शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
2
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
3
अस्तनीतले निखारे! पहलगाम मुद्द्यावर काही भारतीयांचा पाकिस्तानला पाठिंबा! आतापर्यंत ३७ जणांना अटक
4
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
5
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
6
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
7
मुफ्ती दहशतवाद्यांच्या घरी जायच्या, काश्मिरी पंडितांना हाकलून कोणी दिलं? फारुख अब्दुल्लांचा आरोप
8
IPL 2025: कगिसो रबाडा ड्रग टेस्टमध्ये दोषी, झाले निलंबन! स्पर्धा सोडून परतला मायदेशी
9
"आम्ही पाकिस्तानी लोकांना मारणार नाही, कारण..."; काय म्हणाले फारुख अब्दुल्ला? सिंधूच्या पाण्यासंदर्भातही मोठं विधान
10
IHMCL Recruitment: आयएचएमसीएलमध्ये नोकरी, एक लाखांहून अधिक पगार; जाणून घ्या पात्रता आणि निवड
11
"घरं तोडायला येतील त्यांना सांगा, राज ठाकरेंशी बोलून घ्या"; एल्फिन्स्टन पूल बाधितांना मनसेने दिला धीर
12
"मी सत्तेसाठी कधीच हपापलेलो नाही, सर्वाधिक सत्ता..."; अजित पवारांनी मांडलं रोखठोक मत
13
Alka Kubal: अलका कुबल यांनी 'माहेरची साडी'साठी घेतलं होतं फक्त इतकं मानधन, पहिल्या कमाईचा आकडाही आला समोर
14
"दादांना विचारतो त्यांनी कुठल्या ज्योतिष्याकडे पाहिलं"; CM व्हावं वाटतं म्हणणाऱ्या अजित पवारांना गोगावलेंचा टोला
15
"शिंदे कसले वाघ, मंत्र्यांचा निधी वळवला जातो, अडचण येताच गावी पळून जातात": अंबादास दानवे
16
Temple: शिवालयाच्या पायरीवर असलेल्या 'या' राक्षसाला नमस्कार करून मंदिरात जाण्याचा प्रघात का?
17
पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा आखाती देशांतील मराठी अनिवासी भारतीयांकडूनही तीव्र निषेध
18
बलुचिस्तानात मोठा खेला...! भारताला पोकळ धमक्या देणारा पाक उघडा पडला; सरकारी इमारतींवर बंडखोरांचा ताबा, लावली आग
19
१३२ सेवा, २४ राज्ये, २८४ जिल्ह्यांना जोडणाऱ्या ‘वंदे भारत’मुळे रेल्वेची किती कमाई होते?
20
Pune Accident: कीर्तन ऐकून घरी परतताना भरधाव मर्सिडीजनं उडवलं; दुचाकीस्वार जागीच ठार

चोपडा शहरातील नदी-नालेसफाई करण्याचे काम सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2021 04:14 IST

सध्या पावसाचे वातावरण निर्माण झाल्याने नदी किंवा नाले साफसफाई केव्हा होणार? हा एक प्रश्न त्यातून निर्माण झाला आहे. चोपडा ...

सध्या पावसाचे वातावरण निर्माण झाल्याने नदी किंवा नाले साफसफाई केव्हा होणार? हा एक प्रश्न त्यातून निर्माण झाला आहे. चोपडा शहराच्या मध्यभागातून रत्नावती नदी जाते. या नदीच्या धोक्याच्या सीमेच्या अंतर्गत बरीचशी बांधकामे, कॉम्प्लेक्सची कामे झाल्याने नदीपात्र रुंद झाले आहे. त्यातच गेल्या तीन वर्षांपासून सातत्याने या नदीतून मोठ्या प्रमाणात गाळ काढून साफसफाई झाल्याने नेहमीप्रमाणे गाळाचे प्रमाण कमी आहे. यावर्षी केवळ नागरिकांनी नदीपात्रात फेकलेला कचरा, झाडे तोडून त्याचे उरलेले अवशेष याचीच साफसफाई प्रशासनाला करावी लागत आहे. तरीही यंदा नगरपालिका प्रशासन कोरोनाकडे अधिक लक्ष देत असल्याने नदी आणि नाले साफसफाई करण्यास विलंब झाला आहे, हे प्रशासन नाकारू शकत नाही.

