शहरं
Join us  
Trending Stories
1
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
2
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
3
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
4
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
5
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
6
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
7
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
8
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
9
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
10
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
11
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
12
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
13
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
14
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
15
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
16
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
17
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
18
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
19
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
20
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या

सर आली धावून, पुराचे पाणी गेले वाहून....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 04:15 IST

हरताळा, ता. मुक्ताईनगर : येथून जवळच असलेला व भुसावळ, मुक्ताईनगर, बोदवड या तीन तालुक्यांसाठी वरदान ठरणाऱ्या ओझरखेड तलावात हतनूर ...

हरताळा, ता. मुक्ताईनगर : येथून जवळच असलेला व भुसावळ, मुक्ताईनगर, बोदवड या तीन तालुक्यांसाठी वरदान ठरणाऱ्या ओझरखेड तलावात हतनूर धरणाचे वाया जाणारे पाणी केव्हा सुटणार ? आतापर्यंत धरणाचे तीन पूर वाहून गेले. तरीदेखील मात्र ओझरखेडा धरणात पाणी सोडण्यात आले नसल्याने या धरणात पाणी केव्हा सुटणार? असा प्रश्न शेतकऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे.केवळ कोट्यवधी रुपये धरणाच्या नावाने खर्च करावे, परंतु त्याचा लाभ जर मिळत नसेल तर काय फायदा धरण बांधायला सात आठ वर्षे झाले, परंतु अद्यापहीशेतकर्‍यांच्या शेतात पाणी गेले नाही अशी खंत येथील शेतकरी आनंदराव देशमुख यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केले.

आतापर्यंत पावसाळ्यात यातील अतिरिक्त पुराचे पाणी वाहून गेले. सर आली धावून, पाणी गेले वाहून...अशीच म्हणण्याची वेळ आली आहे. मात्र ओझारखेड धरणात पाऊस पाणी न साठवले गेल्यामुळे निराश होत आहे. गत वर्षीदेखील शेतकऱ्यांनी मोठ्या आशेने केळी बागायती लागवड केली होती. मागील वर्षी पाणी तलावात पाणी सोडल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा मोटारी जळाल्यामुळे आर्थिक फटका सहन करावा लागला होता. त्यासाठी तरीदेखील पाण्याचे यंदाही पाणी सुटणार की नाही याची शंका वाटत आहे.

याचबरोबर भुसावळ ,बोदवड, मुक्ताईनगर, तालुक्यातील‍ सुमारे ६० गावांना शेतीसाठी पाणी मिळणार होते ते अद्यापही मिळाले नसून ते मिळावे, अशीही मागणी आहे. यासाठी पाइपलाइनने नियोजन करण्याचे करण्यात यावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. काही शेतकऱ्यांनी पाइपलाइनने आर्थिक भुर्दंड सहन करत पाइपलाइन केली मात्र सर्वसामान्य शेतकरीदेखील अजून या लाभापासून दूर आहे. त्यांच्यासाठीदेखील पाइप लाइनची सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

यासंदर्भात मागील वर्षीदेखील शेतकऱ्यांच्या मागणी असताना पाणी सोडले नव्हते. सध्या हातनूर धरणाचे गेल्या आठवड्यात बारा दरवाजे, आता गेल्या दोन दिवसापासून संपूर्ण क्षमतेने ४१ दरवाजे धरणाची खुले असताना हे पाणी वाया जात आहे. पूर्णा नदीचे यंदा पावसाळ्याचा पूर्णा नदीचे तिसरा पूर वाहून गेलेला आहे. ४१ दरवाजे खुले केल्यामुळे तेच पाणी रोखून ओझरखेडा तलावात आत्ताच टाकले असते तर फार सोयीचे झाले असते.

दरवर्षी साधारणत: पंधरा ऑगस्ट ला हतनूर धरणाचे दरवाजे बंद केले जातात. त्यामुळे धरणाचे पाणी साठवले जाते व ते पाणी शेतीसाठी उपयुक्त ठरते. मात्र ओझरखेडा तलाव हा त्या पाण्यावर अवलंबून असल्याने वाया जाणाऱ्या पाण्याची जर नियोजन आतापासूनच केले तर भविष्यात हे वाया जाणारे पाणी उपयुक्त ठरेल. पुढे पाऊस कमी झाला तरी पाणी साठवणे कठीण होऊ शकते. यंदाही शेतकऱ्यांनी मोठ्या आशेने बागायती लागवड केली आहे.

नियोजन चुकले तर त्यांच्या बागायतीला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. म्हणून दरवाजे आता खुले असताना तेच पाणी आतापासूनच अडकवून ओझरखेडा तलावात टाकली तर शेतकऱ्यांना पुढे दिलासा मिळेल. याची दखल घ्यावी, अशी मागणी यापूर्वीदेखील शेतकऱ्यांनी केली असल्याचे सांगितले.

शेतकरी प्रतिक्रिया

शेतीला पाणी नसेल तर सातबाराच्या उताऱ्यावर लाल शेरा मारलेला आहे तो कमी करावा. विनाकारण शेतकऱ्यांना संबंधित विभागाशी उंबरठे झिजवावे लागतात .कोट्यवधी रुपये खर्च करूनदेखील जर शेतकऱ्यांच्या शेतीला पाणी मिळत नसेल तर नुसतेच धरणे बांधून काय फायदा. केवळ नवीन धरणाच्या नावाने शासनाचे पैसे उपटायचे का? शासनाने यावर गंभीर विचार करावा. शेतकऱ्यांना लिफ्टिंगचे पाणी उपलब्ध करून द्यावे. हरताळेच्या जुन्या तलावांना पुनरुज्जीवित करावे. सर्वसामान्य व लहान शेतकऱ्यांसाठी पाणी उपलब्ध करून द्यावे. तेव्हा खऱ्या अर्थाने या ओझरखेडा तलावाचा धरणाचा व इतर धरणे बांधण्याचा उद्देश सफल होईल.

आनंदराव देशमुख, शेतकरी तथा मुक्ताईनगर पंचायत समिती अजी उपसभापती हरताळा.

फोटो कॅप्शन

ओझरखेडा तलावात अद्यापही पाणी पडले नसल्या ने शेतकऱ्यांच्या पाइपाइन, मोटारी उघड्या पडल्या आहे. तलाव असा कोरडा पडला आहे.