शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात मोठ्या मुस्लीम देशाच्या राष्ट्रपतीनं UN महासभेत म्हटलं, "ॐ  शांति ओम..." 
2
Video: बँकाँकमध्ये भूमिगत रेल्वे स्टेशनचे काम सुरु होते; अचानक रस्त्यावर भगदाड पडले, सगळे...
3
मुख्यमंत्र्यांचं उद्योगपती अजीम प्रेमजी यांना पत्र; उधारीत का मागितला एक रस्ता?
4
'कोल्हापूरकरांनो आता आपली जबाबदारी...'; मराठवाड्यातील मदतीसाठी सतेज पाटलांचे आवाहन
5
Asia Cup 2025: तिलक वर्मा नवा विक्रम रचण्याच्या उंबरठ्यावर; शिखर धवनला मागे टाकण्याची संधी
6
लाडकी बहीण, गॅस सबसिडी सारख्या योजनांचे पैसे अडकणार? १ ऑक्टोबरपूर्वी 'हे' काम करा पूर्ण
7
'दादा, ओला दुष्काळ जाहीर करा'; अजित पवार शेतकऱ्यांना म्हणाले, "आता आम्हाला पाहणी तर..."
8
'द बॅड्स ऑफ बॉलिवूड'मध्ये समीर वानखेडेंची नक्कल; क्रांती रेडकरने Video शेअर करत दिलं सडेतोड उत्तर
9
Beed: लक्ष्मण हाकेंच्या जवळच्या सहकाऱ्यावर प्राणघातक हल्ला; जेवण करत असतानाच तुटून पडले, लाठ्या-काठ्यांनी मारहाण
10
Viral Video : अरे बापरे हे काय बघितलं! महिलेने कॅमेरा सुरू केला अन् पुढे जे काही घडलं... ; व्हिडीओ बघून तुम्हीही हैराण व्हाल!
11
सरकारी बँकांमध्ये वाढणार परदेशी गुंतवणूकदारांचा हिस्सा! सरकार करतंय मोठी तयारी
12
२० टक्के इथेनॉलचा डंख कसा शमवायचा? पेट्रोल भरताना ही ट्रिक वापरा...
13
GST कपातीचा फायदा ग्राहकांना नाही? कंपन्यांची 'ही' चलाखी पाहून ग्राहक संतापले
14
ECINET: मतदार यादीतून नाव काढणं आता सोपं नाही; निवडणूक आयोगानं सुरू केली नवी 'ई-साइन' प्रणाली
15
Mumbai: उद्योगपती नुस्ली वाडिया यांच्यासह कुटुंबावर गुन्हा दाखल, नेमकं प्रकरण काय?
16
'माझ्या बायकोला तू पळवून लावलंस!'; रागाच्या भरात भावाने बहिणीची केली निर्घृण हत्या
17
"लग्न नाही, फॅमिली नाही विचार करा...", फुकटचा सल्ला देणाऱ्या चाहत्याला जुईचं सडेतोड उत्तर, म्हणाली- "अशा माणसांची..."
18
नवरात्रीतील विनायक चतुर्थी २०२५: 'या' ८ राशींसाठी जुळून आले ३ महाशुभ योग; मिळेल विशेष धनलाभ!
19
मुलाला तुरुंगवास, धक्का बसलेल्या वडिलांनी संपवलं जीवन, अंत्यसंस्कारावेळी घडलं असं काही, ७ पोलीस निलंबित
20
"भारतासोबतचे संबंध महत्त्वाचे, आशा आहे की..."; अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री रुबियोंनी दिले टॅरिफ कमी करण्याचे संकेत

