शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

शिवाजीनगर उड्डाणपुलाच्या आकारावरून नगरसेवक विरुद्ध नागरिकांमध्ये जुंपली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:21 IST

नागरिकांचा टी आकाराला विरोध : तर नगरसेवक दारकुंडे आग्रही लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव - गेल्या दोन वर्षांपासून शिवाजीनगर उड्डाणपुलाचे ...

नागरिकांचा टी आकाराला विरोध : तर नगरसेवक दारकुंडे आग्रही

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव - गेल्या दोन वर्षांपासून शिवाजीनगर उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. मात्र, संथगतीने सुरू असलेल्या या कामामुळे शिवाजीनगर भागातील नागरिकांसह जळगाव तालुक्यातील नागरिकांचेदेखील मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. एकीकडे या पुलाचे काम संथगतीने सुरू असताना दुसरीकडे या पुलाच्या आकारावरून पुन्हा राजकारण पेटले आहे. शिवाजीनगर आतील काही नागरिकांच्या विरोधानंतर या पुलाचे काम पूर्वीप्रमाणेच ' एल' आकारात सुरू आहे. मात्र, या भागातील नगरसेवक नवनाथ दारकुंडे यांनी या पुलाचे काम डिझाईननुसार' टी ' आकारात करण्यात यावे, अशी मागणी केल्यामुळे नवीन वाद निर्माण झाला आहे.

शिवाजीनगर उड्डाणपुलाची मुदत संपल्यामुळे या पुलाचे काम हाती घेण्यात आले आहे. पुलाचे काम सुरू होण्याआधीच पुलाच्या आकारावरून शिवाजीनगर भागातील नागरिकांचा विरोध कायम होता. शिवाजीनगर भागातील नागरिकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाने तयार केलेल्या टी आकाराच्या डिझाईनला विरोध होता, तसेच या पुलाचे काम वाय किंवा एल आकारात करण्यात यावे, अशी मागणी शिवाजीनगरातील रहिवाशांनी केली होती. मात्र, नागरिकांच्या विरोधानंतरदेखील या पुलाचे डिझाईन टी आकारानुसारच करण्यात आले. मात्र, भविष्यात वाद निर्माण होऊ नये म्हणून सार्वजनिक बांधकाम विभागाने कामाला सुरुवात केल्यानंतर पूर्वीप्रमाणेच म्हणजेच एल आकारातच या पुलाचे काम सुरू केले. सद्यस्थितीत या पुलाचे काम ७० टक्के पूर्ण झाले आहे. मात्र, आता स्थानिक नगरसेवक नवनाथ दारकुंडे यांनी मंगळवारी या पुलाचे काम टी आकारातच करण्यात यावे म्हणून प्रस्तावित पुलाच्या ठिकाणावर होणारे भुयारी गटार योजनेचे कामदेखील थांबविले होते. दरम्यान, नगरसेवक नवनाथ दारकुंडे यांच्या मागणीला शिवाजीनगर आतील काही नागरिकांनी विरोध केला आहे. सद्यस्थितीत होत असलेल्या पुलाला शिवाजीनगरातील रहिवाशांचा पाठिंबा आहे. सामाजिक कार्यकर्ते दीपक कुमार गुप्ता यांनी शिवाजीनगर आतील नागरिकांच्या मागणीनुसारच या पुलाचे काम होत असून, पुलाचे काम ७० टक्के पूर्ण झाले असताना नवनाथ दारकुंडे यांचा विरोध का होत आहे ? असा प्रश्न उपस्थित केला आहे. तसेच संबंधित नगरसेवकांनी ठेकेदाराकडून याबाबत रक्कम घेतली आहे का? असाही आरोप दीपककुमार गुप्ता यांनी सोशल मीडियाद्वारे केला आहे.

नागरिकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न - नवनाथ दारकुंडे

शिवाजीनगर उड्डाणपुलाचे काम हे डिझाईननुसार टी आकराचे मंजूर झाले आहे. त्यानुसारच हे काम करण्यात यावे याबाबत आपण आग्रही असून, काही सामाजिक कार्यकर्त्यांकडून शिवाजीनगरातील रहिवाशांची दिशाभूल केली जात असल्याचा आरोप शिवाजीनगर आतील नगरसेवक नवनाथ दारकुंडे यांनी केला आहे. सद्यस्थितीत तयार होत असलेल्या पुलामुळे शिवाजीनगर आतील रहिवाशांना मोठा फेरा पडणार आहे. तसेच रेल्वे प्रशासनाकडून तहसील कार्यालयाकडून येणारा रस्तादेखील बंद करण्यात येणार आहे. अशा परिस्थितीत या भागातील नागरिकांना शहरात येण्यासाठी कानळदा रस्त्याकडून फिरून यावे लागेल, यासाठी आपला आग्रह डिझाईननुसारच व टी आकारातच हा पूल व्हावा, अशी मागणी दारकुंडे यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहे.

विद्युत खांब स्थलांतर करण्याचे कामही रखडले

एकीकडे शिवाजीनगर उड्डाणपुलाच्या आकारावरून राजकारण सुरू असताना दुसरीकडे, या पुलालगत असलेल्या महावितरणच्या विद्युत कामांचे स्थलांतरण अद्यापही झालेले नाही. महापालिकेने २५ कोटी रुपयांच्या निधीतून शिल्लक असलेल्या १ कोटी रुपयांचा निधी यासाठी मंजूर केला आहे. याबाबतचा ठराव महापालिकेच्या महासभेतदेखील मंजूर करण्यात आला आहे. मात्र, अजूनही विद्युत खांब स्थलांतरित करण्यात आलेले नाहीत. विद्युत खांब स्थलांतरित करण्याची प्रक्रिया रखडल्याने पुलाचे कामही रखडले आहे.