शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
3
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
4
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
5
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
6
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
7
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
8
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
9
हा सदोष मनुष्यवधच!
10
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
11
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
12
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
13
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
14
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
15
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
16
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
17
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
18
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
19
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय

भुसावळ तालुक्यातील चार गावात वादळाचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 04:13 IST

भुसावळ : गेल्या दोन दिवसांपासून तालुक्यात वादळी पावसाने थैमान घातले आहे. त्यामुळे तालुक्यातील चार गावांतील ५९ शेतकऱ्यांच्या ४५ हेक्टर ...

भुसावळ : गेल्या दोन दिवसांपासून तालुक्यात वादळी पावसाने थैमान घातले आहे. त्यामुळे तालुक्यातील चार गावांतील ५९ शेतकऱ्यांच्या ४५ हेक्टर क्षेत्रातील केळी पिकाचे नुकसान झाले तर एका घराचे पत्रे उडून नुकसान झाले आले.

तालुक्यात मागील दोन दिवसांपासून वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने हजेरी लावल्यामुळे तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यात तालुक्यातील पिंपरीसेकम, फुलगाव, साकरी, जाडगाव या भागातील ५९ शेतकऱ्यांच्या ४५ हेक्टर क्षेत्रातील केळी पिकाचे नुकसान झाले. तालुक्यात मोठ्या प्रमाणात वादळी पावसाने नुकसान झाल्याच्या घटनेनंतर आमदार संजय सावकारे, तहसीलदार दीपक धिवरे, तालुका कृषी अधिकारी धनंजय पोळ यांच्यासह अधिकारी व पदाधिकाऱ्यांनी ३१ रोजी तालुक्यातील बाधित क्षेत्रातील नुकसानीची पहाणी केली. दरम्यान, नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाल्यानंतर नुकसानीचा आकडा समोर येणार आहे.

सध्या शेतकरी शेती कामात व्यस्त आहे. बहुतांश शेती क्षेत्र हे खाली आहे. बागायती क्षेत्रात काही शेतकऱ्यांनी नुकतीच पेरणी केली आहे. अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील केळीचे पीक उभे आहे. याच केळी पिकावर वादळी पावसाचा परिणाम होऊन पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शासन स्तरावरून या पिकांचे पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळण्याची अपेक्षा शेतकरी वर्गातून व्यक्त करण्यात येत आहे.