शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्त दौरा... अन डील पक्की...! इस्रायल भारताला दोन शक्तिशाली क्षेपणास्त्रे देणार; पाकिस्तान, चीन सगळेच टप्प्यात...
2
गाड्या पुढे सरकल्या अन्....; दिल्ली कार स्फोटाचा 'तो' भीषण VIDEO पहिल्यांदाच समोर, CCTV पडले बंद
3
"सकाळी मुलीला शाळेत सोडायला गेली अन् पतीसह एकाने बंधक बनवले, मग..."; IAS पत्नीचा खळबळजनक दावा
4
२३ नोव्हेंबरपर्यंत कोकण रेल्वेवर मेगा ब्लॉक; सेवांवर मोठा परिणाम, तुमचं तिकीट याच वेळेत आहे?
5
वनडे करिअर टिकवण्यासाठी हिटमॅन रोहित शर्माला BCCI ची 'ती' अट मान्य; विराट कोहलीचं काय?
6
Groww IPO Listing: केवळ ५% होता GMP, पण कंपनीची धमाकेदार एन्ट्री; पहिल्याच दिवशी 'या' शेअरनं दिला २३% पेक्षा जास्त फायदा
7
Delhi Blast: दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणी महत्त्वाची अपडेट, संशयितांना कार विकणारा डीलर ताब्यात!
8
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात आणखी एक दहशतवादी डॉक्टर अटकेत; देशभरात छापेमारी सुरू...
9
निवृत्तीनंतरचे जीवन सुरक्षित! एकदाच गुंतवणूक करा आणि आयुष्यभर १ लाखाहून अधिक पेन्शन मिळवा
10
Delhi Blast : २६ जानेवारी, दिवाळीला स्फोट करण्याचा होता प्लॅन, पण...; दिल्ली स्फोट प्रकरणात मुझम्मिलचा मोठा खुलासा
11
“महायुती विजयी झाली पाहिजे”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकर्त्यांना सूचना
12
प्रसिद्ध अभिनेत्रीच्या मैत्रिणीचा दिल्ली स्फोटात मृत्यू, दु:ख व्यक्त करत म्हणाली, "इतका क्रूर..."
13
कोल्हापूर: बिबट्याच्या हल्ल्यात बैल ठार, गगनबावडा तालुक्यात भीतीचे वातावरण
14
धनुष्यबाणावर आज फैसला? शिवसेना नाव आणि चिन्हाबाबत अंतिम सुनावणी; आमदार अपात्रतेवरही येणार निकाल
15
पतीसोबत तलाक, मग बनली प्रोफेसर; 'जैश-ए-मोहम्मद'मध्ये महिलांच्या भर्तीची होती जबाबदारी! दहशतवादी डॉ. शाहीनची संपूर्ण कुंडली
16
AQIS: मुंब्रा येथील शिक्षकाच्या घरावर एटीएसचा छापा; पुण्यातील'अल-कायदा' प्रकरणाशी कनेक्शन
17
प्रशांत किशोर यांची भविष्यवाणी खरी होणार? बिहार निवडणुकीच्या एक्झिट पोलने केले शिक्कामोर्तब!
18
दिल्ली स्फोटातील 10 पैकी 8 मृतदेहांची ओळख पटली; इतर दोन मृतदेह दहशतवाद्यांचे? तपास सुरू...
19
Delhi Blast : हृदयद्रावक! आई-वडिलांसाठी खास टॅटू, त्यावरुनच मृतदेहाची ओळख; दिल्ली स्फोटात अमरचा मृत्यू
20
STP ही एसआयपीपेक्षा वेगळी कशी? काय आहेत फायदे-तोटे? कुणासाठी आहे बेस्ट?

अध्यात्म

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2021 04:13 IST

पंडित वाचक जरी झाला पुरता। तरी कृष्ण कथा ऐके भावे । क्षीर तूपा साकरे जालिया भेटी | तैसी ...

