शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

निकाल व गुणवत्तेत हवी समानता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2019 18:53 IST

विद्यार्थ्यांचा समग्र व सर्वांगीण विकास होण्यासाठी गुण महत्त्वाचे नसून गुणवत्तापूर्ण ज्ञान महत्त्वाचे आहे़ कोणत्याही विषयाचे ज्ञान अवगत झाले, म्हणजे ...

विद्यार्थ्यांचा समग्र व सर्वांगीण विकास होण्यासाठी गुण महत्त्वाचे नसून गुणवत्तापूर्ण ज्ञान महत्त्वाचे आहे़ कोणत्याही विषयाचे ज्ञान अवगत झाले, म्हणजे आपोआप गुणात्मक वाढ होते़ महाराष्ट्र राज्य बोर्डाने विज्ञान व गणित या विषयांत अंतर्गत गुणदान पद्धती सुरू ठेवलेली आहे़ ती मराठी, हिंदी व इंग्रजी या भाषा विषयांसाठीच रद्द केली आहे़ हे अव्यवहार्य वाटते़ कारण, भाषेचे मूल्यमापन केवळ लेखी परीक्षेतून करता येणे शक्य नाही़ भाषेचे प्रत्यक्ष व्यवहारात उपयोजन करता आले पाहिजे. कोणत्याही भाषेचे सौंदर्य हे तिच्या प्रकटीकरणावर अवलंबून असते़ एखाद्या विद्यार्थ्याने भाषा विषयाच्या लेखी परीक्षेत १०० पैकी १०० गुण मिळवले. मात्र, व्यवहारात किंवा वक्तृत्व स्पर्धेत त्यास जर शुद्ध बोलता येत नसेल तर मिळालेले गुण अर्थशून्य आहेत़ म्हणूनच भाषा विषयांचे मूल्यमापन हे कौशल्याधिष्ठित असते. तसेच तेस तोंडी व लेखी परीक्षेद्वारेसुद्धा व्हायला हवे. अंतर्गत गुण देतांना शाळेने तसेच विषय शिक्षकांनी कोणतेही हितसंबंध, प्रलोभन अथवा गुण-वाढ यांचा विचार करू नये़ विद्यार्थ्याच्या अभ्यासाचा तसेच भाषेच्या उपयोजनाबाबत सर्वांगीण आढावा घ्यावा. त्यानंतर गुणदान करावे. यामध्ये पारदर्शकता असावी़ तोंडी परीक्षेत कितीही गुण असो, लेखी परीक्षेत मात्र एक तृतीयांश गुण असायलाच हवेत. निकालातील गुण आणि गुणवत्ता यात मात्र तफावत जाणवायला नको.-गोपाळ आनंदा बानाईतजिल्हास्तरीय इंग्रजी विषयतज्ज्ञ, वरणगाव़, ता़ भुसावऴ