शहरं
Join us  
Trending Stories
1
जगदीप धनखड बेपत्ता? उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा दिल्यापासून संपर्कात नाहीत; विरोधकांनी सरकारला घेरले
2
ऑपरेशन सिंदूरवेळी एकट्या S-400 ने पाकिस्तानची एवढी विमाने पाडली, हवाईदलप्रमुखांचा मोठा गौप्यस्फोट
3
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
4
Salim Pistol: बेकायदेशीर शस्त्रांचा पुरवठा करणाऱ्या 'सलीम पिस्तूल'ला नेपाळमधून अटक!
5
PIB Fact Check: रजिस्टर्ड पोस्ट सेवा बंद करण्यात आलीये का? पाहा व्हायरल दाव्यामागील सत्य
6
टीम इंडियाचा कॅप्टन गिल इथंही टॉपला! क्रिकेटच्या पंढरीत घातलेली जर्सी लिलावात ठरली लाख मोलाची
7
Video - २ रुपयांची राखी १०० रुपयांना; दुकानदाराने सांगितला व्यवसायामागच्या 'चालूगिरी'चा खेळ
8
अमेरिका १, सिंगापुर २, नॉर्वे ३... ही यादी पाहून डोनाल्ड ट्रम्प डोकं पकडतील, कोणती आहे यादी? जाणून घ्या
9
मध्यमवर्गीयांना गरिबीच्या खाईत लोटतात या पाच सवयी, त्वरित न बदलल्यास होईल पश्चाताप
10
विधानसभेला १६० जागा निवडून देण्याची गॅरंटी, 'त्या'२ जणांची ऑफर; शरद पवारांचा सर्वात मोठा दावा 
11
शरणूसोबत 'मस्साजोग' करायचं होतं; सोबत ट्रिमर, साडी, ब्लाऊज अन् कंडोम होतं, सत्य समजताच पोलीस चक्रावले
12
काश्मीर मुद्द्यावर पाकिस्तानचं पुन्हा रडगाणं; आता म्हणतायत "अमेरिका किंवा इतर कोणत्याही देशाची मध्यस्थी चालेल पण..."  
13
रेल्वेची राऊंड ट्रिप योजना...! तिकिटांवर २० टक्के डिस्काऊंट देणार, अटी एवढ्या की...; एवढे करून मिळाले जरी...
14
ICC नं टीम इंडियाला दिली होती वॉर्निंग; तरीही कोच गंभीर राहिला 'खंबीर', अन्... पडद्यामागची गोष्ट
15
अतूट नातं! १७ वर्षांपासून 'या' अभिनेत्याला राखी बांधतेय ऐश्वर्या राय; प्रेमाने मारते 'अशी' हाक
16
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये या अभिनेत्याची एन्ट्री, साकारणार रावणाच्या जवळच्या व्यक्तीची भूमिका
17
हे जग सोडून गेलेल्या बहिणीच्या हाताने रक्षाबंधन! वलसाडच्या भावासाठी 'ती' जिवंत हात घेऊन आली...
18
पत्नी आणि दोन मुलींची हत्या करून पती फरार; तिहेरी हत्याकांडांने दिल्ली हादरली
19
'या' देशातील लोक आता आपला पत्ताच बदलणार; संपूर्ण देश ऑस्ट्रेलियामध्ये सामील होणार! कारण काय?
20
ICICI Bank Minimum Balance: आता ₹१०००० नाही, बचत खात्यात ₹५०००० चा मिनिमम बॅलन्स ठेवावा लागणार, 'या' दिवसापासून नियम लागू होणार

रिक्षाची बॅटरी, टायर चोरल्याने संताप

By admin | Updated: January 8, 2016 12:20 IST

लुका पोलीस स्टेशनला जमा केलेल्या रिक्षाचे टायर व बॅटरी चोरी झाल्याने रिक्षाचालक स्वप्नील पांडुरंग कुळकर्णीने संताप व्यक्त केला.

