शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
5
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
6
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
7
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
8
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
9
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
10
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
11
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
12
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
14
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
15
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
16
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
17
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
18
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
19
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
20
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार

तर पुजारा, रहाणेचा पर्याय शोधावा लागेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2021 04:20 IST

सलामीवीर शुभमन गिल आणि मयंक अग्रवाल यांच्या दुखापतीमुळे संघाला दुखापत झाल्यामुळेच तो नशीबवान ठरला. त्याला संधी मिळाली. स्विंग ...

सलामीवीर शुभमन गिल आणि मयंक अग्रवाल यांच्या दुखापतीमुळे संघाला दुखापत झाल्यामुळेच तो नशीबवान ठरला. त्याला संधी मिळाली. स्विंग आणि सीम गोलंदाजांना मदत करणाऱ्या परिस्थितीत तो संघाचा सर्वात चांगला फलंदाज ठरला आहे. तो कसोटी क्रिकेटसाठी अपरिचित आहे असे नाही. पण चांगल्या सुरुवातीनंतर त्याचा फॉर्म घसरला आणि त्याने स्थान गमावले होते. ट्रेंट ब्रिज कसोटीत अभिमन्यू ईश्वरन होता. तसेच श्रीलंकेहून पोहचलेल्या पृथ्वी शॉ याचा विलगीकरणाचा कालावधी संपलेला नव्हता. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल गमावल्यानंतर त्यांनी रवी शास्त्री आणि कोहली यांनी राहुलच्या अनुभ‌वावर भर दिला. रोहितशी नीट ताळमेळ ठेवल्याने त्याची खेळी चमकदार झाली.

राहुल आणि रोहितने या मालिकेत आतापर्यंत ९७, ३४, १२६ धावांची भागीदारी केली. रोहितने स्ट्रोकमध्ये चाणाक्षपणा दाखवला आहे, तर राहुलने परिस्थितीनुसार जुळवून घेण्याची आणि खेळण्याची क्षमता दाखवली आहे.

मात्र मधल्या फळीचे अपयश झाकण्यासारखे नाही. पुजारा आणि रहाणे प्रमाणेच कोहलीची कामगिरी खालावली आहे. त्यामुळे विरोधी संघावर दबाव आणण्यासाठी त्यांना पुरेशी मोठी धावसंख्या उभारता आली नाही.

ट्रेंट ब्रिजवरील पहिल्या कसोटीत पहिल्या डावाची आघाडी ही रवींद्र जडेजामुळे मिळाली. लॉर्ड्सवर देखील भारताचा बाद दोन बाद २६७ वरून सर्व बाद ३६४ वर घसरला.

एक ते सात क्रमांकावरील फलंदाजांची चॅम्पियनशीपच्या फायनची कामगिरी आणि या मालिकेतील तीन डाव हे मधल्या फळीच्या कमकुवत पणावर प्रकाश टाकतात. सर्वाधिक धावा राहुल (२३७) रोहित (१९५) उर्वरीत फलंदाजांमध्ये ऋषभ पंत (१०७) आणि जडेजा (१२७) हे आघाडीवर आहे. तर कोहली (९९) पुजारा(४८) रहाणे (७०) हे अपयशी ठरले. त्यामुळे भारत डब्लुटीसी फायनलमध्ये पराभूत झाला आणि इंग्लंडला भारतावर दबाव निर्माण करता आला.

अँडरसनने शानदार कामगिरी केली आणि रॉबिन्सनने त्याला साथ दिली दिली. मात्र अपेक्षेनुसार भारतीय फलंदाजांचे हे त्रिकुट इंग्लंडला नमवु शकेल का हा प्रश्न आहे. सलामीवीरांनी केलेल्या धावांचा फायदा भारताला घेता आला नाही.

कोहलीने डब्लुटीसी फायनलमध्ये ४४ धावा केल्या होत्या. लॉर्ड्सवर पहिल्या डावात फॉर्ममध्ये परतण्याचा प्रयत्न केला. मात्र रहाणे आणि पुजारा यांचे अपयश कायम राहिले. हे दोघेही अनुभ‌वी आहेत. मात्र जर त्यांना अपेक्षीत धावा करता येत नसतील तर संघ व्यवस्थापनाला पर्याय शोधावे लागतील.