शहरं
Join us  
Trending Stories
1
आता बिगुल वाजणार! "४ आठवड्यांच्या आत..."; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबद्दल SC चा महत्त्वाचा निकाल
2
एअर सायरन वाजणार, ब्लॅकआऊट होणार; महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यात 'वॉर मॉक ड्रिल'
3
भारतीय अब्जाधीशाला दुबईमध्ये तुरुंगवास, मुलासह ३२ जणांना शिक्षा; कोण आहे व्यक्ती, प्रकरण काय?
4
जातीय जनगणनेबाबत मल्लिकार्जुन खरगे यांचे पीएम मोदींना पत्र; केल्या तीन महत्वाच्या सूचना...
5
UNSC बैठकीत अमेरिका, फ्रान्सनं पाकिस्तानला फटकारलं; चीननेही दिला गुलीगत धोका
6
"आम्हाला सैन्यात भरती करा, बॉर्डरवर लढू"; पाकिस्तानला गेली गर्भवती पत्नी, तरुणाची मोठी मागणी
7
सिंधु करार मोडून भारताने उचललं मोठं पाऊल! पाकिस्तानात नेमकी किती पाणी टंचाई भासणार?
8
पाकिस्तान विरोधात मोठी तयारी! अजित डोवाल यांनी २४ तासांत दुसऱ्यांदा पंतप्रधान मोदींची भेट घेतली
9
३२८ रुपयांवर लिस्ट झाला Ather Energy IPO; लिस्टिंगनंतर शेअर जोरदार आपटला, शेअर विकायला रांग
10
टीसीएसमध्ये पगारवाढ नाही! पण, ७० टक्के कर्मचाऱ्यांना मिळाली गुड न्यूज; काय आहे कारण?
11
रशियाकडून भारताकडे युद्धनौका निघणार, याच महिन्यात पोहोचणार; रडारही पकडू शकणार नाही, ब्राह्मोस क्षेपणास्त्र डागणार...
12
'मी शाहरुख...', MET GALA मध्ये परदेशी मीडियाने बॉलिवूडच्या बादशहाला ओळखलंच नाही?
13
Crime: 24 वर्षाचा शिक्षक, 14 वर्षाची विद्यार्थीनी; OYO हॉटेलमध्ये रूम बूक केली अन् घडलं भयंकर
14
संपूर्ण दिवस बेशुद्ध अन् ICU मध्ये उपचार, 'इंडियन आयडॉल' फेम पवनदीपची हेल्थ अपडेट समोर
15
"हा माझ्या होणाऱ्या मुलाचा बाप..."; साखरपुड्यात गर्लफ्रेंडची एन्ट्री, उघड केली नवरदेवाची गुपितं
16
पाकिस्तानचं आर्थिक कंबरडं मोडणार? भारताच्या धाकाने मोठमोठ्या विमान कंपन्यांनी मार्ग बदलले
17
बलात्काराचा गुन्हा दाखल होताच एजाज खान फरार! पोलिसांकडून अभिनेत्याचा शोध सुरू
18
इलेक्ट्रिक गाड्या वापरणाऱ्यांसाठी मोठा झटका! सरकारने चार्जिंगचे नियम बदलले
19
बेस्ट बसची दुप्पट दरवाढ 'या' तारखेपासून लागू; आता प्रवाशांना मोजावे लागणार इतके पैसे
20
भारत- पाकिस्तान युद्धाबाबत बाबा वेंगांची भाकीत काय सांगतात? वाचा सविस्तर

मंगरूळला तीव्र पाणीटंचाई

By admin | Updated: December 31, 2015 01:06 IST

अमळनेर : तालुक्यातील मंगरूळ येथे तीव्र पाणीटंचाई भासू लागली आहे.

अमळनेर : तालुक्यातील मंगरूळ येथे तीव्र पाणीटंचाई भासू लागली आहे. गेल्या सहा दिवसांपासून गावात पाणी नसल्याने, शासनाने तातडीची उपाययोजना करण्याची मागणी सरपंच अनिल अंबर पाटील यांनी केली आहे.

मंगरूळ गावाला बोरी काठावरील हिंगोणे व कोळपिंप्री येथील विहिरीवरून 10 ते 11 किलोमीटर अंतरावरून पाणीपुरवठा केला जात होता. मात्र यंदा पाऊस कमी झाल्याने, बोरी नदीला पाणीच आले नाही.

त्यामुळे विहिरीचे पुनर्भरण झाले नाही. विहिरीची पाण्याची पातळी खालावल्याने, गेल्या सहा दिवसांपासून गावाचा पाणीपुरवठा बंद झाला आहे.

गाव विहिरीत टाकायलाही पाणी नाही. तामसवाडी धरणातही मृत साठाच शिल्लक असल्याने, यंदा आवर्तन सुटणेही अशक्य आहे. मंगरूळ हे गाव अवर्षणप्रवण भागात येत असल्याने, विहिरींना पाणी नाही. त्यामुळे विहीर अधिग्रहण करूनही उपयोग नाही.

कोळपिंप्री येथील विहिरींमध्ये अत्यल्प पाणीसाठा शिल्लक असल्याने, मंगरूळ, शिरूड या दोन्ही गावांना अडचण निर्माण झालेली आहे. मंगरूळ ग्रामपंचायतीने टंचाईसंदर्भात आढावा ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडे पाठवला आहे.

या गावाची लोकसंख्या सुमारे 10 हजार असल्याने, तेथे टॅँकरने पाणीपुरवठा करणेही शक्य नाही. आतापासूनच येथे भीषण पाणीटंचाई भासू लागली असून, आगामी सहा महिन्यात बिकट स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.

शिरूडची लोकसंख्या साडेचार हजार असून, पाणीपुरवठय़ासाठी दुसरी योजना नाही.

इंदासे धरणाचा पर्याय

अमळनेर तालुक्याच्या सीमेवर, पारोळा तालुक्यात इंदासे धरण शिरूडपासून पाच तर मंगरूळपासून 10 किलोमीटर अंतरावर आहे. तेथून पाईपलाईन टाकून या दोन्ही गावांची समस्या सुटू शकते.

गेल्यावर्षी याच धरणावरून अमळनेर तालुक्याला टॅँकरने पाणीपुरवठा करण्यात आला होता. त्यामुळे शासनाने तात्पुरती पाईपलाईन टाकून इंदासे धरणावरून दोन्ही गावांना पाणीपुरवठा करावा, अशी मागणी सरपंच पाटील यांनी केली आहे. (वार्ताहर)