शहरं
Join us  
Trending Stories
1
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
2
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
3
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
4
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
5
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
6
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
7
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
8
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
9
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
10
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
11
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
12
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
13
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
14
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
15
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
16
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
17
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
18
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
19
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
20
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या

वाळू उपसा, अतिक्रमणमुळे गिरणेचे अस्तित्व धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 04:16 IST

अजय पाटील लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : नेहमीचा अनधिकृत वाळू उपसा, पात्रात वाढत जाणारी जलपर्णी व शेतीसाठी होत असलेले ...

अजय पाटील

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : नेहमीचा अनधिकृत वाळू उपसा, पात्रात वाढत जाणारी जलपर्णी व शेतीसाठी होत असलेले अतिक्रमण यामुळे गिरणा नदी आपले अस्तित्व हरवत जात आहे. मात्र, गिरणा नदीचे होत असलेल्या या वाताहतीकडे प्रशासन, पर्यावरणवादी संघटनांचेही दुर्लक्ष होत आहे. वाळू उपसा अशाच प्रकारे सुरू राहिल्यास येत्या १० ते १२ वर्षांमध्ये नदीपात्रात केवळ जलपर्णी व खडकाव्यतिरिक्त काहीही शिल्लक राहणार नाही अशी भीती आता व्यक्त केली जात आहे.

कधीकाळी पावसाळ्यात असो वा हिवाळ्यात नेहमी वाहणारी गिरणा नदी आज आपल्या अस्तित्वासाठी झगडत आहे. वाळू माफियांनी ज्याप्रकारे गिरणा नदीला गेल्या काही वर्षांत ओरबाडणे सुरू केले आहे. त्यामुळे सध्या बांभोरी, भोकणी, निमखेडी व आव्हाणे शिवारात गिरणा पात्रात वाळूपेक्षा खडक लागायला सुरुवात झाली आहे. तसेच अनेक ठिकाणी नदीपात्रातून वाळूच शिल्लक नसल्याने जलपर्णी सारख्या वनस्पती वाढत आहे. प्रशासनाने जर गिरणा नदी वाचविण्यासाठी वेळीच उपाययोजना केल्या नाहीत, तर येणाऱ्या काळात गिरणा नदीचे रूपांतर एका नाल्यात झालेले पहायला मिळू शकते.

गिरणेचे अस्तित्व नष्ट होण्याचे कारणे

१. गिरणा पात्रात होत असलेला बेसुमार वाळू उपसा.

२. पात्रात वाढत जाणाऱ्या जलपर्णी व वेडी बाभूळसारख्या वनस्पतींचे प्रमाण.

३. शेतीसाठी गिरणा पात्रात होत असलेले अतिक्रमण.

४. जळगाव शहरासह परिसरातील सांडपाणी व कंपन्यांचे दूषित पाणी थेट पात्रात जात आहे.

यामुळे होणारे परिणाम

१. गिरणा नदीच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या सुमारे पाच लाख नागरिकांना बसणार फटका.

२. सुमारे ३० हजार हेक्टर क्षेत्रावरील केळीच्या लागवडीवर होणार परिणाम.

३. सध्या उन्हाळ्यात गिरणा काठालगतच्या अनेक गावांमधील बोअरवेल पडतात बंद.

४. गिरणेतील जैवविविधतेवर होतेय परिणाम, गिरणा पात्रात येणाऱ्या स्थलांतरित पक्ष्यांमध्ये होतेय घट.

लक्ष देणाऱ्यांची भूमिका

१. लोकप्रतिनिधीचे दुर्लक्ष

जिल्ह्यातील एकही लोकप्रतिनिधी गिरणेतील अनधिकृत वाळू उपस्यावर बोलायला तयार नाही. सगळ्याच पक्षातील लोकप्रतिनिधी आपापल्या पक्षातील वाळू व्यवसायात उतरलेल्या कार्यकर्त्यांना पोसण्यात मश्गुल आहेत.

२. जिल्हा प्रशासन महसूल जमा करण्यात व्यस्त.

लोकप्रतिनिधी लक्ष द्यायला तयार नसताना, प्रशासनदेखील वाळू लिलाव करून महसूल वसूल करण्यात व्यस्त आहे. अनधिकृत वाळू उपसा होत असताना त्याठिकाणी काही मोजक्याच तलाठी, ग्रामस्थ, ग्रामपंचायत सदस्यांच्या निश्चित झालेल्या हप्तेखोरीमुळे गिरणेकडे संपूर्णपणे दुर्लक्ष होत आहे.

सुरत रेल्वेपुलाचे खांब ही पडले उघडे

सुरत-भुसावळ रेल्वेमार्ग दरम्यान गिरणा नदीवर दोन पूल आहेत. त्यापैकी जुन्या पुलाचे खांब अनेक वर्षांपूर्वीच प्रचंड वाळू उपस्यामुळे मूळ जागेपेक्षा एक ते दोन फुटांपर्यंत खाली गेले आहेत, तर आता नवीन पुलाचे खांबदेखील वाळू उपस्यामुळे पूर्णपणे उघडे पडले आहेत. अशाचप्रकारे वाळू उपसा कायम राहिल्यास भविष्यात हा पूलदेखील धोकेदायक ठरण्याची शक्यता आहे.