शहरं
Join us  
Trending Stories
1
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
2
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
3
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
4
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
5
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
6
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
7
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
8
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
9
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
10
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
11
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
12
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
13
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
14
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
15
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
16
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
17
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
18
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
19
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
20
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
Daily Top 2Weekly Top 5

सर आली धावून, पुराचे पाणी गेले वाहून....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 04:15 IST

हरताळा, ता. मुक्ताईनगर : येथून जवळच असलेला व भुसावळ, मुक्ताईनगर, बोदवड या तीन तालुक्यांसाठी वरदान ठरणाऱ्या ओझरखेड तलावात हतनूर ...

हरताळा, ता. मुक्ताईनगर : येथून जवळच असलेला व भुसावळ, मुक्ताईनगर, बोदवड या तीन तालुक्यांसाठी वरदान ठरणाऱ्या ओझरखेड तलावात हतनूर धरणाचे वाया जाणारे पाणी केव्हा सुटणार ? आतापर्यंत धरणाचे तीन पूर वाहून गेले. तरीदेखील मात्र ओझरखेडा धरणात पाणी सोडण्यात आले नसल्याने या धरणात पाणी केव्हा सुटणार? असा प्रश्न शेतकऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे.केवळ कोट्यवधी रुपये धरणाच्या नावाने खर्च करावे, परंतु त्याचा लाभ जर मिळत नसेल तर काय फायदा धरण बांधायला सात आठ वर्षे झाले, परंतु अद्यापहीशेतकर्‍यांच्या शेतात पाणी गेले नाही अशी खंत येथील शेतकरी आनंदराव देशमुख यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केले.

आतापर्यंत पावसाळ्यात यातील अतिरिक्त पुराचे पाणी वाहून गेले. सर आली धावून, पाणी गेले वाहून...अशीच म्हणण्याची वेळ आली आहे. मात्र ओझारखेड धरणात पाऊस पाणी न साठवले गेल्यामुळे निराश होत आहे. गत वर्षीदेखील शेतकऱ्यांनी मोठ्या आशेने केळी बागायती लागवड केली होती. मागील वर्षी पाणी तलावात पाणी सोडल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा मोटारी जळाल्यामुळे आर्थिक फटका सहन करावा लागला होता. त्यासाठी तरीदेखील पाण्याचे यंदाही पाणी सुटणार की नाही याची शंका वाटत आहे.

याचबरोबर भुसावळ ,बोदवड, मुक्ताईनगर, तालुक्यातील‍ सुमारे ६० गावांना शेतीसाठी पाणी मिळणार होते ते अद्यापही मिळाले नसून ते मिळावे, अशीही मागणी आहे. यासाठी पाइपलाइनने नियोजन करण्याचे करण्यात यावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. काही शेतकऱ्यांनी पाइपलाइनने आर्थिक भुर्दंड सहन करत पाइपलाइन केली मात्र सर्वसामान्य शेतकरीदेखील अजून या लाभापासून दूर आहे. त्यांच्यासाठीदेखील पाइप लाइनची सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

यासंदर्भात मागील वर्षीदेखील शेतकऱ्यांच्या मागणी असताना पाणी सोडले नव्हते. सध्या हातनूर धरणाचे गेल्या आठवड्यात बारा दरवाजे, आता गेल्या दोन दिवसापासून संपूर्ण क्षमतेने ४१ दरवाजे धरणाची खुले असताना हे पाणी वाया जात आहे. पूर्णा नदीचे यंदा पावसाळ्याचा पूर्णा नदीचे तिसरा पूर वाहून गेलेला आहे. ४१ दरवाजे खुले केल्यामुळे तेच पाणी रोखून ओझरखेडा तलावात आत्ताच टाकले असते तर फार सोयीचे झाले असते.

दरवर्षी साधारणत: पंधरा ऑगस्ट ला हतनूर धरणाचे दरवाजे बंद केले जातात. त्यामुळे धरणाचे पाणी साठवले जाते व ते पाणी शेतीसाठी उपयुक्त ठरते. मात्र ओझरखेडा तलाव हा त्या पाण्यावर अवलंबून असल्याने वाया जाणाऱ्या पाण्याची जर नियोजन आतापासूनच केले तर भविष्यात हे वाया जाणारे पाणी उपयुक्त ठरेल. पुढे पाऊस कमी झाला तरी पाणी साठवणे कठीण होऊ शकते. यंदाही शेतकऱ्यांनी मोठ्या आशेने बागायती लागवड केली आहे.

नियोजन चुकले तर त्यांच्या बागायतीला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. म्हणून दरवाजे आता खुले असताना तेच पाणी आतापासूनच अडकवून ओझरखेडा तलावात टाकली तर शेतकऱ्यांना पुढे दिलासा मिळेल. याची दखल घ्यावी, अशी मागणी यापूर्वीदेखील शेतकऱ्यांनी केली असल्याचे सांगितले.

शेतकरी प्रतिक्रिया

शेतीला पाणी नसेल तर सातबाराच्या उताऱ्यावर लाल शेरा मारलेला आहे तो कमी करावा. विनाकारण शेतकऱ्यांना संबंधित विभागाशी उंबरठे झिजवावे लागतात .कोट्यवधी रुपये खर्च करूनदेखील जर शेतकऱ्यांच्या शेतीला पाणी मिळत नसेल तर नुसतेच धरणे बांधून काय फायदा. केवळ नवीन धरणाच्या नावाने शासनाचे पैसे उपटायचे का? शासनाने यावर गंभीर विचार करावा. शेतकऱ्यांना लिफ्टिंगचे पाणी उपलब्ध करून द्यावे. हरताळेच्या जुन्या तलावांना पुनरुज्जीवित करावे. सर्वसामान्य व लहान शेतकऱ्यांसाठी पाणी उपलब्ध करून द्यावे. तेव्हा खऱ्या अर्थाने या ओझरखेडा तलावाचा धरणाचा व इतर धरणे बांधण्याचा उद्देश सफल होईल.

आनंदराव देशमुख, शेतकरी तथा मुक्ताईनगर पंचायत समिती अजी उपसभापती हरताळा.

फोटो कॅप्शन

ओझरखेडा तलावात अद्यापही पाणी पडले नसल्या ने शेतकऱ्यांच्या पाइपाइन, मोटारी उघड्या पडल्या आहे. तलाव असा कोरडा पडला आहे.