शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

वाळूचा लिलाव करण्यास तीव्र विरोध

By admin | Updated: January 13, 2017 00:29 IST

अन्यथा न्यायालयाचे दार ठोठावणार : गोंडगाव आणि दलवाडेकारांचे प्रशासनाला निवेदन

भडगाव : तालुक्यातील  दलवाडे शिवारातील गिरणा नदीच्या वाळू लिलावास  तीव्र विरोध केला जात आहे.  लिलाव करू नये. याबाबतचे निवेदन गोंडगाव, दलवाडे येथील ग्रामस्थांनी सह्यानिशी भडगाव निवासी नायब तहसीलदार अमित भोईटे यांना दिले. प्रशासनाने वाळूचा लिलाव केल्यास न्यायालयात धाव घेऊ, असेही ग्रामस्थांनी या वेळी सांगितले. निवेदनात म्हटले आहे की, गिरणा नदीतील गट नं.49 मध्ये गोंडगावची पाणीपुरवठा  विहीर आहे. पश्चिमेस  केटीवेअर बंधारा आहे. पूव्रेस कजगाव -पारोळा रस्त्यावरील गिरणा नदीवरी पूल आहे. तसेच सावदे गावाची पाणीपुरवठा  विहीरही आहे. यावर्षी नदीला कोणताही पूर न आलेला नाही. अगोदरच दलवाडे शिवारात वाळू कमी आहे आणि त्यात जर वाळूचा लिलाव झाला व वाळू उपसा झाला तर गोंडगाव, सावदे, कजगाव पाणीपुरवठा  विहिरीच्या पाणी पातळीवर  परिणाम होईल. पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागेल. वाळू उपसा झाला तर केटीवेअरच्या भिंतीसह गिरणा नदीवरील पुलास धोका होण्याचा संभव आहे.  यामुळे प्रसंगी जीवितहानीही होऊ शकते, असेही निवेदनात म्हटले आहे. निवेदन देताना शिवाजी पाटील, राजेंद्र पाटील, राहुल पाटील,  रवींद्र पाटील दलवाडे, गुलाब पाटील सावदे, विजय पाटील, सुभाष पाटील, रतीलाल पाटील, नेहरू पाटील, नगराज पाटील, रमेश पाटील, चंद्रसिंग पाटील, अविनाश मांडोळे आदी उपस्थित होते.  निवेदनावर शालिग्राम पाटील,  जीवन पाटील,  योगेश पाटील,  गोरख पाटील,  सुरेश पवार, कैलास पाटील,  गणेश पाटील आदींच्या सह्या आहेत. निवेदनाच्या प्रती वरिष्ठ पातळीवरही पाठविल्या आहेत.