पर्यावरण संवर्धनासाठी भुसावळच्या वृक्षप्रेमींचे पंतप्रधानांना साकडे

By admin | Updated: July 5, 2017 12:36 IST

चौपदरीकरण करणा:या कंपनीने वृक्षारोपण व संवर्धन करण्याची केली पत्राद्वारे मागणी

ऑनलाईन लोकमत

भुसावळ,दि.5 - जिल्ह्यातील आशिया महामार्ग चौपदरीकरणाच्या प्रत्यक्ष कामाचा मुहूर्त अजूनही सापडला नाही. गेल्या पाच वर्षापासून केवळ भूसंपादन व निविदांच्या तांत्रिक प्रक्रियेत महामार्गाला लागून असलेली लाखो झाडे सूचना नसताना सुद्धा कापली गेली. चौपदरीकरण करणा:या कंपनीनेच वृक्ष लावून त्यांचे संवर्धन करावे, अशी मागणी करणारे पत्र वृक्षप्रेमींसह प्रा.धीरज पाटील यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठविले आहे.
 चौपदरीकरणासाठी जमीन अधिग्रहण होण्यापूर्वीच वरणगावपासून भुसावळ व जळगाव रस्त्याला लागून असंख्य वृक्ष तोडण्यात आले. यामुळेच  परिसरातील पर्यावरण बिघडले  आहे. मार्च-एप्रिल महिन्यातच तापमान 41 अंश सेल्सिअसर्पयत पोहचले आहे. चौपदरीकरणाच्या कामाची सुरुवात वृक्षतोडीपासून करणेच मुळात चुकीचे होते. यामुळे  तापमानवाढीत यंदा भर पडली आहे.
महामार्गावरील वृक्षतोड जिल्ह्यात आतार्पयतची सर्वात मोठी  आहे. तीन वर्षात हा महामार्ग तयार होणे अपेक्षित होते. नियमानुसार जेवढी झाडे कापली तेवढी लावण्याची जबाबदारी संबंधित संस्थेची होती. केवळ झाड लावणे नव्हे तर त्याला जगविणेदेखील त्यांचे कर्तव्य असते. त्यामुळे झाड जगेर्पयत त्याचे संवर्धन करणे हे बंधनकारक आहे. एवढय़ा मोठय़ा प्रमाणावर वृक्षांची कत्तल झाल्यामुळे पर्यावरणात गंभीर बदल झाले आहे असे मत परिसरातील पर्यावरणप्रेमी व्यक्त करीत आहेत. त्यामुळे वृक्ष पुनर्लागवड करण्याचे कामदेखील लवकर करण्यात यावे, अशी मागणी  आहे.
जपान सरकारच्या सहकार्याने भुसावळ ते अजिंठा जामनेर मार्गे रस्त्याचे काम काही वर्षापूर्वी करण्यात आले होते. त्यात ही मोठी वृक्षतोड होणार असल्याने वृक्ष लागवड, संवर्धनाची अट घालण्यात आली होती पण त्या रस्त्यावर बोटावर मोजण्याइतकी झाडे लावून त्यातील किती मोठी झाली याविषयी पर्यावरणप्रेमींना शंका आहे. म्हणजेच मागचा अनुभव फार वाईट आहे. त्याच अनुभवातून आपण आता शिकले पाहिजे.
रखडलेल्या  कामाला गती देण्याआधी या पावसाळ्यात महामार्गाच्या आजूबाजूस असलेल्या भागात वृक्ष तोड करणा:या कंपनीने 24 तास ऑक्सिजन देणारे देशी बहुवार्षिक वृक्ष लावून त्याचे संवर्धन करावे, अशी मागणी व कंपनीच्या विरोधात तक्रार पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय रस्ते व परिवहन मंत्री नितीन गडकरी, वाहतूक व दळणवळण विभागाचे सचिव यांच्याकडे करण्यात आली आहे.चौपदरीकरणाच्या नादात पाच वर्षे वाया गेली, पर्यावरणाचा समतोल बिघडला आहे. यासंबंधी लवकर कारवाई करावी अन्यथा भुसावळ परिसरातील सामाजिक संस्था व पर्यावरणप्रेमी या विषयासंबंधी जनहित याचिका दाखल करणार आहे.