शहरं
Join us  
Trending Stories
1
'परिवार का साथ, परिवार का विकास...', बिहारमधून पीएम मोदींची काँग्रेस-रादजवर खोचक टीका
2
इस्रायलसोबत युद्ध सुरू असताना अचानक ३ इराणी विमाने ओमानमध्ये पोहोचली, नेमकं कारण काय?
3
Two-Wheeler New Rules : नवीन सर्व दुचाकींना 'एबीएस आणि दोन हेल्मेट' सक्तीचे; केंद्रीय परिवहन मंत्रालयाचा मोठा निर्णय
4
कुणी फुकट खाऊ घालत नाही...! आसिम मुनीर-डोनाल्ड ट्रम्प 'लन्च पॉलिटिक्स'नं पाकिस्तानचंच टेन्शन वाढवलं
5
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेवेळी एका टिफिनवाल्याने वाचवला ८० डॉक्टरांचा जीव
6
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
7
Pandharpur Wari 2025: आता स्वस्तात करा विठ्ठलाचे दर्शन; एसटी महामंडळाची खास ऑफर!
8
१ जुलैपासून बदलणार बँकिंगचे नियम, क्रेडिट कार्ड बिल पेमेंटमध्येही होणार बदल; जाणून घ्या माहिती
9
क्रुझर प्रेमींची पहिली पसंत; नवीन अवतारात येणार Bajaj ची Avenger, किंमत फक्त...
10
Debt on US: ट्रम्प अडकले... संकटात अमेरिका; कर्ज ३७ ट्रिलियन डॉलर्सच्या पार, भारताचं किती देणं लागतो US
11
आधी स्वत:च पत्नीचं कुंकू पुसलं, नंतर बॉयफ्रेंडसोबत लग्न लावलं; पती म्हणतो, “मला विष देऊन...”
12
इराण-इस्त्रायल युद्ध आता ट्रम्प विरुद्ध पुतिन; चीन, नॉर्थ कोरियाचा हुकुमशाह उघडपणे पुढे आले
13
पंढरपुरात मोठी घटना! मित्रासोबत विठू माऊलीच्या दर्शनाला आलेल्या तरुणाचा चंद्रभागा नदीत बुडून मृत्यू
14
'वर्षभरापूर्वीच एअर इंडियाच्या बोईंगमधील खराबीची माहिती दिलेली'; अहमदाबाद विमान अपघातावर खळबळजनक दावा
15
“पप्पा, आम्हाला भारतात बोलवा अन् फोन कट”; इराणमध्ये अडकली लेक, वडिलांना सतावतेय भीती
16
अभिषेक-करिश्मा कपूरचा झालेला साखरपुडा, पण लग्न का मोडलं? बिग बींनी केलेला खुलासा
17
बँकेत जाताय? थांबा! जुलैमध्ये १३ दिवस बँका बंद राहणार; पहा तुमच्या शहरातील सुट्ट्यांची यादी
18
मुंबई महापालिकेची निवडणूक मविआ एकत्र लढणार की नाही? शरद पवार म्हणाले, "उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची..."
19
Ashadhi Wari 2025: वारी म्हणजे केवळ पंढरपूरला चालत जाणं नव्हे, तर वारी म्हणजे सदेह वैकुंठाची वाट चालणं!
20
प्रियकरासोबत मिळून पतीची केली हत्या, लग्नाआधीपासून सुरू होते अफेअर; हत्येनंतर रचला बनाव

गाळेधारकांच्या मुंबई वारीनंतरच मनपाची भूमिका ठरणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 04:12 IST

नगरविकास मंत्र्यांच्या निरोपाची गाळेधारकांना प्रतीक्षा : मनपाच्या कारवाईतही अडथळा लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : मनपाच्या मुदत संपलेल्या मार्केटमधील गाळेधारकांबाबत ...

नगरविकास मंत्र्यांच्या निरोपाची गाळेधारकांना प्रतीक्षा : मनपाच्या कारवाईतही अडथळा

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : मनपाच्या मुदत संपलेल्या मार्केटमधील गाळेधारकांबाबत मनपा प्रशासनाने कारवाई करण्याची तयारी केली असतानाच, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत मुंबईत बैठक घेऊन तोडगा काढण्याचे आश्वासन दिल्यामुळे मनपाच्या पुढील प्रक्रियेला ‘ब्रेक’ लागला आहे. त्यामुळे मनपाकडून आता गाळेधारकांची मुंबईवारी झाल्यानंतरच मनपाची पुढील भूमिका ठरणार असल्याची माहिती मनपा प्रशासनाच्या सूत्रांनी दिली आहे. तर मुंबईच्या बैठकीबाबत नगरविकास मंत्रालयाकडूनदेखील गाळेधारकांना कोणत्याही सूचना न मिळाल्याने गाळेधारकदेखील ताटकळले आहेत.

गेल्या ९ वर्षांपासून गाळेधारकांचा प्रश्न लोकप्रतिनिधींकडून झुलवत ठेवला जात आहे. याबाबत कोणतीही कारवाईही होत नाही तर दुसरीकडे वसुली देखील होत नाही. यामुळे गाळेधारकांचा प्रश्न हा अधांतरीत अवस्थेत येून पडला आहे. मनपाने गाळेधारकांवर कारवाई करून वसुलीसाठी आता कुठे हिंमत दाखविण्याची तयारी केली होती. मात्र, त्यातच पुन्हा नगरविकास मंत्र्यांचा आश्वासनामुळे मनपाची ही हिंमत देखील गळून पडली आहे. मनपाकडून ५० हून अधिक गाळेधारकांचे बँक खाते सील केले आहेत. तर गाळेधारकांना नोटिसादेखील बजाविल्या आहेत. मात्र, आता कारवाईची प्रतीक्षा आहे.

धोरण निश्चित, सत्ताधारी सकारात्मक मग खोडा का ?

मनपा मालकीच्या मुदत संपलेल्या २२ मार्केटमधील सुमारे २७०० गाळेधारकांची मुदत संपून ९ वर्ष झाले आहेत. त्याच्यांकडे तब्बल २५० कोटींची रक्कम भाड्यापोटी शिल्लक आहे. याच थकबाकीच्या रकमेवर मनपाची आर्थिक परिस्थिती अवलंबून आहे. याबाबत मनपा प्रशासनाने कधी नव्हे हिंमत दाखवत गाळे कारवाईबाबत धोरण निश्चित करून, महासभेची मंजुरीदेखील घेतली आहे. तसेच गाळेप्रश्न कायमचा मार्गी लागून वसुली करण्यासाठी सत्ताधारीदेखील सकारात्मक आहेत. त्यामुळे आता या कामात ‘खोडा’ का ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

मंत्र्याचे आश्वासन पूर्ण होईल का?

गाळेप्रश्नावर आतापर्यंत अनेक बैठका झाल्या आहेत. गेल्या शासनाच्या काळात अधिनियमातदेखील बदल करण्यात आला. तरीही गाळेधारक पात्र ठरत नाही. अशा परिस्थितीत आता नगरविकास मंत्र्यांनी बैठकीचे आश्वासन दिल्यानंतर जर प्रश्नच मार्गी लागू शकणार नाही. तर मग या बैठकांचा घाट का घातला जात आहे ? असा प्रश्न निर्माण होत आहे. दरम्यान, मनपा प्रशासन केवळ आता मुंबईच्या बैठकीकडे लक्ष ठेवून असून, जर ही बैठकदेखील लांबत गेली तर मनपाकडून लवकरात लवकर कारवाई केली जाईल, अशी माहिती मनपाच्या एका अधिकाऱ्याने दिली आहे.