शहरं
Join us  
Trending Stories
1
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
2
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
3
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
4
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
5
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
6
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
7
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
8
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
9
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
10
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
11
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
12
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
13
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
14
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
15
हा सदोष मनुष्यवधच!
16
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
17
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
18
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
19
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु

पाण्याचा निचरा होण्यासाठी मातीचा भराव काढण्यात येणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 04:13 IST

''प्रभाव लोकमत''चा : बोगदा न उभारल्याने शेतात तुंबले आहे पाणी जळगाव : रेल्वे प्रशासनाने तिसऱ्या रेल्वे मार्गाचे काम करताना, ...

''प्रभाव लोकमत''चा : बोगदा न उभारल्याने शेतात तुंबले आहे पाणी

जळगाव : रेल्वे प्रशासनाने तिसऱ्या रेल्वे मार्गाचे काम करताना, शिरसोलीच्या पुढे दापोरा शिवारात पाण्याचा निचरा होण्यासाठी बोगदा न उभारल्याने पावसाचे पाणी शेतकऱ्यांच्या शेतातचं तुंबले आहे. या प्रकाराबाबत ‘लोकमत’ने बुधवारी शेतकरी बांधवांच्या होत असलेल्या नुकसानीबाबत वृत्त प्रकाशित केल्याने, या वृत्ताची रेल्वे प्रशासनाने गंभीर दखल घेतली आहे. पाण्याचा निचरा होण्यासाठी तिसऱ्या लाईनच्या कामासाठी उभारलेला मातीचा भराव काढण्यात येणार असल्याचे रेल्वे प्रशासनातर्फे सांगण्यात आले.

भुसावळ रेल्वे प्रशासनातर्फे गेल्या दोन वर्षांपासून जळगाव ते मनमाड दरम्यान तिसरा रेल्वे मार्ग उभारण्यात येत आहे. या मार्गाचा पहिला टप्पा शिरसोलीपर्यंत बऱ्याच ठिकाणी पूर्ण झाला असून,शिरसोलीच्या पुढे तिसरा मार्ग उभारण्यासाठी जमीन सपाटीकरणाचे काम सुरू आहे. मात्र,रेल्वे प्रशासनातर्फे या कामासाठी नियुक्त केलेल्या ठेकेदाराने शेतातील पाण्याचा निचरा होणारा जुना बोगदा बुजून पुन्हा तिसऱ्या रेल्वे मार्गासाठी रूळ टाकल्यानंतर नवीन बोगदा मात्र उभारलाच नाही. यामुळे शेतातील पाण्याचा निचरा होण्यासाठी गटार ना बोगदा नसल्यामुळे पुंडलिक सुरवाडे, नाना गावंडे, बापू गावंडे, बापू मराठे, माणिक गावंदे या शेतकऱ्यांच्या शेतात गुडघ्यापर्यंत पाणी तुंबले होते. त्यामुळे या शेतकऱ्यांनी रेल्वे प्रशासनाच्या कारभारा विरोधात मंगळवारी तीव्र संताप व्यक्त केला.

इन्फो :

गुरुवारी मातीचा भराव काढण्यात येणार

या शेतकरी बांधवांच्या शेतात मोठ्या प्रमाणावर पाणी तुंबल्याने, त्यांना यंदाचा खरीप हंगाम वाया जाण्याची भीती सतावत आहे. याबाबत लोकमत वृत्त मांडल्यानंतर रेल्वेचे उप मुख्य अभियंता पंकज डावरे यांनी शेतातील पाण्याचा निचरा होण्यासाठी तिसऱ्या रेल्वे मार्गासाठी उभारण्यात आलेला मातीचा भराव काढण्याची तयारी दर्शविली आहे. हा भराव काढल्यानंतर शेतातील पाणी जुन्या बोगद्यातून सहजपणे बाहेर पडणार आहे. यामुळे शेतकरी बांधवांच्या शेतात पाणी तुंबणार नाही. गुरुवारी सकाळी हे काम करण्यात येणार असल्याचे डावरे यांनी सांगितले.