शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

जनता कर्फ्यू संपताच बाजार समितीत ६२९ क्विंटल भाजीपाल्याची आवक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2021 04:17 IST

जळगाव : वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जाहीर करण्यात आलेल्या जनता कर्फ्यूच्या तीन दिवसांच्या बंदनंतर सोमवारी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ...

जळगाव : वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जाहीर करण्यात आलेल्या जनता कर्फ्यूच्या तीन दिवसांच्या बंदनंतर सोमवारी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भाजीपाला, फळे यांची नियमित आवक सुरू झाली. यामध्ये बंदनंतरच्या पहिल्याच दिवशी ६२९ क्विंटल भाजीपाल्याची आवक झाली. या सोबतच फळे, कांदा, बटाटेदेखील नेहमीप्रमाणे आले असून खरेदीदारांनाही ते सहज उपलब्ध झाले.

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने १२ ते १४ मार्च दरम्यान जनता कर्फ्यू जाहीर केला. यामध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीमधील व्यवहारदेखील बंद ठेवण्याचे आदेश होते. जनता कर्फ्यूच्या या काळात पहिल्या दिवशी १२ मार्च रोजी बाहेरगावाहून येणाऱ्या भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांनी आपला माल कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आणला. मात्र प्रवेश नाकारण्यात आल्याने मोठा गोंधळ झाला व शेतकऱ्यांनी हा माल फेकून दिला होता. त्यानंतर दोन दिवस भाजीपाल्याची आवक बंद राहिली.

सोमवार, १५ मार्च रोजी बाजार समिती सुरू झाल्यानंतर या ठिकाणी जिल्ह्यातील एरंडोल, पारोळा व इतर तालुक्यांसह मराठवाडा भागातून भाजीपाला आला. यात एकूण ६२९ क्विंटल भाजीपाला सोमवारी दाखल झाला. या सोबतच ८९ क्विंटल फळे, एक हजार ८८ क्विंटल कांदा, ३५० क्विंटल बटाटे बाजार समितीमध्ये दाखल झाले. जनता कर्फ्यू काळात मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश या भागातून येणारे बटाटेदेखील येत नव्हते. सोमवारी त्यांचीही आवक सुरू झाली.

बाजार समितीमधील आवक (क्विंटलमध्ये)

माल आवक

भाजीपाला ६२९

फळे ८९

कांदा १०८८

बटाटे ३५०