शहरं
Join us  
Trending Stories
1
'BJP पटेलांच्या वारशाचा अपमान करत आहे; RSS वर पुन्हा बंदी घाला', खरगेंचा सरकारवर हल्लाबोल
2
पवईतील आरोपी रोहित आर्यला दीपक केसरकरांनी इतकी मोठी रक्कम का दिली?; सामाजिक कार्यकर्त्यांचा सवाल
3
बाजारात सलग दुसऱ्या दिवशी मोठी घसरण! गुंतवणूकदारांचे २ लाख कोटी बुडाले; सर्वात जास्त कुठे?
4
Rain Alert: कमी दाबाचे क्षेत्र कायम, या राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; महाराष्ट्रात कुठे-कुठे पाऊस पडणार?
5
शेतकऱ्यांना न झुलवता तात्काळ कर्जमाफी करा; उद्धव ठाकरेंची राज्य सरकारकडे मागणी
6
धोनीची गुंतवणूक असलेली कंपनी बाजारात! ६ नोव्हेंबरला उघडणार IPO; प्राइस बँडसह तपशील जाणून घ्या
7
खात्यात ८ लाख जमा केले अन् प्राप्तिकर विभागाची 'टॅक्स' नोटीस; ६ वर्षांच्या लढ्यानंतर करदात्याचा विजय!
8
Viral Video: हत्तीला पाहून सिंह मंडळींची 'हवा टाइट'... झाडाखाली बसले असताना काय घडलं, पाहा
9
थेट मंत्र्यांच्या ताफ्यालाच पाठलाग करून अडवले, वादावादी, कारची तोडफोड करण्याचा प्रयत्न, कारण काय?
10
Powai Hostage: रोहित आर्या प्रकरणातील नवी माहिती, मुलांसोबत ऑडिशनसाठी गेलेले पालक म्हणाले...
11
Abhishek Sharma Record Breaking Fifty : जिथं सगळ्यांनी नांगी टाकली, तिथं अभिषेक शर्माची विक्रमी खेळी
12
Rohit Arya: रोहित आर्याला मी वेगळे पैसे दिलेले, सरकारी बिलाशी संबंध नाही; दीपक केसरकरांची सारवासारव
13
प्रेयसीचा शो पाहण्यासाठी ५०० कोटी रुपयांचे सरकारी विमान वापरलं; काश पटेल वादाच्या भोवऱ्यात
14
कंडोम बनवणाऱ्या कंपनीचा शेअर करतोय मालामाल, खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या; 2 महिन्यातच दिला बंपर परतावा!
15
तेलंगणामध्ये मोंथा वादळाचा कहर, १२ जणांचा मृत्यू; मुसळधार पावसामुळे रेल्वे ट्रॅकवर पाणी, रस्तेही बंद
16
कोणता झेंडा घेऊ हाती अशी मनसैनिकांची अवस्था, राज ठाकरे कन्फ्यूज नेते; शिंदेसेनेची बोचरी टीका
17
Lenskart IPO: महागडा आहे का लेन्सकार्टचा आयपीओ? व्हॅल्यूएशनवरुन उपस्थित होताहेत प्रश्न, एक्सपर्ट म्हणाले...
18
अँड्रॉइड की अ‍ॅपल, मोबाईल घोटाळे रोखण्यात कोणती सिस्टीम चांगली? गुगलने केला धक्कादायक खुलासा
19
टीम इंडिया फायनलमध्ये पोहोचताच आयसीसीने धमाका करून टाकला! ऑस्ट्रेलिया संघ बघतच राहिला...
20
सौदी अरेबिया फिफा विश्वचषकासाठी बांधणार 'स्काय स्टेडियम'; व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा?

निकाल व गुणवत्तेत हवी समानता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2019 18:53 IST

विद्यार्थ्यांचा समग्र व सर्वांगीण विकास होण्यासाठी गुण महत्त्वाचे नसून गुणवत्तापूर्ण ज्ञान महत्त्वाचे आहे़ कोणत्याही विषयाचे ज्ञान अवगत झाले, म्हणजे ...

विद्यार्थ्यांचा समग्र व सर्वांगीण विकास होण्यासाठी गुण महत्त्वाचे नसून गुणवत्तापूर्ण ज्ञान महत्त्वाचे आहे़ कोणत्याही विषयाचे ज्ञान अवगत झाले, म्हणजे आपोआप गुणात्मक वाढ होते़ महाराष्ट्र राज्य बोर्डाने विज्ञान व गणित या विषयांत अंतर्गत गुणदान पद्धती सुरू ठेवलेली आहे़ ती मराठी, हिंदी व इंग्रजी या भाषा विषयांसाठीच रद्द केली आहे़ हे अव्यवहार्य वाटते़ कारण, भाषेचे मूल्यमापन केवळ लेखी परीक्षेतून करता येणे शक्य नाही़ भाषेचे प्रत्यक्ष व्यवहारात उपयोजन करता आले पाहिजे. कोणत्याही भाषेचे सौंदर्य हे तिच्या प्रकटीकरणावर अवलंबून असते़ एखाद्या विद्यार्थ्याने भाषा विषयाच्या लेखी परीक्षेत १०० पैकी १०० गुण मिळवले. मात्र, व्यवहारात किंवा वक्तृत्व स्पर्धेत त्यास जर शुद्ध बोलता येत नसेल तर मिळालेले गुण अर्थशून्य आहेत़ म्हणूनच भाषा विषयांचे मूल्यमापन हे कौशल्याधिष्ठित असते. तसेच तेस तोंडी व लेखी परीक्षेद्वारेसुद्धा व्हायला हवे. अंतर्गत गुण देतांना शाळेने तसेच विषय शिक्षकांनी कोणतेही हितसंबंध, प्रलोभन अथवा गुण-वाढ यांचा विचार करू नये़ विद्यार्थ्याच्या अभ्यासाचा तसेच भाषेच्या उपयोजनाबाबत सर्वांगीण आढावा घ्यावा. त्यानंतर गुणदान करावे. यामध्ये पारदर्शकता असावी़ तोंडी परीक्षेत कितीही गुण असो, लेखी परीक्षेत मात्र एक तृतीयांश गुण असायलाच हवेत. निकालातील गुण आणि गुणवत्ता यात मात्र तफावत जाणवायला नको.-गोपाळ आनंदा बानाईतजिल्हास्तरीय इंग्रजी विषयतज्ज्ञ, वरणगाव़, ता़ भुसावऴ