 जळगाव : तालुका पोलीस स्टेशनला जमा केलेल्या रिक्षाचे टायर व बॅटरी चोरी झाल्याने रिक्षाचालक स्वप्नील पांडुरंग कुळकर्णी (रा.पाळधी ता.धरणगाव) यांनी संताप व्यक्त केला. रॉकेल अंगावर ओतले, त्याच्याजवळ जमलेल्या नागरिकांनी त्याची समजूत घातली. यानंतर ते शांत झाले. क्षमतेपेक्षा अधिक प्रवाशांची वाहतूक केल्याच्या प्रकरणात स्वप्नीलला मेमो देऊन वाहन पंधरा दिवसासाठी निलंबित केले होते. आरटीओविभागाने ही कारवाईकेली होती. कारवाईनंतर रिक्षा तालुका पोलीस स्टेशनच्या आवारात लावण्यात आली होती. आरटीओच्या मेमोनुसार स्वप्नील याने गुरुवारी न्यायालयात चार हजार व आरटीओ कार्यालयात दोन हजार दोनशे रुपये भरले. रिक्षा ताब्यात घेण्यासाठी तालुका पोलीस स्टेशनला गेला असता तेथे रिक्षाचे एक टायर (स्टेपनी) व बॅटरी चोरी झाल्याचे लक्षात आले. आरटीओ कार्यालय गाठलेपोलिसांनी हाकलून लावल्यानंतर स्वप्नीलने पंधरा लीटर रॉकेल घेऊन आरटीओ कार्यालय गाठले. तेथे वाहन निरीक्षक सदाशिव वाघ यांना भेटून टायर व बॅटरीची भरपाई देण्याची मागणी केली. वाघ यांनीही ती जबाबदारी आमची नसल्याचे त्याला सांगितले. त्यामुळे संतापात त्याने रॉकेल अंगावर टाकले. लोकांनी धाव घेत त्याच्याजवळून काडी व रॉकेलची कॅन ताब्यात घेतली. या प्रकारानंतर स्वप्नील यांचे वडील पांडुरंग कुळकर्णी यांना बोलावून घेतले. त्यांनीही पोलीस व आरटीओ विरूद्ध संताप व्यक्त केला. माझा मुलगा जिवानीशी गेला असता तर त्याला जबाबदार कोण असा सवाल त्यांनी केला.

वाहनावर कारवाई केल्यानंतर ते वाहन जप्त करण्यात आले असले तरी त्यातील वस्तुची जबाबदारी कायद्याने वाहन मालक व चालकाची असते. वाहन जप्त करताना तशा सूचनाही दिल्या जातात. तसेच मेमोवर स्पष्ट शब्दात तसा उल्लेखही असतो. रिक्षाचालक वरिष्ठ अधिकार्‍यांना भेटला असता तर समस्या दूर झाली असती. -सुभाष वारे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी पोलिसांनी जबाबदारी नाकारलीपोलीस स्टेशनला रिक्षा लावूनही बॅटरी व टायर चोरी गेलेच कसे, याची भरपाई कोण करणार असा जाब स्वप्नीलने तालुका पोलिसांना विचारला असता त्यांनी जबाबदारी घेण्यास स्पष्ट शब्दात नकार दिला. तुमच्या आवारातून वस्तू चोरी झाल्याने तुम्हीच भरपाई द्यावी म्हणून चालक अडून बसल्याने पोलिसांनी ही जबाबदारी आरटीओची असल्याचे सांगितले. व्याजाने पैसे काढून मेमोची रक्कम भरली. त्यात रिक्षाचे टायर व बॅटरी चोरी गेल्याचे समजले. या वस्तू घ्यायला पैसे नाहीत. आधीच मेमोची रक्कम भरुन हैराण झालो आहे. आत्मदहन करण्याशिवाय कोणताच पर्याय नाही, म्हणून मी हे पाऊल उचलले. मला माझ्या वस्तू मिळाव्यात.-स्वप्नील कुळकर्णी, रिक्षा चालक