शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये राडा! उपमुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर हल्ला; दुसरीकडे सीपीएम आमदाराला मारहाण, गाडी फोडली
2
मोठी बातमी! पार्थ पवार जमीन व्यवहार प्रकरणी तहसीलदार सूर्यकांत येवले निलंबित
3
बिहार निवडणूक 2025: व्होटर स्लीपशिवाय मतदान नाही! सकाळी ६.३० वाजल्यापासून रांगेत असलेल्या महिलांना रोखले
4
चारित्र्यावर संशय! रस्त्यात दुसऱ्या तरुणासोबत बोलली म्हणून संतापलेल्या पतीने ब्लेडने कापले पत्नीचे नाक
5
₹१६०० पर्यंत जाणार Paytm चा शेअर; एक्सपर्ट बुलिश, आजही शेअरमध्ये मोठी तेजी
6
'एकाच ठिकाणी.. कुठे तरी राहा' राज ठाकरेंनी पिट्याभाईला सुनावले
7
...अन् व्हीलचेअरवर बसलेल्या प्रतीकासाठी PM मोदींनी स्वतः आणून दिला तिच्या आवडीचा पदार्थ (VIDEO)
8
राजा भैय्याच्या शस्त्रपूजेचा पोलिस तपास अहवाल आला; दसऱ्याला डझनभर शस्त्रांचे पूजन केले होते
9
Video - बापाची धडपड! ट्रॅफिकमध्ये अडकलेली रुग्णवाहिका, आजारी लेकीला उचलून घेऊन...
10
मुलांसाठी जबरदस्त आहे 'ही' स्कीम, अनेक योजना याच्यासमोर फेल; रोज फक्त ₹८.५ रुपये वाचवून व्हाल लखपती
11
अमित शाहांनी म्हटलं, 'पिंटू बडा आदमी बनेगा'; काही क्षणांनी भाजपा उमेदवाराचा अश्लील व्हिडिओ व्हायरल
12
Rahul Gandhi: 'मतचोरी'च्या आरोपांत नवा ट्विस्ट! 'तो' फोटो ब्राझिलियन मॉडेलचा नाही? तर...
13
भाजपा टू भाजपा व्हाया मनसे...! महापालिका निवडणुकीपूर्वी माजी आमदार तृप्ती सावंत यांची घरवापसी
14
Mahabharat: शुक्राचार्यांना एकच डोळा का? ते शिवपुत्र होते? नावामागेही आहे रोचक कथा!
15
डिजिटल अरेस्टच्या नावाखाली तब्बल ३,००० कोटी रुपयांची फसवणूक! 'हे' लोक ठरत आहेत सायबर फ्रॉडचे बळी
16
पार्थ पवारांवर जमीन घोटाळ्याचा आरोप, CM फडणवीसांचे चौकशीचे आदेश, म्हणाले, 'अजितदादा अशा गोष्टींना...'
17
CM असताना कारपेट सोडलं नाही, आता कितीही प्रयत्न केले तरी...; फडणवीसांचा ठाकरेंवर पलटवार!
18
गर्भवती पत्नीच्या मृत्यूनं बसला धक्का; १२ तासांनी पतीनेही सोडला जीव; एकाचवेळी २ तिरडी निघणार
19
Cristiano Ronaldo: "मला माझ्या कुटुंबाला, मुलांना वेळ द्यायचा आहे" रोनाल्डो निवृत्तीच्या वाटेवर!
20
VIRAL : लग्नाच्या अगदी आधी वराची 'डिमांड लिस्ट' वाचून सासरे रडले! असं काय लिहिलं होतं?

आदिवासी आश्रमशाळांमधील विद्यार्थी पोषण आहारापासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 04:12 IST

संजय पाटील लोकमत न्यूज नेटवर्क अमळनेर : गेल्या वर्षी २२ मार्चपासून लॉकडाऊन झाल्याने शाळा बंद झाल्या. त्यामुळे ...

