शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

ई-फेरफारमध्ये तिसऱ्या आलेल्या जळगावात सर्व्हर डाऊन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2021 04:15 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : महसूल विभागाच्या ई-फेरफार प्रणालीमध्ये राज्यात तिसऱ्या स्थानी आलेल्या जळगाव जिल्ह्यातच ऑनलाईन प्रणालीचे सर्व्हर डाऊन ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : महसूल विभागाच्या ई-फेरफार प्रणालीमध्ये राज्यात तिसऱ्या स्थानी आलेल्या जळगाव जिल्ह्यातच ऑनलाईन प्रणालीचे सर्व्हर डाऊन झाले असून जो पर्यंत सर्व्हर सुरु होत नाही व त्याला गती येत नाही तोपर्यंत ऑनलाईन काम न करण्याचा निर्णय तलाठी संघाने घेतला आहे. त्यानुसार जळगाव तालुका तलाठी संघाने डिजिटल सिग्नीचर सिस्टीम (डीएससी) तहसीलदारांकडे जमा केले आहे. ऐन पिक पेऱ्याची नोंदणी हवी असताना शेतकऱ्यांना सातबारा मिळत नसून नोंदीदेखील खोळंबल्या आहेत.

महसूल विभागाचे कामकाज डिजिटल करीत असताना सातबाराही डिजिटल देण्यासाठी सर्व तलाठी कार्यालयात यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली. मात्र गेल्या महिन्याभरापासून सर्व्हरची गती अत्यंत कमी झाली आहे. चार ते पाच दिवसांपासून ते सुरुच झाले नाही. यामुळे तलाठी वर्ग चांगलाच वैतागला आहे. अगोदर गती कमी होती म्हणून रात्रीतून सातबारा उतारा काढून ठेवला जात होता. आता तर सर्व्हर चालतच नसल्याने काय करावे, असा प्रश्न तलाठी बांधवांसमोर उभा राहिला. त्यामुळे जळगाव तालुका तलाठी संघाने तालुक्यातील ३३ डिजिटल सिग्नीचर सिस्टीम शुक्रवारी तहसीलदार नामदेव पाटील यांच्याकडे जमा केल्या. जोपर्यंत सर्व्हर सुरळीत सुरु होत नाही तोपर्यंत ऑललाईन कामकाज करायचे नाही असा इशाराही तलाठी संघातर्फे देण्यात आला आहे. ३ मार्च रोजीदेखील सर्व्हरच्या समस्येविषयी तक्रार करण्यात आली होती. मात्र त्याचा उपयोग झाला नाही. त्यामुळे ५ रोजी डीएससी सील करून जमा करण्यात आल्या.

या वेळी तालुका तलाठी संघाचे अध्यक्ष एस.आर. नेरकर, कार्याध्यक्ष एम.बी. सोनवणे, उपाध्यक्ष आर.पी. अहिरे, सचिव एस.एस. पाटील, जिल्हा प्रतिनिधी रुपेश ठाकूर, संदीप डोभाळ यांच्यासह तलाठी बांधव उपस्थित होते.

शेतकऱ्यांचे कामे खोळंबली

सर्व्हर चालत नसल्याने याचा शेतकऱ्यांसह मिळकतदार व इतरांनाही फटका बसत आहे. सर्व्हरअभावी सातबारा काढता येत नसून नोंदीदेखील करणे थांबले आहे. विशेष म्हणजे सध्या शेतकऱ्यांना ज्वारीचा पेरा लावून हवा असताना पिकपेरादेखील लावता येत नसल्याचे चित्र आहे.

स्वतंत्र सर्व्हर हवे

या प्रक्रियेसाठी जळगाव व नाशिक मिळून एक सर्व्हर आहे. त्यामुळे अधिकच ताण येत असतो. त्यामुळे जळगाव जिल्ह्यासाठी स्वतंत्र सर्व्हर उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी होत आहे. विशेष म्हणजे ई फेरफार नोंदीमध्ये नाशिक विभागातील पाचही जिल्हे अव्वल व जळगाव तिसऱ्या स्थानी असताना सर्व्हरची समस्या मार्गी लागत नसल्याचे चित्र आहे.