शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
2
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा
3
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
4
माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार..! भर सभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले ?
5
खुल्लम खुल्ला प्यार... 'चॅम्पियन' एडन मार्करमने भरमैदानात सर्वांसमोर पत्नीला केलं किस, Photo व्हायरल
6
पहिली गोळी मांडीवर अन् शाहरुख आडवा झाला; असा होता एन्काऊंटरचा थरार...
7
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
8
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
9
पालकांच्या कष्टाची जाण! मराठी अभिनेत्याने आई-बाबांसाठी घेतलं नवीन घर, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
10
Maharashtra Rains: राज्यात पावसाचा जोर वाढला, वीज पडून ९ जणांचा मृत्यू; ७ जण भाजले!
11
हेलिकॉप्टर पायलट बनायचंय? किती खर्च, किती पगार? जाणून घ्या A to Z माहिती!
12
Ahmedabad Plane Crash : आईच्या शब्दाखातर 'तो' थांबला अन् विमान अपघातातून जीव वाचला; ऐनवेळी नेमकं काय घडलं?
13
Israel–Iran War : इस्त्रायल-इराण युद्धात जग दोन गटात विभागले! 'या' मुस्लीम देशांनी घेतली इराणची बाजू; भारत कोणासोबत?
14
BCCI ने जाहीर केलं 'टीम इंडिया'चं पुढल्या वर्षीचं वेळापत्रक, रोहित-विराट 'या' तगड्या संघाविरूद्ध मैदानात उतरणार
15
केदारनाथला जाण्यासाठी हेलिकॉप्टरचं तिकीट किती? अपघात झाल्यास कोण देतं भरपाई?
16
Bhiwandi Fire: भिवंडीत भीषण आगीत, १२ केमिकल गोदामे जळून खाक!
17
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
18
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
19
मोठा दिलासा! आधार मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी? UIDAI ने तारीख बदलली!
20
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !

तर पुजारा, रहाणेचा पर्याय शोधावा लागेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2021 04:20 IST

सलामीवीर शुभमन गिल आणि मयंक अग्रवाल यांच्या दुखापतीमुळे संघाला दुखापत झाल्यामुळेच तो नशीबवान ठरला. त्याला संधी मिळाली. स्विंग ...

सलामीवीर शुभमन गिल आणि मयंक अग्रवाल यांच्या दुखापतीमुळे संघाला दुखापत झाल्यामुळेच तो नशीबवान ठरला. त्याला संधी मिळाली. स्विंग आणि सीम गोलंदाजांना मदत करणाऱ्या परिस्थितीत तो संघाचा सर्वात चांगला फलंदाज ठरला आहे. तो कसोटी क्रिकेटसाठी अपरिचित आहे असे नाही. पण चांगल्या सुरुवातीनंतर त्याचा फॉर्म घसरला आणि त्याने स्थान गमावले होते. ट्रेंट ब्रिज कसोटीत अभिमन्यू ईश्वरन होता. तसेच श्रीलंकेहून पोहचलेल्या पृथ्वी शॉ याचा विलगीकरणाचा कालावधी संपलेला नव्हता. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल गमावल्यानंतर त्यांनी रवी शास्त्री आणि कोहली यांनी राहुलच्या अनुभ‌वावर भर दिला. रोहितशी नीट ताळमेळ ठेवल्याने त्याची खेळी चमकदार झाली.

राहुल आणि रोहितने या मालिकेत आतापर्यंत ९७, ३४, १२६ धावांची भागीदारी केली. रोहितने स्ट्रोकमध्ये चाणाक्षपणा दाखवला आहे, तर राहुलने परिस्थितीनुसार जुळवून घेण्याची आणि खेळण्याची क्षमता दाखवली आहे.

मात्र मधल्या फळीचे अपयश झाकण्यासारखे नाही. पुजारा आणि रहाणे प्रमाणेच कोहलीची कामगिरी खालावली आहे. त्यामुळे विरोधी संघावर दबाव आणण्यासाठी त्यांना पुरेशी मोठी धावसंख्या उभारता आली नाही.

ट्रेंट ब्रिजवरील पहिल्या कसोटीत पहिल्या डावाची आघाडी ही रवींद्र जडेजामुळे मिळाली. लॉर्ड्सवर देखील भारताचा बाद दोन बाद २६७ वरून सर्व बाद ३६४ वर घसरला.

एक ते सात क्रमांकावरील फलंदाजांची चॅम्पियनशीपच्या फायनची कामगिरी आणि या मालिकेतील तीन डाव हे मधल्या फळीच्या कमकुवत पणावर प्रकाश टाकतात. सर्वाधिक धावा राहुल (२३७) रोहित (१९५) उर्वरीत फलंदाजांमध्ये ऋषभ पंत (१०७) आणि जडेजा (१२७) हे आघाडीवर आहे. तर कोहली (९९) पुजारा(४८) रहाणे (७०) हे अपयशी ठरले. त्यामुळे भारत डब्लुटीसी फायनलमध्ये पराभूत झाला आणि इंग्लंडला भारतावर दबाव निर्माण करता आला.

अँडरसनने शानदार कामगिरी केली आणि रॉबिन्सनने त्याला साथ दिली दिली. मात्र अपेक्षेनुसार भारतीय फलंदाजांचे हे त्रिकुट इंग्लंडला नमवु शकेल का हा प्रश्न आहे. सलामीवीरांनी केलेल्या धावांचा फायदा भारताला घेता आला नाही.

कोहलीने डब्लुटीसी फायनलमध्ये ४४ धावा केल्या होत्या. लॉर्ड्सवर पहिल्या डावात फॉर्ममध्ये परतण्याचा प्रयत्न केला. मात्र रहाणे आणि पुजारा यांचे अपयश कायम राहिले. हे दोघेही अनुभ‌वी आहेत. मात्र जर त्यांना अपेक्षीत धावा करता येत नसतील तर संघ व्यवस्थापनाला पर्याय शोधावे लागतील.