संजय पाटील

लोकमत न्यूज नेटवर्क

अमळनेर : गेल्या वर्षी २२ मार्चपासून लॉकडाऊन झाल्याने शाळा बंद झाल्या. त्यामुळे शासनाला आदिवासी विद्यार्थ्यांच्या पोषण आहाराचा जणू विसरच पडला आहे. कोरोनोमुळे राज्यातील शासकीय व अनुदानित आदिवासी आश्रमशाळांमधील सुमारे साडेचार लाख विद्यार्थी गेल्या वर्षभरापासून पोषण आहारापासून वंचित आहेत.

राज्यातील शासकीय व अनुदानित आश्रम शाळांमधील विद्यार्थी आपापल्या घरी वस्त्या, वाड्या, पाड्यांवर निघून गेले. त्यावेळी १६ मार्च २०२० पूर्वी आश्रम शाळांना मिळालेले गहू, तांदूळ, धान्य, कपडे हे स्थानिक आदिवासी कुटुंब, आर्थिक दुर्बल कुटुंब, रेशन कार्ड नसलेले कुटुंब, अपंग, निराधार कुटुंब, विधवा महिलांचे कुटुंब, आपत्तीग्रस्त कुटुंब यांना वाटप करण्याचे आदेश शासनाने दिल्याने मुख्याध्यापकांनी ते साहित्य इतरत्र वाटून दिले.

अनेक आदिवासी कुटुंबांकडे रेशन कार्ड नाहीत, काहींना मिळाले तर ऑनलाइन नोंदणी नाही आणि झाली तर लाभार्थी योजनेत समाविष्ट नाही अशी परिस्थिती असताना पहिली ते आठवीत जाणारी मुले त्यांच्यावर बोझा ठरली आहेत. आश्रमशाळेत शिक्षण घेताना त्यांना दोन्ही वेळचे जेवण, नाष्टा, दूध , अंडी असा पोषण आहार दररोज मिळत होता. परंतु कोरोनामुळे शिक्षण तर बंद झाले, परंतु पोषण आहार देण्याबाबत शासनाला विसर पडला आहे. राज्यात ५५६ शासकीय आश्रमशाळा असून, सुमारे दोन लाख विद्यार्थी आहेत. अनुदानित आश्रमशाळा ५५० असून, त्यात सुमारे अडीच लाख विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. एकीकडे जिल्हा परिषदेच्या शाळा, खासगी प्राथमिक व खासगी माध्यमिक शाळेत पहिली ते आठव्या वर्गात शिकणाऱ्या प्रत्येक गरीब अथवा श्रीमंत पालकांच्या मुलांना पोषण आहार दिला जात आहे. शाळा बंद असल्याने मुलांना घरी आहार वाटप होत आहे. दुसरीकडे खऱ्या अर्थाने गरजू आदिवासी मुले मात्र यापासून वंचित राहिली आहेत.

कोट

शासनस्तरावर आदिवासी मुलांना पोषण आहार देण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र अद्यापपर्यंत आश्रम शाळेतील मुलांना पोषण आहाराबाबत कुठलेही निर्देश नाहीत

-विनिता सोनवणे, प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यावल, जि. जळगाव

कोट

आदिवासी मुलांच्या बाबतीत शासनाला विसर पडला आहे. ही बाब आदिवासीमंत्र्यांच्या लक्षात आणून दिली आहे. त्यांच्याकडे तक्रार केली आहे. 2 रोजी त्यांच्यासोबत बैठक आयोजित केली आहे. त्यावेळी न्याय मिळणे अपेक्षित आहे.- प्रतिभा शिंदे , नेत्या,लोकसंघर्ष मोर्चा.

कोट

शासनाने आदिवासी विद्यार्थी आणि सामान्य विद्यार्थी यांच्यात भेदभाव केला आहे. आश्रम शाळेत गरीब आदिवासीच शिक्षण घेतात त्यामुळे शासनाने पोषण आहार द्यावा अन्यथा शासनाच्या विरोधात असंतोष माजेल - पन्नालाल मावळे , खान्देश प्रांताध्यक्ष,आदिवासी पारधी विकास परिषद.