शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

पर्यावरण संवर्धनासाठी भुसावळच्या वृक्षप्रेमींचे पंतप्रधानांना साकडे

By admin | Updated: July 5, 2017 12:36 IST

चौपदरीकरण करणा:या कंपनीने वृक्षारोपण व संवर्धन करण्याची केली पत्राद्वारे मागणी

ऑनलाईन लोकमत

भुसावळ,दि.5 - जिल्ह्यातील आशिया महामार्ग चौपदरीकरणाच्या प्रत्यक्ष कामाचा मुहूर्त अजूनही सापडला नाही. गेल्या पाच वर्षापासून केवळ भूसंपादन व निविदांच्या तांत्रिक प्रक्रियेत महामार्गाला लागून असलेली लाखो झाडे सूचना नसताना सुद्धा कापली गेली. चौपदरीकरण करणा:या कंपनीनेच वृक्ष लावून त्यांचे संवर्धन करावे, अशी मागणी करणारे पत्र वृक्षप्रेमींसह प्रा.धीरज पाटील यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठविले आहे.
 चौपदरीकरणासाठी जमीन अधिग्रहण होण्यापूर्वीच वरणगावपासून भुसावळ व जळगाव रस्त्याला लागून असंख्य वृक्ष तोडण्यात आले. यामुळेच  परिसरातील पर्यावरण बिघडले  आहे. मार्च-एप्रिल महिन्यातच तापमान 41 अंश सेल्सिअसर्पयत पोहचले आहे. चौपदरीकरणाच्या कामाची सुरुवात वृक्षतोडीपासून करणेच मुळात चुकीचे होते. यामुळे  तापमानवाढीत यंदा भर पडली आहे.
महामार्गावरील वृक्षतोड जिल्ह्यात आतार्पयतची सर्वात मोठी  आहे. तीन वर्षात हा महामार्ग तयार होणे अपेक्षित होते. नियमानुसार जेवढी झाडे कापली तेवढी लावण्याची जबाबदारी संबंधित संस्थेची होती. केवळ झाड लावणे नव्हे तर त्याला जगविणेदेखील त्यांचे कर्तव्य असते. त्यामुळे झाड जगेर्पयत त्याचे संवर्धन करणे हे बंधनकारक आहे. एवढय़ा मोठय़ा प्रमाणावर वृक्षांची कत्तल झाल्यामुळे पर्यावरणात गंभीर बदल झाले आहे असे मत परिसरातील पर्यावरणप्रेमी व्यक्त करीत आहेत. त्यामुळे वृक्ष पुनर्लागवड करण्याचे कामदेखील लवकर करण्यात यावे, अशी मागणी  आहे.
जपान सरकारच्या सहकार्याने भुसावळ ते अजिंठा जामनेर मार्गे रस्त्याचे काम काही वर्षापूर्वी करण्यात आले होते. त्यात ही मोठी वृक्षतोड होणार असल्याने वृक्ष लागवड, संवर्धनाची अट घालण्यात आली होती पण त्या रस्त्यावर बोटावर मोजण्याइतकी झाडे लावून त्यातील किती मोठी झाली याविषयी पर्यावरणप्रेमींना शंका आहे. म्हणजेच मागचा अनुभव फार वाईट आहे. त्याच अनुभवातून आपण आता शिकले पाहिजे.
रखडलेल्या  कामाला गती देण्याआधी या पावसाळ्यात महामार्गाच्या आजूबाजूस असलेल्या भागात वृक्ष तोड करणा:या कंपनीने 24 तास ऑक्सिजन देणारे देशी बहुवार्षिक वृक्ष लावून त्याचे संवर्धन करावे, अशी मागणी व कंपनीच्या विरोधात तक्रार पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय रस्ते व परिवहन मंत्री नितीन गडकरी, वाहतूक व दळणवळण विभागाचे सचिव यांच्याकडे करण्यात आली आहे.चौपदरीकरणाच्या नादात पाच वर्षे वाया गेली, पर्यावरणाचा समतोल बिघडला आहे. यासंबंधी लवकर कारवाई करावी अन्यथा भुसावळ परिसरातील सामाजिक संस्था व पर्यावरणप्रेमी या विषयासंबंधी जनहित याचिका दाखल करणार आहे.