शहरं
Join us  
Trending Stories
1
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
2
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
3
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
4
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
5
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
6
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
7
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
8
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
9
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
10
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
11
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
12
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
13
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
14
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
15
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
16
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
17
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
18
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल
19
ना धक्का.. ना धोका! वनडे वर्ल्ड कप पर्यंत रोहितची कॅप्टन्सी सेफ? BCCI नव्हे तर ICC नं दिली हिंट
20
दिलीप प्रभावळकर यांना 'लगे रहो मुन्नाभाई'मध्ये अशी मिळाली महात्मा गांधींची भूमिका, म्हणाले...

पावसाळ्यानंतर शहरातील रस्त्यांच्या कामांचा ‘श्रीगणेशा’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 04:16 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव - शहरातील नागरिक सध्यस्थितीत अनेक समस्यांनी त्रस्त आहेत. शहरातील नागरिकांच्या दृष्टीने रस्त्यांची समस्या महत्वाची आहे. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव - शहरातील नागरिक सध्यस्थितीत अनेक समस्यांनी त्रस्त आहेत. शहरातील नागरिकांच्या दृष्टीने रस्त्यांची समस्या महत्वाची आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांना आवश्यक असलेल्या गरजा पूर्ण करण्यासाठी महत्वाच्या समस्यांना प्राधान्य देऊन त्या समस्या मार्गी लावण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे. रस्त्यांची समस्या मार्गी लावण्यासाठी निधीची तरतूद केली जात असून, पावसाळ्यानंतर शहरातील रस्त्यांच्या कामांना सुरुवात केली जाणार असल्याची माहिती नवनियुक्त महापौर जयश्री महाजन यांनी दिली.

महापौर जयश्री महाजन यांनी मंगळवारी ‘लोकमत’ शहर कार्यालयात सदिच्छा भेट दिली. यावेळी त्या बोलत होत्या. आगामी काळात शहरातील विकास आराखड्याबाबत असलेल्या आपल्या धोरणांची माहिती महापौरांनी दिली. ‘लोकमत’ जळगाव आवृत्तीचे निवासी संपादक मिलिंद कुलकर्णी यांनी महापौरांचे स्वागत केले. यावेळी मनपा विरोधी पक्षनेते सुनील महाजन, माजी महापौर नितीन लढ्ढा, विष्णू भंगाळे व शिवसेनेचे महानगरप्रमुख शरद तायडे आदी उपस्थित होते.

रस्त्यांच्या दुरुस्तीचे लवकरच काम सुरू करू

पावसाळ्यापूर्वी शहरातील रस्त्यांच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार असून, याबाबत सोमवारी मनपा अधिकाऱ्यांची बैठक घेऊन याबाबतच्या सूचना दिल्याची माहिती महापौरांनी दिली. पावसाळ्यात नवीन रस्त्यांचे काम हाती घेणे शक्य नाही. त्यामुळे नवीन रस्त्यांची कामे पावसाळ्यानंतर सुरू करण्यात येणार असल्याचेही महापौरांनी सांगितले.

गाळेधारकांचे वर्गीकरण करून, हा प्रश्न मार्गी लावू

शहरातील मुदत संपलेल्या मार्केटमधील गाळेधारकांचा प्रश्न महत्त्वाचा असून, यामध्ये राज्य शासनाच्या मदतीने योग्य मार्ग काढण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. गाळेधारकांच्या योग्य मागणीचा विचार करून, त्यात व्यावसायिक व अव्यावसायिक मार्केटमधील गाळेधारकांचे वर्गीकरण करून, गाळे मूल्यांकनाचे दर निश्चित केले जाणार आहे. गरज पडल्यास राज्य शासनाकडे पाठपुरावा करून कायद्यात काही प्रमाणात बदल करण्याबाबतचा पाठपुरावा देखील करण्यात येणार असल्याचे महापौरांनी सांगितले.

‘अमृत’साठी मजीप्रा, मक्तेदार व मनपा प्रशासनाच्या समन्वयाने काम करू

अमृत योजनेतंर्गत सुरू असलेल्या पाणी पुरवठा योजनेच्या कामाची मुदत संपली आहे. याबाबत मक्तेदार व मनपा प्रशासनाकडून झालेल्या उशिराबाबत कारणमीमांसा केली जाणार आहे. त्यात काम उशिरा झाल्याबाबतची कारणे योग्य वाटली तर या कामाला मुदतवाढ देण्याबाबतचा निर्णय घेण्यात येईल. यासह या योजनेचे उर्वरित कामे चांगल्या पद्धतीने करून घेण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, पाणी पुरवठा योजनेच्या कामाचे मक्तेदार व मनपा प्रशासन यांच्यात समन्वय घालून हे काम तातडीने करण्याचा प्रयत्न राहणार आहे.

वाढीव भागातील गटारी करण्यावर भर

भुयारी गटार योजनेच्या माध्यमातून शहरातील ५५ टक्के भाग व्यापला जाणार आहे. दुसऱ्या टप्प्यात शहरातील उर्वरित ४५ टक्के काम होणार आहे. यासाठी बराच उशीर होऊ शकतो. त्यामुळे शहरातील वाढीव भागांमध्ये गटारी तयार करण्याच्या कामांना प्राधान्य दिले जाणार असल्याचे महापौरांनी सांगितले. यासह शहरातील आव्हाणे शिवारातील बंद पडलेला घनकचरा प्रकल्प देखील कार्यान्वित करण्याबाबत संपूर्ण माहिती घेऊन, काम लवकर सुरू करण्यावर भर दिला जाणार असल्याचे महापौरांनी सांगितले.