शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
3
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
4
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
5
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
6
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!
7
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
8
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
9
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
10
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
11
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
12
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
13
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
14
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
15
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
16
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
17
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
18
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
19
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
20
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले

दुसऱ्यांदा खात्यातून फी डेबिट झाली,

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 04:17 IST

परीक्षा अर्ज भरणे सुरू : युपीआयद्वारे भरणा न करण्याचे आवाहन लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : परीक्षा अर्ज भरताना बँक ...

परीक्षा अर्ज भरणे सुरू : युपीआयद्वारे भरणा न करण्याचे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : परीक्षा अर्ज भरताना बँक खात्यातून दुसऱ्यांदाही फी डेबिट झाली आणि ट्रान्‍झॅक्शन अनसक्सेसफुली असा संदेश प्राप्त होत असेल तर घाबरून जाऊ नका. विद्यापीठाला संपूर्ण माहिती ई-मेलद्वारे पाठवा. लवकरच जादा भरलेली रक्कम परत करण्याची कार्यवाही केली जाईल. त्यासाठी ई-मेलची सुविधा विद्यापीठाकडून उपलब्ध करून देण्‍यात आली असल्याची माहिती विद्यापीठाकडून देण्यात आली.

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या मे, जून, जुलै महिन्यांत होणाऱ्या विविध अभ्यासक्रमांच्या परीक्षांचे अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. काही अभ्यासक्रमांची ही प्रक्रिया पूर्ण होऊन परीक्षांना सुरुवात देखील झालेली आहे; पण जे विद्यार्थी परीक्षा अर्ज भरत आहेत, त्यापैकी काहींना अडचणी येत आहेत. बँक खात्यातून रक्कम डेबिट होत आहे. परंतु, अर्ज भरला जात नाही. अशावेळी विद्यार्थी पुन्हा फी भरण्याची घाई करतात. पुन्हा रक्कम डेबिट होते आणि ट्रान्‍झॅक्शन अनसक्सेसफूल असा संदेश प्राप्त होतो. त्यामुळे जादाची रक्कम विद्यार्थ्यांकडून भरली जात आहे. हा प्रकार विद्यापीठाच्या निदर्शनास आला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या बँक खात्यातून दुसऱ्यांदा फी डेबिट झाली आणि ट्रान्झॅक्शन अनसक्सेसफूल असा संदेश प्राप्त झाला असेल तर विद्यार्थ्याने जादाची भरलेली रक्कम परत मिळविण्यासाठी आपले नाव, मोबाईल क्रमांक, पीआरएन व ट्रान्झॅक्शन आयडी, बँकेचे नाव, बँक खाते क्रमांक तसेच आयएफएससी कोड व रक्कम, आदींच्या माहितीसह आपली अडचण थोडक्यात नमूद करून ती माहिती उमविच्या रिफंडस्‌ या ई-मेल आयडीवर पाठवायची आहे. सोबतच बँक स्टेटमेंटची स्कॅन कॉपी, एसएमएसचा स्क्रीन शॉट देखील ई-मेलद्वारे पाठवायचा आहे.

काय कराल, काय टाळाल....

परीक्षा अर्ज भरतेवेळी ऑनलाईन फी भरण्यासाठी शक्यतो डेबिट कार्ड किंवा नेट बँकिंगचा वापर करण्याचे आवाहन विद्यापीठाने केले आहे. तसेच युपीआयद्वारे भरणा करण्यास शक्यतो टाळावे, असेही आवाहन करण्‍यात आले आहे. ऑनलाईन परीक्षा फी भरतेवेळी काही कारणास्तव विद्यार्थ्यांच्या अकाउंटमधून फी डेबिट झाली, तथापि फॉर्म भरला गेला नसेल तर पुन्हा पेमेंट करू नये, तसेच ज्यांची परीक्षा फी बँक खात्यातून डेबिट झाली, परंतु अर्ज भरला गेला नाही, अशा विद्यार्थ्यांचे अर्ज तीन ते चार दिवसांमध्ये बँक रिकॉन्सिलिएशननंतर ऑटो सबमिट होईल. त्यासाठी पुन्हा फी भरण्याची घाई विद्यार्थ्यांनी करू नये, असे विद्यापीठाकडून कळविण्यात आले आहे.