शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

गाळेधारकांच्या मुंबई वारीनंतरच मनपाची भूमिका ठरणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 04:12 IST

नगरविकास मंत्र्यांच्या निरोपाची गाळेधारकांना प्रतीक्षा : मनपाच्या कारवाईतही अडथळा लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : मनपाच्या मुदत संपलेल्या मार्केटमधील गाळेधारकांबाबत ...

नगरविकास मंत्र्यांच्या निरोपाची गाळेधारकांना प्रतीक्षा : मनपाच्या कारवाईतही अडथळा

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : मनपाच्या मुदत संपलेल्या मार्केटमधील गाळेधारकांबाबत मनपा प्रशासनाने कारवाई करण्याची तयारी केली असतानाच, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत मुंबईत बैठक घेऊन तोडगा काढण्याचे आश्वासन दिल्यामुळे मनपाच्या पुढील प्रक्रियेला ‘ब्रेक’ लागला आहे. त्यामुळे मनपाकडून आता गाळेधारकांची मुंबईवारी झाल्यानंतरच मनपाची पुढील भूमिका ठरणार असल्याची माहिती मनपा प्रशासनाच्या सूत्रांनी दिली आहे. तर मुंबईच्या बैठकीबाबत नगरविकास मंत्रालयाकडूनदेखील गाळेधारकांना कोणत्याही सूचना न मिळाल्याने गाळेधारकदेखील ताटकळले आहेत.

गेल्या ९ वर्षांपासून गाळेधारकांचा प्रश्न लोकप्रतिनिधींकडून झुलवत ठेवला जात आहे. याबाबत कोणतीही कारवाईही होत नाही तर दुसरीकडे वसुली देखील होत नाही. यामुळे गाळेधारकांचा प्रश्न हा अधांतरीत अवस्थेत येून पडला आहे. मनपाने गाळेधारकांवर कारवाई करून वसुलीसाठी आता कुठे हिंमत दाखविण्याची तयारी केली होती. मात्र, त्यातच पुन्हा नगरविकास मंत्र्यांचा आश्वासनामुळे मनपाची ही हिंमत देखील गळून पडली आहे. मनपाकडून ५० हून अधिक गाळेधारकांचे बँक खाते सील केले आहेत. तर गाळेधारकांना नोटिसादेखील बजाविल्या आहेत. मात्र, आता कारवाईची प्रतीक्षा आहे.

धोरण निश्चित, सत्ताधारी सकारात्मक मग खोडा का ?

मनपा मालकीच्या मुदत संपलेल्या २२ मार्केटमधील सुमारे २७०० गाळेधारकांची मुदत संपून ९ वर्ष झाले आहेत. त्याच्यांकडे तब्बल २५० कोटींची रक्कम भाड्यापोटी शिल्लक आहे. याच थकबाकीच्या रकमेवर मनपाची आर्थिक परिस्थिती अवलंबून आहे. याबाबत मनपा प्रशासनाने कधी नव्हे हिंमत दाखवत गाळे कारवाईबाबत धोरण निश्चित करून, महासभेची मंजुरीदेखील घेतली आहे. तसेच गाळेप्रश्न कायमचा मार्गी लागून वसुली करण्यासाठी सत्ताधारीदेखील सकारात्मक आहेत. त्यामुळे आता या कामात ‘खोडा’ का ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

मंत्र्याचे आश्वासन पूर्ण होईल का?

गाळेप्रश्नावर आतापर्यंत अनेक बैठका झाल्या आहेत. गेल्या शासनाच्या काळात अधिनियमातदेखील बदल करण्यात आला. तरीही गाळेधारक पात्र ठरत नाही. अशा परिस्थितीत आता नगरविकास मंत्र्यांनी बैठकीचे आश्वासन दिल्यानंतर जर प्रश्नच मार्गी लागू शकणार नाही. तर मग या बैठकांचा घाट का घातला जात आहे ? असा प्रश्न निर्माण होत आहे. दरम्यान, मनपा प्रशासन केवळ आता मुंबईच्या बैठकीकडे लक्ष ठेवून असून, जर ही बैठकदेखील लांबत गेली तर मनपाकडून लवकरात लवकर कारवाई केली जाईल, अशी माहिती मनपाच्या एका अधिकाऱ्याने दिली आहे.