पंडित वाचक जरी झाला पुरता। तरी कृष्ण कथा ऐके भावे । क्षीर तूपा साकरे जालिया भेटी | तैसी पडे मिठी गोड पणे।।

जाणोनिया लाभ घेई हा पदरी, गोड गोडावरी सेंवी बापा । जाणिवेचे मूळ उपडोनी खोड, जरी तुज चाड आहे तुझी।।

नाना परिमळ द्रव्य उपचार, अंगी उटी सार चंदनाची।

जेविलियाविण शून्य ते शृंगारी, तैसी गोडी हरी कथेविंण ।

ज्याकारणे वेद श्रुती ही पुराणें, तेचि विठ्ठलनामे तिष्ठे कथे। तुका म्हणे येर दगडाची पेंवे, खळ खळीचे अवघे मूळ तेथे।।

माणूस कितीही सुशिक्षित झाला, तरी त्याने हरिकथा, कीर्तन, श्रवण सोडू नये. या अर्थी तुकाराम महाराज वेद, वेत्ता, पुराणिक कथा, कीर्तन न ऐकणारा अशा माणसाला या अभंगातून उपदेश करीत आहेत.

तू जरी पंडित किंवा पुराणिक झाला असलास, तरी पण भक्तिभावाने कृष्ण कथा ऐक. जसे दूध, तूप आणि साखर यांचा संयोग झाला असता अधिकच गोडी येते, त्या प्रमाणे तू विद्वान तर आहेसच, त्यात कृष्णकथा ऐकलीस तर गोडपणाची विशेष भर पडेल.(१)

अरे बाबा, कृष्ण कथेचे महत्त्व लक्षात घेऊन हा लाभ पदरात पाडून घे. पांडित्याच्या गोड रसावर अधिक गोड, अशा कृष्ण कथेचे सेवन कर. जर तुला आत्मप्राप्तीची इच्छा असेल तर देहाभिमानाचे मूळ असलेले अविद्येचे खोड उपटून टाक. (२)

जसे अनेक सुगंधी द्रव्यांच्या भोगांमध्ये अंगाला चंदनाची उटी लावणे महत्त्वाचे आहे, तसे अनेक प्रकारच्या महत्त्वामध्ये हरिकथा श्रवण करणे, विशेष महत्त्वाचे आहे. पोटात अन्न नसता देहाला वर वर शृंगारणे जसे व्यर्थ आहे तसे हरिकथेवाचून विद्वतेचि खरी गोडी नाही ।(३)

ज्यांच्याकरिता वेद, श्रुती आणि पुराणे यांची प्रवृत्ती आहे ते विठ्ठलरूपी धन कथेमध्ये उभे असते. श्री तुकाराम महाराज म्हणतात, हरिकथेवाचून विद्वत्ता संपादन करणे म्हणजे दगडाचे पेव उपसल्यासारखे आहे व केवळ नाहक प्रयत्न करणे होय. (४)

साधारणत : माणूस वेद-पुराण जाणू लागला की, त्याच्या मनामध्ये अहंकाराचा उदय होतो व त्याची अवस्था ‘अंगी भरीला ताठा कोणासी मानींना’ अशी होते. परंतु, हरिकथेशिवाय हे सर्व व्यर्थ आहे, असे श्री तुकाराम महाराज म्हणतात. कथा, कीर्तन यामध्ये भगवंताचे भजन होते व भगवंताच्या भजनाच्या योगाने माणसांच्या पापाचे भंजन होते. महाराज म्हणतात की, माणसाला मोठेपण हे भगवंताच्या भजन, कीर्तन, कथेने येते. वेदपाठ, पुराण श्रवण हे तर महत्त्वाचे आहेच, पण त्याला हरिकथा, कीर्तन, भजन यांची साथ मिळाली तर दुग्धशर्करायोग निर्माण होतो. महाराज म्हणतात, ‘तुका म्हणे येथे भजन प्रमाण। काय थोर पण जाळावे ते।।’

निरूपण : ह. भ. प. दादा महाराज जोशी