शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
4
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
5
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
6
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
7
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
8
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
10
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
11
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
12
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
13
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
14
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
15
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
16
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
17
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
18
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
19
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
20
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
Daily Top 2Weekly Top 5

अध्यात्म

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2021 04:13 IST

पंडित वाचक जरी झाला पुरता। तरी कृष्ण कथा ऐके भावे । क्षीर तूपा साकरे जालिया भेटी | तैसी ...

पंडित वाचक जरी झाला पुरता। तरी कृष्ण कथा ऐके भावे । क्षीर तूपा साकरे जालिया भेटी | तैसी पडे मिठी गोड पणे।।

जाणोनिया लाभ घेई हा पदरी, गोड गोडावरी सेंवी बापा । जाणिवेचे मूळ उपडोनी खोड, जरी तुज चाड आहे तुझी।।

नाना परिमळ द्रव्य उपचार, अंगी उटी सार चंदनाची।

जेविलियाविण शून्य ते शृंगारी, तैसी गोडी हरी कथेविंण ।

ज्याकारणे वेद श्रुती ही पुराणें, तेचि विठ्ठलनामे तिष्ठे कथे। तुका म्हणे येर दगडाची पेंवे, खळ खळीचे अवघे मूळ तेथे।।

माणूस कितीही सुशिक्षित झाला, तरी त्याने हरिकथा, कीर्तन, श्रवण सोडू नये. या अर्थी तुकाराम महाराज वेद, वेत्ता, पुराणिक कथा, कीर्तन न ऐकणारा अशा माणसाला या अभंगातून उपदेश करीत आहेत.

तू जरी पंडित किंवा पुराणिक झाला असलास, तरी पण भक्तिभावाने कृष्ण कथा ऐक. जसे दूध, तूप आणि साखर यांचा संयोग झाला असता अधिकच गोडी येते, त्या प्रमाणे तू विद्वान तर आहेसच, त्यात कृष्णकथा ऐकलीस तर गोडपणाची विशेष भर पडेल.(१)

अरे बाबा, कृष्ण कथेचे महत्त्व लक्षात घेऊन हा लाभ पदरात पाडून घे. पांडित्याच्या गोड रसावर अधिक गोड, अशा कृष्ण कथेचे सेवन कर. जर तुला आत्मप्राप्तीची इच्छा असेल तर देहाभिमानाचे मूळ असलेले अविद्येचे खोड उपटून टाक. (२)

जसे अनेक सुगंधी द्रव्यांच्या भोगांमध्ये अंगाला चंदनाची उटी लावणे महत्त्वाचे आहे, तसे अनेक प्रकारच्या महत्त्वामध्ये हरिकथा श्रवण करणे, विशेष महत्त्वाचे आहे. पोटात अन्न नसता देहाला वर वर शृंगारणे जसे व्यर्थ आहे तसे हरिकथेवाचून विद्वतेचि खरी गोडी नाही ।(३)

ज्यांच्याकरिता वेद, श्रुती आणि पुराणे यांची प्रवृत्ती आहे ते विठ्ठलरूपी धन कथेमध्ये उभे असते. श्री तुकाराम महाराज म्हणतात, हरिकथेवाचून विद्वत्ता संपादन करणे म्हणजे दगडाचे पेव उपसल्यासारखे आहे व केवळ नाहक प्रयत्न करणे होय. (४)

साधारणत : माणूस वेद-पुराण जाणू लागला की, त्याच्या मनामध्ये अहंकाराचा उदय होतो व त्याची अवस्था ‘अंगी भरीला ताठा कोणासी मानींना’ अशी होते. परंतु, हरिकथेशिवाय हे सर्व व्यर्थ आहे, असे श्री तुकाराम महाराज म्हणतात. कथा, कीर्तन यामध्ये भगवंताचे भजन होते व भगवंताच्या भजनाच्या योगाने माणसांच्या पापाचे भंजन होते. महाराज म्हणतात की, माणसाला मोठेपण हे भगवंताच्या भजन, कीर्तन, कथेने येते. वेदपाठ, पुराण श्रवण हे तर महत्त्वाचे आहेच, पण त्याला हरिकथा, कीर्तन, भजन यांची साथ मिळाली तर दुग्धशर्करायोग निर्माण होतो. महाराज म्हणतात, ‘तुका म्हणे येथे भजन प्रमाण। काय थोर पण जाळावे ते।।’

निरूपण : ह. भ. प. दादा महाराज जोशी