शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
2
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
3
Video: "आता मी हिंदीत बोलू????"; मराठीत बोलत असतानाच काजोल भडकली, बघा काय घडलं?
4
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
5
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
6
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 
7
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
8
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
9
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
10
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
11
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
12
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
13
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
14
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
15
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
16
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
17
Dharali floods: ताशी 43 किमी वेग... 1230 फूट उंचावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
18
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
19
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
20
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?

निष्ठावंत वारकऱ्याच्या अचानक जाण्याने वारकरी मंडळी झाली "पोरकी"

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 04:17 IST

हळहळ : संत मुक्ताबाई राम पालखीचे सेवेकरी जितेंद्र वाळके यांचे निधन लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : मुखी सदा हरी ...

हळहळ : संत मुक्ताबाई राम पालखीचे सेवेकरी जितेंद्र वाळके यांचे निधन

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : मुखी सदा हरी नाम आणि सतत पांडुरंगाच्या भक्तीची ओढ असलेले निष्ठावंत रामसेवक आणि संत मुक्ताबाई राम पालखीचे सेवेकरी जितेंद्र वाळके यांचे नुकतेच हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. त्यांच्या अशा अचानक जाण्याने ग्रामदैवत श्रीराम मंदिरातील वारकऱ्यांना मोठा धक्का बसला असून, त्यांच्या जाण्याने आम्ही पोरकी झालो असल्याची खंत ग्रामदैवत श्रीराम मंदिराचे गादीपती ह.भ.प मंगेश महाराज जोशी यांच्यासह इतर वारकऱ्यांमधून व्यक्त करण्यात येत आहे.

जितेंद्र वाळके यांना नेहमी सर्वजण प्रेमाने जितू काका म्हणून हाक मारीत. ग्रामदैवत श्रीराम मंदिर संस्थानच्या परंपरेतील सर्व उत्सवात ते कायम नित्य सेवेत असायचे, त्यात पंढरपूरची वारी, रथोत्सव, श्रीराम नवमी या सर्व उत्सवात अगदी निष्ठेने सेवा करीत.

दरवर्षीची पंढरीची पायी वारी म्हणजे त्यांच्यासाठी आनंदाची पर्वणीच होती. ज्येष्ठ महिना लागला, की वारीची तयारी मोठ्या उत्साहाने करायचे. जळगाव महापालिकेत पाणी पुरवठा विभागात ते नोकरीला होते. पंढरपूरच्या वारी साठी सुट्टी मिळेल की नाही, याची दरवर्षी त्यांना खूप चिंता लागून असायची. मात्र, मंगेश महाराज जितू वाळके यांना चिंता करू नका, श्रीरामचंद्रांच्या व संत मुक्ताईंच्या चरणाशी साकडे घालायचे सांगायचे. पंढरपूरच्या वारीला जाण्याची इच्छा पांडुरंगच पूर्ण करेल, असे सांगून त्यांना नेहमी धीर द्यायचे.

इन्फो :

गेल्या वर्षांची जितू काकांची ठरली शेवटची वारी

कोरोनामुळे गेल्या वर्षी शासनातर्फे पंढरपूरची वारी व यात्रा उत्सव रद्द करण्यात आला होता. फक्त राज्यभरातील प्रमुख पालखीना पाच वारकऱ्यांच्या उपस्थित पंढरपूरला येण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार मंगेश महाराज यांना विणेकरी, पखवाजी, चोपदार, पालखीवाले व ते स्वतः मिळून पाच जण होत असल्याने, जितेंद्र वाळके यांना पंढरपूरला कसे घेऊन जायचे असा प्रश्न पडला होता. मात्र, यावेळी ठरलेल्या पाच जणांपैकी दोन जणांनी अचानक वारीला येण्याचे टाळल्यानंतर, या मध्ये जितू काकांचा नंबर लागला. मंगेश महाराजांनी जेव्हा जितू काकांना पंढरपूरला वारीला येण्याचा निरोप दिला, तेव्हा जितू काकांना गगनात मावेनासा आनंद झाला होता. त्यानंतर ते मोठ्या आनंदाने पंढरपूरच्या वारीला गेले आणि ती त्यांची शेवटची वारी ठरली.

इन्फो :

अन् वारकरी मंडळी झाली ''पोरकी''

उत्साह, पांडुरंगाची ओढ, भक्तिभाव आणि इतरांना प्रति स्नेह व प्रेमा मुळे जितू काकांनी सर्वांच्या मनात घर केले होते. वारीमध्ये सर्व प्रकारची सेवा ते करायचे, इतरांची काळजी घ्यायचे, त्यांच्या शिवाय पंढरपूरची वारी म्हणजे शक्यच होत नसे. त्यांच्या शिवाय आमची यंदाची पंढरपूरची वारी कशी साजरी होणार, अशी खंत या वारकरी मंडळीतून व्यक्त करण्यात येत आहे.