शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
2
मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय
3
आता जीवन विम्यासह आरोग्य विमा होणार स्वस्त; सरकार मोठा दिलासा देण्याच्या तयारीत
4
पावसाची डबल सेंच्युरी; २४ तासांत २०९ मिमी नाेंद; आता ‘ऑल टाइम रेकॉर्ड’ मोडण्याच्या मार्गावर
5
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
6
भाड्याच्या जागेतील सरकारी कार्यालये पुढील वर्षी वडाळ्यात; GST भवनात करणार सगळ्यांची व्यवस्था
7
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
8
वादळात सहा बोटी बुडाल्या; मुंबई, गुजरातमधील सात खलाशी बेपत्ता, ११ जणांना वाचविले
9
मोनोच्या सात गाड्या दिरंगाईच्या फेऱ्यात; चाचण्या सुरू असल्याचा ‘एमएमएमओसीएल’चा दावा
10
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
11
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
12
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
13
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
14
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
15
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
16
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
17
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
18
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
19
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
20
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?

नऊ दिवसात पाचव्यांदा वादळाचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 04:13 IST

गत मंगळवारी सातपुड्याच्या पायथ्यालगत अहिरवाडी, मोहगण व पाडळे शिवारातील केळीबागा जमीनदोस्त झाल्यानंतर गुरूवारी खिर्डी, वाघाडी, रेंभोटा, धामोडी, शिंगाडी, कोळदा, ...

गत मंगळवारी सातपुड्याच्या पायथ्यालगत अहिरवाडी, मोहगण व पाडळे शिवारातील केळीबागा जमीनदोस्त झाल्यानंतर गुरूवारी खिर्डी, वाघाडी, रेंभोटा, धामोडी, शिंगाडी, कोळदा, सुलवाडी, भामलवाडी, कांडवेल, ऐनपूर, निंबोल, विटवे व निंभोरासीम शिवारातील अंदाजे ७५८ हेक्टर क्षेत्रात वादळी पावसाने दुसरा तडाखा दिला. त्यात केळीबागा जमीनदोस्त होऊन व ५१२ घरांची पडझड होऊन ४०.३० कोटी रु. नुकसानीचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्या पंचनाम्यांना सुरुवात झाली न झाली तोच पुन्हा शनिवारी पाल, गुलाबवाडी, जिन्सी, मस्कावद, सिंगत, बलवाडी व थोरगव्हाण परिसरातील वादळी पावसाचा तिसरा तडाखा बसून अंदाजे १८९ हेक्टरमधील केळीबाग जमीनदोस्त होऊन तर ८१ घरांची पडझड होऊन अपरिमित ८ कोटींची अपरिमित हानी झाली होती.

दरम्यान, सोमवारी रात्री उटखेडा-भाटखेडा परिसरात वादळी पावसाने चौथ्यांदा तडाखा दिल्याने शेकडो हेक्टर केळीबागा उद्ध्वस्त झाल्याची शोकांतिका आहे.

किंबहुना, बुधवारी पहाटे दीड ते दोन वाजेच्या सुमारास तुफान वादळी व मुसळधार पावसाच्या तडाख्यात मंगरूळ, जुनोने, मोहगण, पिंप्री, अहिरवाडी, पाडळे बुद्रूक, कर्जोद, भोकरी शिवारातील ऐन कापणीवरील केळीबागा उन्मळून जमीनदोस्त झाल्याने कोट्यवधी रुपयांचा केळीमाल मातीमोल झाला आहे.

शेताच्या बांधावरील बहुतांशी झाडं तथा रस्त्यालगतची झाड उन्मळून रस्त्यावर पडल्याने केऱ्हाळेहून पिंप्री, मंगरूळ, जुनोने, कर्जोद व अहिरवाडी शिवारात जाणारे रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली होती. ऐन हातातोंडाशी आलेला केळी उत्पादनाचा घास हिरावून घेतल्याने तथा जमीनदोस्त झालेल्या केळीबागांची सफाई करून पुन्हा ते क्षेत्र लागवडीखाली आणण्याचे संकट आ वासून असल्याने केळी उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहेत.

या वादळी पावसात जुनोने, मंगरूळ, पिंप्री, मोहगण, अहिरवाडी, कर्जोद, वाघोड गावांचा व शेतीशिवारातील वीजखांब तथा वीजतारांवर झाडे उन्मळून तारा तुटून आज रात्री उशिरापर्यंत तब्बल १२ ते १६ तासांनंतरही वीजपुरवठा खंडित झाल्याने नळपाणीपुरवठा योजनाही विस्कळीत झाला आहे.

दरम्यान, आज तहसीलदार उषाराणी देवगुणे, खानापूर भाग मंडळाधिकारी विठोबा पाटील, कृषी पर्यवेक्षक अनिल महाजन, कृषी सहाय्यक तडवी व सर्व सजा तलाठी यांनी शेतीशिवारातील पाहणी करून ६५४ शेतकऱ्यांच्या ६१७ हेक्टर क्षेत्रातील केळी बागा जमीनदोस्त होऊन २४ कोटी ४८ लाख २० हजार रु.चे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज तहसीलदार उषाराणी देवगुणे, गटविकास अधिकारी दीपाली कोतवाल व तालुका कृषी अधिकारी एम.जी.भामरे यांनी जिल्हा प्रशासनाकडे सादर केला आहे.