
13
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
14
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
15
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
16
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
17
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
18
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
19
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
20
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश

निष्ठावंत वारकऱ्याच्या अचानक जाण्याने वारकरी मंडळी झाली "पोरकी"

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 04:17 IST

हळहळ : संत मुक्ताबाई राम पालखीचे सेवेकरी जितेंद्र वाळके यांचे निधन लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : मुखी सदा हरी ...

हळहळ : संत मुक्ताबाई राम पालखीचे सेवेकरी जितेंद्र वाळके यांचे निधन

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : मुखी सदा हरी नाम आणि सतत पांडुरंगाच्या भक्तीची ओढ असलेले निष्ठावंत रामसेवक आणि संत मुक्ताबाई राम पालखीचे सेवेकरी जितेंद्र वाळके यांचे नुकतेच हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. त्यांच्या अशा अचानक जाण्याने ग्रामदैवत श्रीराम मंदिरातील वारकऱ्यांना मोठा धक्का बसला असून, त्यांच्या जाण्याने आम्ही पोरकी झालो असल्याची खंत ग्रामदैवत श्रीराम मंदिराचे गादीपती ह.भ.प मंगेश महाराज जोशी यांच्यासह इतर वारकऱ्यांमधून व्यक्त करण्यात येत आहे.

जितेंद्र वाळके यांना नेहमी सर्वजण प्रेमाने जितू काका म्हणून हाक मारीत. ग्रामदैवत श्रीराम मंदिर संस्थानच्या परंपरेतील सर्व उत्सवात ते कायम नित्य सेवेत असायचे, त्यात पंढरपूरची वारी, रथोत्सव, श्रीराम नवमी या सर्व उत्सवात अगदी निष्ठेने सेवा करीत.

दरवर्षीची पंढरीची पायी वारी म्हणजे त्यांच्यासाठी आनंदाची पर्वणीच होती. ज्येष्ठ महिना लागला, की वारीची तयारी मोठ्या उत्साहाने करायचे. जळगाव महापालिकेत पाणी पुरवठा विभागात ते नोकरीला होते. पंढरपूरच्या वारी साठी सुट्टी मिळेल की नाही, याची दरवर्षी त्यांना खूप चिंता लागून असायची. मात्र, मंगेश महाराज जितू वाळके यांना चिंता करू नका, श्रीरामचंद्रांच्या व संत मुक्ताईंच्या चरणाशी साकडे घालायचे सांगायचे. पंढरपूरच्या वारीला जाण्याची इच्छा पांडुरंगच पूर्ण करेल, असे सांगून त्यांना नेहमी धीर द्यायचे.

इन्फो :

गेल्या वर्षांची जितू काकांची ठरली शेवटची वारी

कोरोनामुळे गेल्या वर्षी शासनातर्फे पंढरपूरची वारी व यात्रा उत्सव रद्द करण्यात आला होता. फक्त राज्यभरातील प्रमुख पालखीना पाच वारकऱ्यांच्या उपस्थित पंढरपूरला येण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार मंगेश महाराज यांना विणेकरी, पखवाजी, चोपदार, पालखीवाले व ते स्वतः मिळून पाच जण होत असल्याने, जितेंद्र वाळके यांना पंढरपूरला कसे घेऊन जायचे असा प्रश्न पडला होता. मात्र, यावेळी ठरलेल्या पाच जणांपैकी दोन जणांनी अचानक वारीला येण्याचे टाळल्यानंतर, या मध्ये जितू काकांचा नंबर लागला. मंगेश महाराजांनी जेव्हा जितू काकांना पंढरपूरला वारीला येण्याचा निरोप दिला, तेव्हा जितू काकांना गगनात मावेनासा आनंद झाला होता. त्यानंतर ते मोठ्या आनंदाने पंढरपूरच्या वारीला गेले आणि ती त्यांची शेवटची वारी ठरली.

इन्फो :

अन् वारकरी मंडळी झाली ''पोरकी''

उत्साह, पांडुरंगाची ओढ, भक्तिभाव आणि इतरांना प्रति स्नेह व प्रेमा मुळे जितू काकांनी सर्वांच्या मनात घर केले होते. वारीमध्ये सर्व प्रकारची सेवा ते करायचे, इतरांची काळजी घ्यायचे, त्यांच्या शिवाय पंढरपूरची वारी म्हणजे शक्यच होत नसे. त्यांच्या शिवाय आमची यंदाची पंढरपूरची वारी कशी साजरी होणार, अशी खंत या वारकरी मंडळीतून व्यक्त करण्यात येत आहे.