शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
2
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
3
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
4
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
5
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
6
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
7
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
8
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
9
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
10
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
11
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
12
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
13
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
14
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?
15
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
16
Sankashti Chaturthi 2025: चातुर्मासातली पहिली संकष्टी, बाराही राशींसाठी ठरणार खास; पूर्ण होणार प्रत्येक आस!
17
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
18
पतीचा भर रस्त्यात तमाशा; पत्नीवर केले सपासप वार, जांघेत अडकली तलवार! कशावरून झाला वाद?
19
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
20
CHYD च्या नवीन पर्वात निलेश साबळेंना मिस करशील का? गौरव मोरे म्हणाला, "मी त्यांच्यासोबत..."

लॉकडाऊन मध्ये एसटीचे १८ कोटींचे उत्पन्न बुडाले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2021 04:13 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : गेल्या वर्षाप्रमाणे यंदाही कोरोना संसर्गाचे प्रमाण वाढू लागल्याने, राज्य शासनाने १ मे पासून ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : गेल्या वर्षाप्रमाणे यंदाही कोरोना संसर्गाचे प्रमाण वाढू लागल्याने, राज्य शासनाने १ मे पासून कडक लॉकडाऊन जाहीर केला होता. या मध्ये फक्त अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी वगळता सर्व सामान्य नागरिकांसाठी बससेवा बंदच होती. सध्या दिवसभरात बोटावर मोजक्याच फेऱ्या सुरू आहेत. त्यामुळे महामंडळाच्या जळगाव विभागाचे या महिना भराच्या लॉकडाऊन मध्ये १८ कोटींच्या घरात उत्पन्न बुडाले असल्याची माहिती महामंडळ प्रशासनातर्फे देण्यात आली. तसेच १ जून पासून लॉकडाऊन मध्ये काहीशी शिथिलता येणार असल्यामुळे औरंगाबाद, नाशिक,पुणे या लांब पल्ल्याच्या मार्गावरही बसेस सोडण्याचे नियोजन असल्याचे सांगण्यात आले.

गेल्या वर्षी कोरोनामुळे सहा महिने महामंडळाची सेवा पूर्णपणे ठप्प होती. तर यंदाही महिनाभराच्या कडकडीत लॉकडाऊन मध्ये लालपरीची ९० टक्के सेवा बंदच होती. फक्त अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी १० टक्के सेवा सुरू आहे. सध्या जळगाव आगारातून धुळे,चाळीसगाव, जामनेर या ठिकाणीच अत्यावश्यक कर्मचाऱ्यांसाठी बससेचा सुरू आहे. दिवसभरात प्रवाशांच्या प्रतिसादानुसार सरासरी ८ ते १० फेऱ्या होत आहेत. फेऱ्या कमी असल्याने आगारात सध्या १५ टक्केच कर्मचाऱ्यांची उपस्थिती ठेवण्यात आली आहे. कोरोनामुळे बस मध्ये महामंडळाने ५० टक्केच प्रवाशांना बस मध्ये बसविण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार ४४ आसन क्षमतेपैकी एका आसनावर एक या प्रमाणे फक्त २२ प्रवाशांनाच बस मध्ये बसविण्यात येत आहे. यातील १५ प्रवाशी मिळाले, तरी प्रवाशांच्या सोयीसाठी महामंडळातर्फे तात्काळ बसेस सोडण्यात येत आहेत. तर बाहेरगावाहुन बसेस आल्यानंतर तात्काळ त्या बसेसचे निर्जंतुकीकरण करण्यात येत आहे.

इन्फो :१ जून पासून फेऱ्या वाढणार आणि उत्पन्नही वाढणार

सध्या लॉकडाऊनमुळे महामंडळाची अत्यावश्यक सेवेतील नागरीकांसाठीच बससेवा सुरू आहे. दिवसभरात फक्त बोटावर मोजण्या इतक्याच फेऱ्या सुरू आहेत. मात्र, एक जूननंतर लॉकडाऊन मधील काही निर्बंध उठविण्यात येणार असल्याने, त्या पार्श्वभूमीवर महामंडळातर्फे औरंगाबाद, नाशिक, पुणे या लांबच्या मार्गावर बसेस सोडण्याचे नियोजन आहे. तसेच जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागातील फेऱ्याही वाढविण्यात येणार आहेत. त्यामुळे एक जून पासून फेऱ्या वाढल्यानंतर उत्पन्नातही वाढ होणार असल्याचे महामंडळ प्रशासनातर्फे सांगण्यात आले.