शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
2
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
3
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
4
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
5
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
6
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
7
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
8
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
9
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
10
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
11
Mumbai Rain Mithi River: दोरी फेकली, पण अंदाज चुकला; मिठी नदीच्या पुरात तरुण गेला वाहून
12
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
13
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
14
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका
15
कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात पोलीस अधिकाऱ्याचा जीव गेला; रस्त्यावर पडताच कारने चिरडले
16
"मी सुरक्षित आहे..." १३ दिवसांनी अर्चना तिवारीचा आईला फोन; बेपत्ता होण्यामागचं रहस्य उलगडणार?
17
निमिषा प्रियासाठी सरकार जनतेकडून ८ कोटी मागत आहे? परराष्ट्र मंत्रालयाने सत्य सांगितले
18
याला म्हणतात शेअर...! 24 तासांत 1 लाखाचे केले 88 लाख, एवढी तेजी आली की ट्रेडिगच थांबवावी लागली! नेमकं काय घडलं?
19
जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार
20
ऑनलाइन बेटिंग आता दंडनीय गुन्हा, केंद्रीय मंत्रिमंडळाचा गेमिंग विधेयकाला हिरवा कंदील

विजेचा लपंडाव थांबवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:20 IST

याबाबत सविस्तर असे की, महावितरण कंपनीचे प्रभाग क्रमांक १२ मधील नागरिक नियमित ग्राहक असून नियमित लाइटबिल भरत असतात. ...

याबाबत सविस्तर असे की, महावितरण कंपनीचे प्रभाग क्रमांक १२ मधील नागरिक नियमित ग्राहक असून नियमित लाइटबिल भरत असतात. मात्र, काही महिन्यांपासून प्रभाक क्र. १२ येथे रोज रात्री वारंवार लाइट जात असल्याने प्रभागातील नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यात पाऊस न झाल्याने प्रचंड प्रमाणात उकाडा होत असल्याने लहान मुले व वयोवृद्धांना, आजारी असलेल्यांना त्रास सहन करावा लागत आहे. रात्री वीजपुरवठा बंद झाल्याने चोऱ्यासुद्धा होण्याची शक्यता आहे.

रात्री वीजपुरवठा कधीही येतो, त्यात काही वेळेस विजेचा दाब कमी असल्याने इलेक्ट्रिक वस्तूसुद्धा खराब झाल्या आहेत. वीजपुरवठा बंद झाल्यानंतर संबंधित विभागात फोन केला तर तेथे कोणीही फोनसुद्धा उचलत नाही, असे नेहमी होत असल्याने नागरिकांना मानसिक त्रास सहन करावा लागत आहे.

याबाबत प्रत्यक्षात तपासणी करून जो काही तांत्रिक बिघाड असेल, तो सुधारला जावा व वीजपुरवठा सुरळीत करावा. नियमित वीजपुरवठा देण्याची मागणी प्रभाग बारामधील नागरिकांनी केली आहे. अन्यथा, जोपर्यंत सदरील त्रास बंद होत नाही, तोपर्यंत दरमहा लाइटबिल भरणार , असा इशारा या प्रभागातील गौरव राजेंद्र वाघ, हर्षल कापडे, रेहान अली, समीर महोमद, रफिक शेख, चेतन मेहते, आकाश अग्रवाल, प्रवीण भोसले, आशिष जाधव, विशाल अग्रवाल, महोमद जुबेर, नदीम शेख, अशोक पवार, थितू मेहरा, नेहाल यादव, तुषार पवार, अभिषेक देवपूजे, नितीन वाघ, आकाश निकम अशांनी निवेदनावर सही करून महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीने याची नोंद घ्यावी, असे निवेदनात म्हटले आहे.

फोटो कॅप्शन :- भुसावळ शहरातील तापीनगर परिसरात असलेल्या महाराष्ट्र राज्य वीज कंपनी कार्यालयात अतिरिक्त कार्यकारी अभियंता राहुल पावडे यांना प्रभाग क्रमांक १२ मधील रहिवासी निवेदन देताना.

फोटो - ०६/६