शहरं
Join us  
Trending Stories
1
Uddhav Thackeray pats Raj Thackeray Video : कौतुकाची थाप..!! राज ठाकरे यांच्या भाषणानंतर उद्धव ठाकरे यांच्या कृतीने मराठी माणूस सुखावला...
2
Raj Thackeray : "तुमच्याकडे सत्ता विधान भवनात असेल, आमच्याकडे रस्त्यावर...",हिंदी सक्तीवरुन राज ठाकरेंचा राज्य सरकारला इशारा
3
"३० वर्ष झाली तरी मराठी माणसासारखी..."; सुशील केडियांनी राज ठाकरेंची जाहीर माफी मागितली
4
Uddhav Thackeray : "आमच्या दोघांमधला अंतरपाट अनाजी पंतांनी दूर केला"; उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना टोला
5
Raj Thackeray : ठाकरेंची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकली, या आरोपावर राज ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
6
मराठी कलाकारांसमोर राज ठाकरेंकडून बॉलिवूडच्या ए.आर.रहमानचं कौतुक, सांगितला 'तो' प्रसंग
7
Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava Live Update: ...तर आहोत आम्ही गुंड; उद्धव ठाकरेंचं मुख्यमंत्री फडणवीसांना आव्हान
8
"जे बाळासाहेबांना आणि इतरांना जमलं नाही ते फडणवीसांना जमलं’’, राज ठाकरे यांचं मोठं विधान
9
"एकत्र आलो एकत्र राहण्यासाठी, आमचं एकत्र दिसणं महत्त्वाचं," उद्धव ठाकरेंचं सूचक विधान
10
Raj Thackeray : जास्त नाटकं केली, तर कानाखाली आवाज काढलाच पाहिजे; पण...; राज ठाकरेंचा 'सैनिकां'ना आदेश
11
सुरतेची "स्वारी" आता हुजरेगिरीसाठी उरली...; अमोल कोल्हेंचा एकनाथ शिंदेवर कवितेतून निशाणा
12
'मुंबई आकर सारी हेकडी निकाल दूंगा', पप्पू यादव यांचे राज ठाकरेंना चॅलेंज!
13
खळखट्याक सुरू; मराठीत बोलणार नाही म्हणणाऱ्या सुशील केडिया यांचं कार्यालय फोडलं
14
त्रिनिदाद आणि टोबॅगोच नव्हे, 'या' २५ देशांनी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलाय सर्वोच्च सन्मान!
15
"इथेच येऊन बिजनेस करता आणि...", सुशील केडियांवर संतापले भरत जाधव, म्हणाले- "मराठी माणसाने जागं व्हायला हवं..."
16
Zerodha च्या संस्थापकांचा मोठा इशारा, एक्सचेज आणि ब्रोकर्ससाठी वाईट ठरू शकतं हे वृत्त; का म्हणाले नितीन कामथ असं?
17
"…हे तर पुतना मावशीचे प्रेम!’’ भाजपाचा उद्धव ठाकरेंना टोला, ती उदाहरणं देत साधला निशाणा
18
Raj-Uddhav Thackeray Rally : "मराठी भाषेचा विजय झालाय!"; ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यात सिद्धार्थ-भरत जाधव, तेजस्विनी पंडित दाखल, व्यक्त केला आनंद
19
आषाढीला करा उपासाची थंडगार रसमलाई; घरचे खुश होतील, पुन्हा पुन्हा मागून खातील!
20
'एअर इंडिया'च्या अडचणी संपेनात! ऐन उड्डाणाच्या वेळीच पायलटला चक्कर आली अन्...; कुठे घडला 'हा' प्रसंग?

रेल्वे स्टेशनकडे येणाऱ्या नागरिकांसाठी शिवाजीनगरच्या बाजूने रस्ता खुला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 04:17 IST

शिवाजीनगर उड्डाणपूल : जिल्हा परिषदेकडे येणारा रस्ताही दोन दिवसांत खुला करण्यात येणार जळगाव : सध्या शिवाजीनगर उड्डाणपुलाचे काम बंद ...

शिवाजीनगर उड्डाणपूल : जिल्हा परिषदेकडे येणारा रस्ताही दोन दिवसांत खुला करण्यात येणार

जळगाव : सध्या शिवाजीनगर उड्डाणपुलाचे काम बंद असल्यामुळे, नागरिकांच्या मागणीनुसार संबंधित मक्तेदारातर्फे शिवाजीनगरकडून रेल्वे स्टेशनकडे येणारा रस्ता बुधवारपासून खुला करण्यात आला आहे, तर रेल्वे स्टेशनकडून जिल्हा परिषदेकडे येणारा रस्ताही येत्या दोन दिवसांत खुला करण्यात येणार आहे.

शहरातील जीर्ण झालेल्या शिवाजीनगर उड्डाणपुलाच्या जागी सार्वजनिक बांधकाम विभाग व रेल्वे प्रशासनातर्फे गेल्या दोन वर्षांपासून नवीन उड्डाणपूल उभारण्यात येत आहे. मात्र, सध्या कोरोनामुळे पुलाचे काम बंद पडले आहे. दरम्यान, या पुलाच्या कामासाठी संबंधित मक्तेदाराने गेल्या एक वर्षापासून जे रस्ते बंद केले आहेत, ते रस्ते पुन्हा उघडण्यात यावेत, या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते दीपक गुप्ता यांनी गेल्या आठवड्यात जिल्हाधिकारी अभिजित राऊत व सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता प्रशांत सोनवणे यांची भेट घेतली होती. यावेळी गुप्ता यांनी जिल्हाधिकारी व बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना पुलाचे सुरू असलेले विलंबाने काम व यामुळे नागरिकांना शिवाजीनगरात जाण्यासाठी कशा प्रकारे अडचणींचा सामना करावा लागत आहे, याबाबत अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले होते. यानंतर बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी शिवाजीनगर उड्डाणपुलाची पाहणी करून

त्यांनीदेखील तातडीने बंद केलेल्या रस्त्यांच्या ठिकाणी नागरिकांना पायी जाण्यापुरता रस्ता खुला करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार बुधवारी संबंधित मक्तेदारातर्फे शिवाजीनगरच्या बाजूने एक रस्ता उघडण्यात आला आहे.

इन्फो :

जिल्हा परिषदेसमोरील रस्ताही दोन दिवसांत खुला करणार

संबंधित मक्तेदाराने बुधवारी शिवाजीनगरच्या बाजूने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोरील रेल्वे स्टेशनकडे येणारा रस्ता खुला केला आहे. या ठिकाणचे लोखंडी पत्रे बाजूला करून, पादचारी नागरिक व दुचाकीस्वार नागरिकांना जाता येणार आहे. हा रस्ता खुला केल्यामुळे नागरिकांचा कान्हळदा रस्त्यामार्गे साधारणतः अर्ध्या किलोमीटरचे अंतर पार करून येण्या-जाण्याचा त्रास वाचला आहे, तसेच या रस्त्यानंतर आता रेल्वे स्टेशनकडून जिल्हा परिषदेकडे येणारा रस्ताही वर्षभरापासून बंद आहे. त्यामुळे हा रस्ताही येत्या दोन दिवसांत सुरू करण्याबाबत मक्तेदाराने सांगितल्याचे सामाजिक कार्यकर्ते दीपक कुमार गुप्ता यांनी सांगितले.