शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
2
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
3
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
4
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
5
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
6
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
7
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!
8
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
9
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
10
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
11
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
12
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...
13
"राज ठाकरे साहेब, आपण..."; हकालपट्टीनंतर वैभव खेडेकरांनी सोडलं मौन, राणेंच्या भेटीबद्दल काय सांगितलं?
14
"गौतम एका ठिकाणी बसून ओरडत होता"; सिंहगड किल्ल्यावरून बेपत्ता झालेल्या तरुणाला पोलिसांनी कसं शोधलं?
15
"कुटुंबाला सांगू नका, लोकांकडून पैसे घेऊन अंत्यसंस्कार करा"; मनातील वेदना कागदावर लिहून तरुणाने संपवलं आयुष्य
16
Video: कार चालकाने अचानक दरवाजा उघडला; क्रिकेटर थेट धडकला, जागीच मृत्यू
17
याला म्हणतात परतावा...! 11403% ने वाढला हा स्टॉक, आता कंपनीला DRDO कडून मिळाली ₹3.36 कोटींची ऑर्डर, शेअरची किंमत 200 हून कमी!
18
मोबाइल हॅक झाला आहे का? हे संकेत ओळखा आणि लगेच पावलं उचला
19
अथर्व सुदामेवर टीकेचा भडीमार, असिम सरोदे मैदानात; म्हणाले, "राज ठाकरेंनी तुझं कौतुक केलंय, तू..."
20
"पप्पांनीच मम्मीला काठीने मारलं, पंख्याला लटकवलं..."; ३ वर्षांच्या लेकीने केली हत्येची पोलखोल

आदिवासी आश्रमशाळांमधील विद्यार्थी पोषण आहारापासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 04:12 IST

संजय पाटील लोकमत न्यूज नेटवर्क अमळनेर : गेल्या वर्षी २२ मार्चपासून लॉकडाऊन झाल्याने शाळा बंद झाल्या. त्यामुळे ...

संजय पाटील

लोकमत न्यूज नेटवर्क

अमळनेर : गेल्या वर्षी २२ मार्चपासून लॉकडाऊन झाल्याने शाळा बंद झाल्या. त्यामुळे शासनाला आदिवासी विद्यार्थ्यांच्या पोषण आहाराचा जणू विसरच पडला आहे. कोरोनोमुळे राज्यातील शासकीय व अनुदानित आदिवासी आश्रमशाळांमधील सुमारे साडेचार लाख विद्यार्थी गेल्या वर्षभरापासून पोषण आहारापासून वंचित आहेत.

राज्यातील शासकीय व अनुदानित आश्रम शाळांमधील विद्यार्थी आपापल्या घरी वस्त्या, वाड्या, पाड्यांवर निघून गेले. त्यावेळी १६ मार्च २०२० पूर्वी आश्रम शाळांना मिळालेले गहू, तांदूळ, धान्य, कपडे हे स्थानिक आदिवासी कुटुंब, आर्थिक दुर्बल कुटुंब, रेशन कार्ड नसलेले कुटुंब, अपंग, निराधार कुटुंब, विधवा महिलांचे कुटुंब, आपत्तीग्रस्त कुटुंब यांना वाटप करण्याचे आदेश शासनाने दिल्याने मुख्याध्यापकांनी ते साहित्य इतरत्र वाटून दिले.

अनेक आदिवासी कुटुंबांकडे रेशन कार्ड नाहीत, काहींना मिळाले तर ऑनलाइन नोंदणी नाही आणि झाली तर लाभार्थी योजनेत समाविष्ट नाही अशी परिस्थिती असताना पहिली ते आठवीत जाणारी मुले त्यांच्यावर बोझा ठरली आहेत. आश्रमशाळेत शिक्षण घेताना त्यांना दोन्ही वेळचे जेवण, नाष्टा, दूध , अंडी असा पोषण आहार दररोज मिळत होता. परंतु कोरोनामुळे शिक्षण तर बंद झाले, परंतु पोषण आहार देण्याबाबत शासनाला विसर पडला आहे. राज्यात ५५६ शासकीय आश्रमशाळा असून, सुमारे दोन लाख विद्यार्थी आहेत. अनुदानित आश्रमशाळा ५५० असून, त्यात सुमारे अडीच लाख विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. एकीकडे जिल्हा परिषदेच्या शाळा, खासगी प्राथमिक व खासगी माध्यमिक शाळेत पहिली ते आठव्या वर्गात शिकणाऱ्या प्रत्येक गरीब अथवा श्रीमंत पालकांच्या मुलांना पोषण आहार दिला जात आहे. शाळा बंद असल्याने मुलांना घरी आहार वाटप होत आहे. दुसरीकडे खऱ्या अर्थाने गरजू आदिवासी मुले मात्र यापासून वंचित राहिली आहेत.

कोट

शासनस्तरावर आदिवासी मुलांना पोषण आहार देण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र अद्यापपर्यंत आश्रम शाळेतील मुलांना पोषण आहाराबाबत कुठलेही निर्देश नाहीत

-विनिता सोनवणे, प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यावल, जि. जळगाव

कोट

आदिवासी मुलांच्या बाबतीत शासनाला विसर पडला आहे. ही बाब आदिवासीमंत्र्यांच्या लक्षात आणून दिली आहे. त्यांच्याकडे तक्रार केली आहे. 2 रोजी त्यांच्यासोबत बैठक आयोजित केली आहे. त्यावेळी न्याय मिळणे अपेक्षित आहे.- प्रतिभा शिंदे , नेत्या,लोकसंघर्ष मोर्चा.

कोट

शासनाने आदिवासी विद्यार्थी आणि सामान्य विद्यार्थी यांच्यात भेदभाव केला आहे. आश्रम शाळेत गरीब आदिवासीच शिक्षण घेतात त्यामुळे शासनाने पोषण आहार द्यावा अन्यथा शासनाच्या विरोधात असंतोष माजेल - पन्नालाल मावळे , खान्देश प्रांताध्यक्ष,आदिवासी पारधी विकास परिषद.