शहरं
Join us  
Trending Stories
1
छ. संभाजीनगरमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी स्वबळावर; १८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर!
2
VIDEO: बांगलादेशात आणखी एका हिंदूची हत्या; घरात कोंडून जाळले, अमित मालवीयंचा दावा...
3
मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीसाठी महायुतीबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा- प्रताप सरनाईक
4
Amit Shah: "राहुल बाबा, इतक्यात थकू नका! अजून बंगाल- तामिळनाडूतही पराभव बघायचा आहे" अमित शहांचा टोला
5
रीलची हौस महागात! Video बनवण्याच्या नादात सत्यानाश; गॅस सुरू, किचनच्या ओट्यावर चढली अन्...
6
दिग्विजय सिंह यांच्या 'त्या' पोस्टमुळे काँग्रेस खासदार संतापले; RSS ची थेट अल-कायदाशी केली तुलना
7
'शरद पवार माझे मार्गदर्शक..' गौतम अदानींकडून बारामतीत पवारांच्या कार्याचे भरभरून कौतुक
8
PMC Elections : अदानी बारामतीत, मंचावर बसलेल्या साहेब अन् दादांची चर्चा..! एकत्र येण्याच्या चर्चांना पुन्हा बळ
9
Mumbai: तरुणींना अर्ध्या रस्त्यातच उतरवलं आणि...; वाद्र्यांत रिक्षाचालकाचं लज्जास्पद कृत्य!
10
भारतीय आजारी असण्याला आई-वडील जबाबदार, डॉक्टरांचं विधान; तुम्हीच ठरवा कोण बरोबर?
11
गौतम गंभीरमुळे टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये भीतीचे वातावरण? खेळाडू तणावात असल्याची चर्चा
12
भयानक! गहू साफ करायला सांगताच सून भडकली, सासूवर वीट फेकली; पतीवरही जीवघेणा हल्ला
13
IAS प्रेमकथा: IIT मधून शिकलेला IAS नवरदेव अन् IRS अधिकारी वधू; कोण आहेत विकास आणि प्रिया?
14
संरक्षण क्षेत्रात अदानी समूहाचा मोठा डाव! १.८ लाख कोटींची गुंतवणूक करणार; काय आहे मेगा प्लॅन?
15
"काँग्रेसकडे सत्ता नसली, तरीही आमचा पाठीचा कणा अजून ताठ आहे," मल्लिकार्जुन खरगेंची टीका
16
Giriraj Singh : "ममता बॅनर्जींनी बांगलादेशात जाऊन पंतप्रधान व्हावं"; घुसखोरांवरुन गिरिराज सिंह यांचा खोचक टोला
17
Mehbooba Mufti: "गांधी- नेहरूंचा हिंदुस्थान आता 'लिंचिस्तान' झालाय!", मेहबूबा मुफ्तींचा केंद्र सरकारवर प्रहार
18
जेवण आणि झोप यामध्ये नेमकं किती अंतर असावं? निरोगी आयुष्यासाठी पाळा 'हा' सोपा नियम
19
सावधान! तुमची एक छोटी चूक आणि बँक खाते रिकामे; UPI वापरताना 'हे' ५ डिजिटल नियम पाळणे आता अनिवार्य
20
Navneet Rana: "अजित पवारांचं भाजपसोबत जाणं, हा शरद पवारांचाच प्लॅन!" नवनीत राणा असं का म्हणाल्या?
Daily Top 2Weekly Top 5

अध्यात्म

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2021 04:13 IST

पंडित वाचक जरी झाला पुरता। तरी कृष्ण कथा ऐके भावे । क्षीर तूपा साकरे जालिया भेटी | तैसी ...

पंडित वाचक जरी झाला पुरता। तरी कृष्ण कथा ऐके भावे । क्षीर तूपा साकरे जालिया भेटी | तैसी पडे मिठी गोड पणे।।

जाणोनिया लाभ घेई हा पदरी, गोड गोडावरी सेंवी बापा । जाणिवेचे मूळ उपडोनी खोड, जरी तुज चाड आहे तुझी।।

नाना परिमळ द्रव्य उपचार, अंगी उटी सार चंदनाची।

जेविलियाविण शून्य ते शृंगारी, तैसी गोडी हरी कथेविंण ।

ज्याकारणे वेद श्रुती ही पुराणें, तेचि विठ्ठलनामे तिष्ठे कथे। तुका म्हणे येर दगडाची पेंवे, खळ खळीचे अवघे मूळ तेथे।।

माणूस कितीही सुशिक्षित झाला, तरी त्याने हरिकथा, कीर्तन, श्रवण सोडू नये. या अर्थी तुकाराम महाराज वेद, वेत्ता, पुराणिक कथा, कीर्तन न ऐकणारा अशा माणसाला या अभंगातून उपदेश करीत आहेत.

तू जरी पंडित किंवा पुराणिक झाला असलास, तरी पण भक्तिभावाने कृष्ण कथा ऐक. जसे दूध, तूप आणि साखर यांचा संयोग झाला असता अधिकच गोडी येते, त्या प्रमाणे तू विद्वान तर आहेसच, त्यात कृष्णकथा ऐकलीस तर गोडपणाची विशेष भर पडेल.(१)

अरे बाबा, कृष्ण कथेचे महत्त्व लक्षात घेऊन हा लाभ पदरात पाडून घे. पांडित्याच्या गोड रसावर अधिक गोड, अशा कृष्ण कथेचे सेवन कर. जर तुला आत्मप्राप्तीची इच्छा असेल तर देहाभिमानाचे मूळ असलेले अविद्येचे खोड उपटून टाक. (२)

जसे अनेक सुगंधी द्रव्यांच्या भोगांमध्ये अंगाला चंदनाची उटी लावणे महत्त्वाचे आहे, तसे अनेक प्रकारच्या महत्त्वामध्ये हरिकथा श्रवण करणे, विशेष महत्त्वाचे आहे. पोटात अन्न नसता देहाला वर वर शृंगारणे जसे व्यर्थ आहे तसे हरिकथेवाचून विद्वतेचि खरी गोडी नाही ।(३)

ज्यांच्याकरिता वेद, श्रुती आणि पुराणे यांची प्रवृत्ती आहे ते विठ्ठलरूपी धन कथेमध्ये उभे असते. श्री तुकाराम महाराज म्हणतात, हरिकथेवाचून विद्वत्ता संपादन करणे म्हणजे दगडाचे पेव उपसल्यासारखे आहे व केवळ नाहक प्रयत्न करणे होय. (४)

साधारणत : माणूस वेद-पुराण जाणू लागला की, त्याच्या मनामध्ये अहंकाराचा उदय होतो व त्याची अवस्था ‘अंगी भरीला ताठा कोणासी मानींना’ अशी होते. परंतु, हरिकथेशिवाय हे सर्व व्यर्थ आहे, असे श्री तुकाराम महाराज म्हणतात. कथा, कीर्तन यामध्ये भगवंताचे भजन होते व भगवंताच्या भजनाच्या योगाने माणसांच्या पापाचे भंजन होते. महाराज म्हणतात की, माणसाला मोठेपण हे भगवंताच्या भजन, कीर्तन, कथेने येते. वेदपाठ, पुराण श्रवण हे तर महत्त्वाचे आहेच, पण त्याला हरिकथा, कीर्तन, भजन यांची साथ मिळाली तर दुग्धशर्करायोग निर्माण होतो. महाराज म्हणतात, ‘तुका म्हणे येथे भजन प्रमाण। काय थोर पण जाळावे ते।।’

निरूपण : ह. भ. प. दादा महाराज जोशी