शहरं
Join us  
Trending Stories
1
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
2
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
3
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
4
संपादकीय: निवडणूक कामात शिक्षकच का? समोर दहावी, बारावीच्या परीक्षाही...
5
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
6
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
7
‘निवडून आलो, तर पक्ष बदलणार नाही’, असे लिहून देता का?
8
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
9
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
10
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
11
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
12
सुट्टीसाठी तळमळणाऱ्या मंत्र्यांना ‘डिसेंबर’ हुडहुडी!
13
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
14
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
15
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
16
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
17
कमी मद्यपानामुळेही तोंडाच्या कर्करोगाचा धोका; ‘टाटा मेमोरियल’च्या अभ्यासातील निष्कर्ष
18
घरांच्या विक्रीला ‘ब्रेक’; पुणे, मुंबईत मोठी घसरण; नव्या विमानतळामुळे...
19
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
20
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
Daily Top 2Weekly Top 5

पर्यटनासाठी प्रसिद्ध पाल रस्त्याची चाळण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:20 IST

पर्यटकांची रेलचेल असते. मात्र आता या ठिकाणी येणे म्हणजे कसरत होत असल्याने त्याचा परिणाम पर्यटनावरही झाला आहे. खराब ...

पर्यटकांची रेलचेल असते. मात्र आता या ठिकाणी येणे म्हणजे कसरत होत असल्याने त्याचा परिणाम पर्यटनावरही झाला आहे. खराब रस्त्यांमुळे पर्यटकांची मोठी नाराजी असून, याचा थेट परिणाम या ठिकाणच्या पर्यटनावर झाला आहे.

सातपुडा पर्वतरांगांमध्ये वसलेल्या पाल या गावास पर्यटनाचा दर्जा प्राप्त झाला आहे. येथील एकेकाळी असलेले घनदाट जंगल, आदिवासींच्या परंपरांचे देखावे, उंचच उंच पर्वतरांगा, नदी, वनोद्यान यासारख्या अनेक बाबी या ठिकाणी पर्यटकांना आजही खुणावतात. दूरहून पर्यटक या ठिकाणी येत असतात. मात्र गेल्या काही काळापासून या वैभवाला रस्त्यांची

दृष्ट लागली आहे.

रस्त्याची दुरवस्था

रावेर-पाल रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने रस्त्याची दुरवस्था झाली आहे. केवळ २४ किलोमीटर अंतर पार करायला एक ते दीड तास लागतो. खड्ड्यांमध्ये आदळून वाहनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. त्यामुळे पर्यटकांची रेलचेल कमी झाली आहे.

रावेर-पाल रस्ता तालुक्याला जोडला असल्याने परिसरातील शेतकरी, व्यापारी, नोकर वर्ग, पर्यटक याच मार्गाने ये-जा करत असतात. शेतीतील साहित्य, रासायनिक खते, भाजीपाला, किराणा आणण्यासाठी येथील नागरिकांना कसरत करावी लागत आहे. अनेकवेळा वाहनाचे नुकसान होत आहे.

लोकप्रतिनिधींनी लक्ष देण्याची गरज

या रस्त्याचे महत्त्व लक्षात घेऊन लोकप्रतिनिधींनी दुरुस्तीकडे लक्ष देण्याची गरज आहे. मागणीकडे दुर्लक्ष झाल्यास येथील पर्यटन तसेच त्यावर अवलंबून असलेल्या व्यवसायांवरही परिणाम होणार आहे. त्यामुळे या रस्त्याची त्वरित दुरुस्ती केली जावी अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.