सध्या नगरपालिकेकडून जेसीबी मशीन गेल्या तीन-चार दिवसांपासून सातत्याने सुरू असून नदीपात्रामध्ये केरकचरा असेल अथवा इतर घाण असेल त्याची साफसफाईचे काम सुरू आहे. मात्र नाल्यांचा विचार केला, तर अरुणनगर शेजारून जाणारा नाला, रामपुरा भागातील नाला या नाल्यांमध्ये सध्या साफसफाई सुरू आहे. या नाल्यांमध्ये काटेरी इंग्रजी बाभळाची झाडे, साचलेला कचरा व गाळ आजही दिसत आहे. हाच कचरा या वाढलेल्या झाडांमध्ये व फरशी पुलाच्या गाळ्यात अडकला की, शेजारील वस्तीमध्ये पुराचे पाणी शिरू शकते. म्हणून साफसफाईच्या कामाचा वेग वाढवणे गरजेचे आहे. अरुणनगर शेजारील नाल्यामध्ये अजूनही काटेरी झुडपे जशीच्या तशी उभी दिसताहेत. बीएड कॉलेज शेजारून येणारा नाला त्याचीही साफसफाई होणे बाकी आहे.

शहरातील मेन रोडच्या दुतर्फा असलेली गटार साफ झाली असली तरी ती गटार लहान असल्याने आणि त्याच भागातून पूर्वी नाला पाणी घेऊन जात असल्याने आजही पावसाळ्यात जास्त पाऊस झाला की, त्यादिवशी गटारात पाणी मावत नाही आणि या मेन रोडवर नालसदृश स्थिती निर्माण होते. म्हणून प्रशासनाने गटारे साफसफाई केल्या असल्या तरी नालासदृश पाणी या गटारांमधून जाऊ शकत नाही. म्हणून जी कामे सुरू आहेत, ती कामे वेगाने होऊन शहरातील सर्व भागातील नाले साफसफाई होणे आवश्यक आहे.

‘त्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा

नदीकाठावरील किंवा नाल्याच्या काठावर रहिवास करीत असलेल्या नागरिकांना नगरपालिका प्रशासनातर्फे सतर्क राहण्याबाबत नोटीस दिली असून पुराचे पाणी आपल्या घरात आल्यास आपण जबाबदार राहाल, असे कळवले आहे. यासोबतच शहरांमध्ये ज्या इमारती पडक्या झालेल्या आहेत, ज्या इमारतींचे काम जुने असून पावसाळ्यात पडू शकतात, अशा सर्व इमारतमालकांना भविष्यात धोका निर्माण होऊ नये म्हणून ही इमारत आपल्या स्तरावर पाडून आगामी काळातील धोका टाळावा, अशा आशयाचे लेखी पत्रही देण्यात आले आहेत.

नाले साफसफाई सुरू : मुख्याधिकारी अविनाश गांगोडे

दरम्यान नदीनाले साफसफाईसंदर्भात नगरपालिकेतील मुख्याधिकारी अविनाश गांगोडे यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, ३ जेसीबीद्वारा नदी-नाले साफसफाईचे काम सुरू आहे. पावसाळा सुरू होण्यापूर्वी सर्व कामे होतील. तसेच नदीकाठावर राहणाऱ्या नागरिकांना नोटीस बजावून सतर्क करण्यात आले आहे आणि शहरातील पडकी इमारत असेल, अशा इमारतमालकांनाही लेखी पत्र देऊन ही इमारत पाडून घ्यावी, असे कळविण्यात आल्याचे सांगितले.

===Photopath===

290521\29jal_9_29052021_12.jpg

===Caption===

अरुण नगर शेजारून जाणाऱ्या नाल्यांमध्ये बाभळीचे झाड उभे असल्याचे दिसत आहे.