शहरं
Join us  
Trending Stories
1
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
2
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
3
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
4
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
5
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
6
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
7
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
8
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
9
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
10
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
11
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
12
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
13
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
14
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
15
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
16
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
17
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
18
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
19
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका
20
जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार

पर्यटनासाठी प्रसिद्ध पाल रस्त्याची चाळण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:20 IST

पर्यटकांची रेलचेल असते. मात्र आता या ठिकाणी येणे म्हणजे कसरत होत असल्याने त्याचा परिणाम पर्यटनावरही झाला आहे. खराब ...

पर्यटकांची रेलचेल असते. मात्र आता या ठिकाणी येणे म्हणजे कसरत होत असल्याने त्याचा परिणाम पर्यटनावरही झाला आहे. खराब रस्त्यांमुळे पर्यटकांची मोठी नाराजी असून, याचा थेट परिणाम या ठिकाणच्या पर्यटनावर झाला आहे.

सातपुडा पर्वतरांगांमध्ये वसलेल्या पाल या गावास पर्यटनाचा दर्जा प्राप्त झाला आहे. येथील एकेकाळी असलेले घनदाट जंगल, आदिवासींच्या परंपरांचे देखावे, उंचच उंच पर्वतरांगा, नदी, वनोद्यान यासारख्या अनेक बाबी या ठिकाणी पर्यटकांना आजही खुणावतात. दूरहून पर्यटक या ठिकाणी येत असतात. मात्र गेल्या काही काळापासून या वैभवाला रस्त्यांची

दृष्ट लागली आहे.

रस्त्याची दुरवस्था

रावेर-पाल रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने रस्त्याची दुरवस्था झाली आहे. केवळ २४ किलोमीटर अंतर पार करायला एक ते दीड तास लागतो. खड्ड्यांमध्ये आदळून वाहनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. त्यामुळे पर्यटकांची रेलचेल कमी झाली आहे.

रावेर-पाल रस्ता तालुक्याला जोडला असल्याने परिसरातील शेतकरी, व्यापारी, नोकर वर्ग, पर्यटक याच मार्गाने ये-जा करत असतात. शेतीतील साहित्य, रासायनिक खते, भाजीपाला, किराणा आणण्यासाठी येथील नागरिकांना कसरत करावी लागत आहे. अनेकवेळा वाहनाचे नुकसान होत आहे.

लोकप्रतिनिधींनी लक्ष देण्याची गरज

या रस्त्याचे महत्त्व लक्षात घेऊन लोकप्रतिनिधींनी दुरुस्तीकडे लक्ष देण्याची गरज आहे. मागणीकडे दुर्लक्ष झाल्यास येथील पर्यटन तसेच त्यावर अवलंबून असलेल्या व्यवसायांवरही परिणाम होणार आहे. त्यामुळे या रस्त्याची त्वरित दुरुस्ती केली जावी अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.